शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

२८०० किमी चाललो, द्वेष दिसला नाही; ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 11:18 IST

माझी प्रतिमा खराब करण्यासाठी भाजपने करोडो रुपये खर्च केले, पण महिन्याभरातच भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सत्य देशासमोर आणले, असे राहुल गांधी लाल किल्ल्यावरून म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ‘भारत जोडो यात्रेत २८०० किमी चाललो, कुठेही द्वेष दिसला नाही. देशात नरेंद्र मोदींचे सरकार नाही, अंबानी-अदानींचे सरकार आहे,’ अशी भावना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथील लाल किल्ल्यावरून बोलताना व्यक्त केली. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी भाजपने करोडो रुपये खर्च केले, पण मी महिन्याभरातच भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सत्य देशासमोर आणले, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचीभारत जोडो यात्रा शनिवारी दिल्लीत पोहोचली. येथे प्रवासाला ९ दिवसांची म्हणजे २ जानेवारीपर्यंत विश्रांती असेल. ३ जानेवारी रोजी गाझियाबादच्या लोणी सीमेवरून उत्तर प्रदेशात यात्रेचा प्रवेश होईल. यानंतर ४ जानेवारीला बागपतमार्गे, ५ जानेवारीला शामलीमार्गे आणि ६ जानेवारीला कैरानामार्गे दुसऱ्या टप्प्यात हरयाणातील सोनीपतमध्ये यात्रा दाखल होईल. त्यानंतर ही यात्रा पंजाबमार्गे जम्मू-काश्मीरला रवाना होईल. शनिवारी संध्याकाळी राहुल गांधींनी लाल किल्ल्यावरून म्हणाले की, केंद्र सरकार अहोरात्र हिंदू-मुस्लिम यांच्या नावाने द्वेष पसरवत आहेत. परंतु देशात हे वास्तव नाही. देशातील लोकांमध्ये बंधुभाव असल्याचे मी या यात्रेत पाहिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस