शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

२८०० किमी चाललो, द्वेष दिसला नाही; ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 11:18 IST

माझी प्रतिमा खराब करण्यासाठी भाजपने करोडो रुपये खर्च केले, पण महिन्याभरातच भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सत्य देशासमोर आणले, असे राहुल गांधी लाल किल्ल्यावरून म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ‘भारत जोडो यात्रेत २८०० किमी चाललो, कुठेही द्वेष दिसला नाही. देशात नरेंद्र मोदींचे सरकार नाही, अंबानी-अदानींचे सरकार आहे,’ अशी भावना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथील लाल किल्ल्यावरून बोलताना व्यक्त केली. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी भाजपने करोडो रुपये खर्च केले, पण मी महिन्याभरातच भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सत्य देशासमोर आणले, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचीभारत जोडो यात्रा शनिवारी दिल्लीत पोहोचली. येथे प्रवासाला ९ दिवसांची म्हणजे २ जानेवारीपर्यंत विश्रांती असेल. ३ जानेवारी रोजी गाझियाबादच्या लोणी सीमेवरून उत्तर प्रदेशात यात्रेचा प्रवेश होईल. यानंतर ४ जानेवारीला बागपतमार्गे, ५ जानेवारीला शामलीमार्गे आणि ६ जानेवारीला कैरानामार्गे दुसऱ्या टप्प्यात हरयाणातील सोनीपतमध्ये यात्रा दाखल होईल. त्यानंतर ही यात्रा पंजाबमार्गे जम्मू-काश्मीरला रवाना होईल. शनिवारी संध्याकाळी राहुल गांधींनी लाल किल्ल्यावरून म्हणाले की, केंद्र सरकार अहोरात्र हिंदू-मुस्लिम यांच्या नावाने द्वेष पसरवत आहेत. परंतु देशात हे वास्तव नाही. देशातील लोकांमध्ये बंधुभाव असल्याचे मी या यात्रेत पाहिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस