शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

मतदारांची नाराजी भोवणार; भाजपा एक तृतीयांश खासदारांचे तिकीट कापणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 17:36 IST

सलग दुसऱ्यांदा दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या सभा आणि अमित शहांची रणनीती दिमतील असूनही भाजपाला मतदारांच्या नाराजीची भीती वाटत आहे.

नवी दिल्ली - सलग दुसऱ्यांदा दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या सभा आणि अमित शहांची रणनीती दिमतील असूनही भाजपाला मतदारांच्या नाराजीची भीती वाटत आहे. त्यामुळे स्थानिक मुद्द्यांमुळे असलेली मतदारांची नाराजी आणि सत्ताविरोधी लाटेचा प्रभाव टाळण्यासाठी भाजपाने अनेक खासदारांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादींचा आढावा घेतल्यास 2014 मध्ये जिंकून आलेल्या खासदारांपैकी  सुमारे 71 खासदारांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. तसेच अन्य 26 जागांवरील उमेदवारांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा देशभरातील एकूण 400 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडणार आहे. 2014 मध्ये निवडून आलेल्या पण आता उमेदवारी नाकारण्यात आलेल्या खासदारांऐवजी ज्यांना उमेदवारी मिळाली आहे ते उमेदवार पक्षाला 2014 प्रमाणेच यश मिळवून देऊ शकतील की नाही हा प्रश्नच आहे. 10 वर्षांहून अधिक काळ सत्तेवर असणाऱ्या पक्षाला सत्ताविरोधी वातावरणाचा फटका बसत असतो. 2014 मध्ये काँग्रेसलाही या सत्ताविरोधी लाटेचा जबरदस्त धक्का बसला होता. मात्र मोदींना सत्तेत येऊन आता केवळ 5 वर्षेच झाली आहेत. मात्र ज्या राज्यांत भाजपा दीर्घाकाळापासून सत्तेत आहेत तिथे पक्षाला त्याचा फटका बसू शकतो.  ज्या ठिकाणी विद्यमान खासदारांना तिकीट नाकारण्यात आले आहे. त्याशिवाय इतर ठिकाणीही सत्ताविरोधी लाटेचा फटका बसू शकतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनाधार आणि भक्कम संघटनात्मक बांधणी याच्या जोरावर ही नाराजी थोपवता येईल, असा अमित शहा यांना विश्वास आहे. ज्या खारदारांची कामगिरी समाधानकारक नसतानाही त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, अशा ठिकाणी मोदींचा चेहरा पुढे करून भाजपाकडून निवडणूक लढवली जाईल, अशी शक्यता आहे.  दरम्यान, भाजपाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळेल. देशात सत्ताविरोधी नव्हे तर सत्तेच्या बाजूने वातावरण आहे, अशा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता.   

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण