शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

खोटे संदेश रोखण्यासाठी व्हॉटस्अ‍ॅपवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 02:22 IST

अन्यथा कारवाई करू; रविशंकर प्रसाद यांची कंपनीच्या सीईओला तंबी

नवी दिल्ली : व्हॉटस्अ‍ॅपने भारतात तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे, तसेच खोट्या संदेशांचा माग काढणारी व्यवस्था निर्माण करावी, अशी सूचना भारत सरकारने व्हॉटस्अ‍ॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल यांना केली आहे.व्हॉटस्अ‍ॅप सीईओ ख्रिस डॅनियल यांनी मंगळवारी केंद्रीय आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसाद यांनी ही माहिती दिली. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, व्हॉटस्अ‍ॅपने भारताच्या विविध क्षेत्रात तंत्रज्ञानविषयक योगदान दिले आहे, त्याबद्दल मी डॅनियल यांच्याकडे व्हॉटस्अ‍ॅपची प्रशंसाच केली आहे. तथापि, काही अत्यंत घातक घटनाही व्हॉटस्अ‍ॅपमुळे घडत आहे. जमावाकडून होणाऱ्या हत्यांना उत्तेजन देणारे संदेश व्हॉटस्अ‍ॅपवरून फिरतात. सूडभावनेतून अश्लील फिती प्रसारित केल्या जात आहेत. हे प्रकार भारतीय कायद्याचे उल्लंघन करणारे आहेत. यावर काही तरी उपाय करणे आवश्यक आहे. प्रसाद यांनी सांगितले की, खोटे संदेश हजारो-लाखोंच्या संख्येने प्रसारित होत असतात. त्यावर उपाय शोधला गेला नाही, तर व्हॉटस्अ‍ॅपवर गुन्ह्याला प्रोत्साहित केल्याची कलमे लावली जातील. आपल्या सूचनांवर काम करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.तक्रारी अमेरिकेतून नव्हे; भारतातून हाताळाप्रसाद यांनी सांगितले की, आपण कंपनीकडे काही मुख्य मागण्या केल्या आहेत. त्यात व्हॉटस्अ‍ॅपचे भारतात तक्रार निवारण कार्यालय असायला हवे, भारतीय कायद्यांचे योग्य पालन केले जावे आणि भारतातील प्रश्नाचे अमेरिकेतून उत्तर देण्याची पद्धत बंद केली जावी यासोबत व्हॉटस्अ‍ॅप ही आता भारतातील एक प्रमुख डिजिटल साठवणूक व्यवस्था बनली असल्याने कंपनीची भारतात योग्य औद्योगिक आस्थापना (कॉर्पोरेट एन्टायटी) असली पाहिजे आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपFake Newsफेक न्यूज