शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांची नाराजी भोवणार; भाजपा एक तृतीयांश खासदारांचे तिकीट कापणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 17:36 IST

सलग दुसऱ्यांदा दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या सभा आणि अमित शहांची रणनीती दिमतील असूनही भाजपाला मतदारांच्या नाराजीची भीती वाटत आहे.

नवी दिल्ली - सलग दुसऱ्यांदा दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या सभा आणि अमित शहांची रणनीती दिमतील असूनही भाजपाला मतदारांच्या नाराजीची भीती वाटत आहे. त्यामुळे स्थानिक मुद्द्यांमुळे असलेली मतदारांची नाराजी आणि सत्ताविरोधी लाटेचा प्रभाव टाळण्यासाठी भाजपाने अनेक खासदारांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादींचा आढावा घेतल्यास 2014 मध्ये जिंकून आलेल्या खासदारांपैकी  सुमारे 71 खासदारांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. तसेच अन्य 26 जागांवरील उमेदवारांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा देशभरातील एकूण 400 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडणार आहे. 2014 मध्ये निवडून आलेल्या पण आता उमेदवारी नाकारण्यात आलेल्या खासदारांऐवजी ज्यांना उमेदवारी मिळाली आहे ते उमेदवार पक्षाला 2014 प्रमाणेच यश मिळवून देऊ शकतील की नाही हा प्रश्नच आहे. 10 वर्षांहून अधिक काळ सत्तेवर असणाऱ्या पक्षाला सत्ताविरोधी वातावरणाचा फटका बसत असतो. 2014 मध्ये काँग्रेसलाही या सत्ताविरोधी लाटेचा जबरदस्त धक्का बसला होता. मात्र मोदींना सत्तेत येऊन आता केवळ 5 वर्षेच झाली आहेत. मात्र ज्या राज्यांत भाजपा दीर्घाकाळापासून सत्तेत आहेत तिथे पक्षाला त्याचा फटका बसू शकतो.  ज्या ठिकाणी विद्यमान खासदारांना तिकीट नाकारण्यात आले आहे. त्याशिवाय इतर ठिकाणीही सत्ताविरोधी लाटेचा फटका बसू शकतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनाधार आणि भक्कम संघटनात्मक बांधणी याच्या जोरावर ही नाराजी थोपवता येईल, असा अमित शहा यांना विश्वास आहे. ज्या खारदारांची कामगिरी समाधानकारक नसतानाही त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, अशा ठिकाणी मोदींचा चेहरा पुढे करून भाजपाकडून निवडणूक लढवली जाईल, अशी शक्यता आहे.  दरम्यान, भाजपाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळेल. देशात सत्ताविरोधी नव्हे तर सत्तेच्या बाजूने वातावरण आहे, अशा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता.   

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण