शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खोटे संदेश रोखण्यासाठी व्हॉटस्अ‍ॅपवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 02:22 IST

अन्यथा कारवाई करू; रविशंकर प्रसाद यांची कंपनीच्या सीईओला तंबी

नवी दिल्ली : व्हॉटस्अ‍ॅपने भारतात तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे, तसेच खोट्या संदेशांचा माग काढणारी व्यवस्था निर्माण करावी, अशी सूचना भारत सरकारने व्हॉटस्अ‍ॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल यांना केली आहे.व्हॉटस्अ‍ॅप सीईओ ख्रिस डॅनियल यांनी मंगळवारी केंद्रीय आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसाद यांनी ही माहिती दिली. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, व्हॉटस्अ‍ॅपने भारताच्या विविध क्षेत्रात तंत्रज्ञानविषयक योगदान दिले आहे, त्याबद्दल मी डॅनियल यांच्याकडे व्हॉटस्अ‍ॅपची प्रशंसाच केली आहे. तथापि, काही अत्यंत घातक घटनाही व्हॉटस्अ‍ॅपमुळे घडत आहे. जमावाकडून होणाऱ्या हत्यांना उत्तेजन देणारे संदेश व्हॉटस्अ‍ॅपवरून फिरतात. सूडभावनेतून अश्लील फिती प्रसारित केल्या जात आहेत. हे प्रकार भारतीय कायद्याचे उल्लंघन करणारे आहेत. यावर काही तरी उपाय करणे आवश्यक आहे. प्रसाद यांनी सांगितले की, खोटे संदेश हजारो-लाखोंच्या संख्येने प्रसारित होत असतात. त्यावर उपाय शोधला गेला नाही, तर व्हॉटस्अ‍ॅपवर गुन्ह्याला प्रोत्साहित केल्याची कलमे लावली जातील. आपल्या सूचनांवर काम करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.तक्रारी अमेरिकेतून नव्हे; भारतातून हाताळाप्रसाद यांनी सांगितले की, आपण कंपनीकडे काही मुख्य मागण्या केल्या आहेत. त्यात व्हॉटस्अ‍ॅपचे भारतात तक्रार निवारण कार्यालय असायला हवे, भारतीय कायद्यांचे योग्य पालन केले जावे आणि भारतातील प्रश्नाचे अमेरिकेतून उत्तर देण्याची पद्धत बंद केली जावी यासोबत व्हॉटस्अ‍ॅप ही आता भारतातील एक प्रमुख डिजिटल साठवणूक व्यवस्था बनली असल्याने कंपनीची भारतात योग्य औद्योगिक आस्थापना (कॉर्पोरेट एन्टायटी) असली पाहिजे आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपFake Newsफेक न्यूज