शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पावसामुळे खचलेली भिंत कोसळली, 15 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 15:46 IST

पहाटेच्या साखरझोपेत असतानाचा भिंतीच्या रुपाने येथील रहिवाशांवर काळाने घाला घातला.

कोईम्बतूर- तामिळनाडूतील मेट्टपलायम येथे मोठी दुर्घटना घडली असून त्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे भिंत कोसळून 10 महिलांसह 15 जणांचा मृत्यू झालाय. सततच्या पावसामुळे आणि जुनी असल्याने ही भिंत अतिशय कमकुवत झाली होती. आज पहाटे साधारण 5 वाजण्याच्या सुमारास ही 15 फुटी भिंत शेजारील घरांवर पडून मोठा अपघात झाला. 

पहाटेच्या साखरझोपेत असतानाचा भिंतीच्या रुपाने येथील रहिवाशांवर काळाने घाला घातला. पहाटे ही भिंत शेजारी घरांवर कोसळल्याने घरातील व्यक्तींचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, या दुर्घटनेतील मृतांचे शव बाहेर काढण्यात आले. अद्यापही बचाव आणि मदतकार्य सुरूच आहे. 

मेट्टलयामय येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, या दुर्घटनेत मृत्यु झालेल्या 2 चिमुकल्यांसह 15 जणांना भावपूर्ण श्रद्धांजलीही वाहिली. तसेच, राज्यातील आपत्ती विभागाकडून मृतांच्या कुटुंबीयांना 4-4 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणाही केली. 

 

 

टॅग्स :RainपाऊसTamilnaduतामिळनाडूDeathमृत्यू