शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

मोदींच्या एका शब्दावर युद्ध थांबवलेले, आज पुन्हा मदतीला धावला; भारताच्या खऱ्या मित्रांपैकी एक...सौदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 23:58 IST

गोष्ट २०१५ ची आहे. सौदी अरेबियाने येमेनविरोधात युद्ध छेडले होते. तेव्हा येमेनमधून भारताने 5600 लोकांना बाहेर काढले होते.

सुदानमध्ये सुरु असलेल्या गृहयुद्धामध्ये हजारो भारतीय नागरीक अडकले आहेत. यापैकी काही भारतीयांवा घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान भारतात दाखल झाले आहे. भारतीय नौदलाने सुदानमध्ये ७२ तासांच्या सीझफायरमध्ये आपल्या युद्धनौका पाठविल्या आहेत. भारतीय नागरिकांना य़ा युद्धनौकांमधून जेद्दाहला आणले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका शब्दावर युद्ध थांबवणारा, अवघ्या जगाला आपल्या तालावर नाचवू शकणारा देश सौदी आज पुन्हा एकदा भारतीयांच्या मदतीला धावून आला आहे. 

गोष्ट २०१५ ची आहे. सौदी अरेबियाने येमेनविरोधात युद्ध छेडले होते. तेव्हा येमेनमधून भारताने 5600 लोकांना बाहेर काढले होते. यात 4640 भारतीय तर अन्य लोक हे ४१ देशांचे होते. येमेनमधील परिस्थिती भीषण होती. भारत सरकारने सौदीच्या राजाकडे एक शब्द टाकला, आम्हाला आमच्या लोकांना बाहेर काढुदे...तेव्हा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज होत्या. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेले तेव्हा कसे मोदींच्या शब्दाखातर सौदीने युद्ध थांबविले होते. 

येमेनच्या आकाशातून बॉम्बवर्षाव होत होता आणि साडे चार हजार भारतीयांचा जीव धोक्यात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परराष्ट्र दौरे केले त्यावर टीका केली जाते, परंतू त्यातून काय मिळविले, असा सवाल सुषमा यांनी केला होता. समुद्रात लुटारू टपून बसलेले होते, आकाशातून बॉम्बचा पाऊस पडत होता. तिन्ही रस्ते बंद होते. अशावेळी मोदींनी ऑस्ट्रेलियात सौदीच्या राजांपैकी एक सुलमान बिन अब्‍दुल अजीज यांच्याशी चर्चा केल्याचे मला आठवले होते. मी लगेचच मोदींकडे गेले आणि त्यांना फोन लावायला सांगितला. सौदीच्या राजासोबत त्यांची चांगली मैत्री होती. फक्त सात दिवसांसाठी युद्धा थांबवा, असे सांगण्यास सांगितले. मोदींनी लगेचच सौदीच्या राजाला फोन केला आणि सात दिवसांत भारतीयांना बाहेर काढण्याचा मनसुबा सांगितला. 

सौदीच्या सुल्तानाने या प्रस्तावावर मोदींकडे एका तासाची वेळ मागितली. युद्ध थांबवायचे म्हणजे सौदीसाठी मोठा धोका होता. दुष्मन या काळात त्याची ताकद वाढविण्याची तयारी करू शकत होता. बरोबर एक तास होत नाही तोच सौदीच्या राजाने फोन केला. त्याने सात दिवस नाही परंतू रोज दोन तास आम्ही युद्ध थांबवू, हे पुढील एक आठवडा करू, असे सांगितले. 

मोदींनी सुषमांना दोन तासांत आपल्याला सर्व तयारी करायची असल्याचे सांगितले. भारतीयांना दोन तासासाठी विमानतळाचे रस्ते खोलण्याचे सौदीने आदेश आपल्या सैन्याला दिले. मोदींना यासाठी निवृत्त जनरल मंत्री वीके सिंह यांना येमेनला पाठविले. भारताने फक्त भारतीयांनाच नाही तर अमेरिका, इंग्‍लैंड, फ्रांस आणि जर्मनीसारख्या नागरिकांनाही येमेनच्या बाहेर आणले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीsaudi arabiaसौदी अरेबियाwarयुद्ध