शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
2
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
3
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
4
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर
5
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
6
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
7
२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
8
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
9
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
10
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
11
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
12
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
13
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
14
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
15
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
16
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
17
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
18
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
19
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
20
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

कलम 370 रद्द करताना स्थानिकांचा आवाज ऐकायला हवा होता- मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 08:04 IST

आठवड्याभरानंतर मनमोहन सिंग यांचं कलम 370 वर भाष्य

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 कलम रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर आठवड्याभरानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भाष्य केलं. भारताच्या एकात्मतेची संकल्पना कायम राहण्यासाठी कलम 370 हटवताना स्थानिकांचा आवाज ऐकायला हवा होता, असं मनमोहन सिंग म्हणाले. सध्या भारत अडचणीतून जात असून त्यातून बाहेर पडण्यासाठी समविचारी लोकांचं सहकार्य आवश्यक असल्याचंदेखील सिंग यांनी म्हटलं. स्थानिकांशी संवाद साधून कलम 370 बद्दलचा निर्णय घ्यायला हवा होता. त्यामुळे भारतीयत्वाची पवित्र संकल्पना आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि आम्ही ती टिकवत आहोत, असा संदेश गेला असतो, असं सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. कलम 370 हटवल्यानंतर मनमोहन सिंग यांनी प्रथमच त्यावर भाष्य केलं. सिंग यांच्या मंत्रिमंडळातील माजी सहकारी एस. जयशंकर रेड्डी यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या सोमवारी (5 ऑगस्टला) मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू-काश्मीरची पुनर्रचना केली. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. जेणेकरून इथे राहणाऱ्या लोकांना स्वतःचे उद्देश पूर्ण करता येतील. तर जम्मू-काश्मीरला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा राहणार आहे.  

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरManmohan Singhमनमोहन सिंगladakhलडाख