शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

१३०० शिक्षणसेवक प्रतीक्षेत

By admin | Published: December 31, 2014 12:06 AM

श्रीरामपूर : राज्यातील १३०० शिक्षणसेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २ मे २०१० रोजी प्राथमिक शिक्षणसेवकांच्या १५ हजार पदांसाठी केंद्रीय भरतीपूर्व परीक्षा (सीईटी)घेतली होती. त्याचा निकाल १ जून २०१० ला लागला. उत्तरपत्रिकेत दहा प्रश्नांची उत्तरे चुकीची आढळल्याने काही उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सरकारने उत्तरपत्रिकेतील चुका काढून दोषरहीत उत्तरपत्रिका काढावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. सरकारने ४ जुलै २०११ च्या निर्णयानुसार संबंधित उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी समिती स्थापन केली. समितीने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या १४ हजार ४०० पैकी ३१२१ उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरविले. त्यांना नियुक्त्या न दिल्याने पुन्हा न्यायालयात गेल्यानंतर तब्बल साडेचार वर्षानंतर १७५९ उमेदवारांना ३१ मे २०१४ रोजी नियुक्त्य्

श्रीरामपूर : राज्यातील १३०० शिक्षणसेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २ मे २०१० रोजी प्राथमिक शिक्षणसेवकांच्या १५ हजार पदांसाठी केंद्रीय भरतीपूर्व परीक्षा (सीईटी)घेतली होती. त्याचा निकाल १ जून २०१० ला लागला. उत्तरपत्रिकेत दहा प्रश्नांची उत्तरे चुकीची आढळल्याने काही उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सरकारने उत्तरपत्रिकेतील चुका काढून दोषरहीत उत्तरपत्रिका काढावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. सरकारने ४ जुलै २०११ च्या निर्णयानुसार संबंधित उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी समिती स्थापन केली. समितीने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या १४ हजार ४०० पैकी ३१२१ उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरविले. त्यांना नियुक्त्या न दिल्याने पुन्हा न्यायालयात गेल्यानंतर तब्बल साडेचार वर्षानंतर १७५९ उमेदवारांना ३१ मे २०१४ रोजी नियुक्त्या दिल्या. उर्वरित १३६२ उमेदवारांना दोन महिन्यांमध्ये नियुक्त्या देण्याचे आश्वासन शिक्षण संचालनालयातील अधिकार्‍यांनी दिले होते. पण शिक्षण संचालनालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका पात्र उमेदवारांना बसत असून १३६२ उमेदवार आजही नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा परिषदांकडून प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांचा अहवाल वेळेवर मिळत नसल्याचे कारण शिक्षण संचालनालयातील अधिकारी सांगत आहेत. त्यांच्याकडून तात्काळ माहिती मागवून १३६२ शिक्षणसेवकांना रिक्ताजागी पदस्थापना द्यावी, अशी मागणी डी.एड. सी.ई.टी.पुनर्मूल्यांकन पात्र उमेदवारांनी शिक्षण संचालक महावीर माने यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)