शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Virat Ramayan Mandir: मुस्लिम कुटुंबाने 'रामायण मंदिरा'साठी दान केली कोट्यवधी रुपयांची जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 19:44 IST

Virat Ramayan Mandir: बिहारच्या पूर्ण चंपारण जिल्ह्यात भव्य 'रामायण मंदिर' उभारले जात आहे.

पाटणा: धार्मिक सलोख्याचे उदाहरण मांडत बिहारमधील एका मुस्लिम कुटुंबाने मंदिरासाठी आपली कोट्यवधी रुपयांची जमीन दान केल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवालिया परिसरात भव्य रामायण मंदिर बांधले जाणार आहे. यासाठी एका मुस्लिम कुटुंबाने आपली अडीच कोटी रुपयांची जमीन मंदिरासाठी दिली आहे.

मुस्लिम कुटुंबाने मंदिरासाठी जमीन दान केलीबिहारच्या पूर्व चंपारणमधील कैथविसाया परिसरात 'भव्य रामायण मंदिर' बांधले जात आहे. हे बिहारमधील सर्वात मोठे देशातील मोठ्या मंदिरांपैकी एक असेल. मंदिराच्या बांधकामासाठी कैथवालिया येथील इश्तियाक अहमद खान यांनी आपली 16560 चौरस फुटांची जमीन दान करुन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. मंदिर ट्रस्टचे प्रमुख आचार्य किशोर कुणाल यांनी सांगितले की, ही जमीन पूर्व चंपारण येथील व्यापारी इश्तियाक अहमद खान यांनी दान केली आहे. 

दोन समुदायांमधील सामाजिक सौहार्दाचे उदाहरणमहावीर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी आयपीएस आचार्य किशोर कुणाल म्हणाले की, इश्तियाक अहमद खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेली ही देणगी सामाजिक सलोखा आणि दोन समाजातील बंधुभावाचे उत्तम उदाहरण आहे. मुस्लिमांच्या मदतीशिवाय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारणे कठीण झाले असते, असे ते म्हणाले. या मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत महावीर मंदिर ट्रस्टला 125 एकर जमीन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ट्रस्टला लवकरच या परिसरात आणखी 25 एकर जागा मिळणार आहे.

असे असेल मंदिरहे भव्य रामायण मंदिर कंबोडियामधील जगप्रसिद्ध अंकोरवाटच्या धर्तीवर बांधले जात आहे. पूर्व चंपारणमधील चकिया-केसरियाजवळ जानकीपूर येथे हे 'विराट रामायण मंदिर' बांधले जाईल. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची उंची 270 फूट, लांबी 1080 फूट आणि रुंदी 540 फूट असेल.  

मंदिराचे वैशिष्ट्य

हे मंदिर 'टेम्पल ऑफ टॉवर्स' म्हणून ओळखले जाईल. त्याच्या आजूबाजूला 13 मंदिरे बांधली जात आहेत आणि ती सर्व उंच शिखरे असलेली मंदिरे आहेत. शेजारील चार मंदिरे 180 फूट उंच आहेत. यासोबतच मंदिरात 33 फूट उंचीच्या भव्य शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे. या मंदिरासाठी एकूण 500 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मंदिर ट्रस्ट लवकरच नवी दिल्लीतील संसद भवनाचे निर्माण करणाऱ्या जानकारांचा सल्ला घेईल.

मार्चपासून मंदिर उभारणीला सुरुवात 

मार्चअखेर मंदिर उभारणीचे काम सुरू होईल. येत्या अडीच वर्षांत ही रचना उभारण्यात येणार असून त्यानंतर पुढील अडीच वर्ष त्याच्या फिनिशिंगसाठी लागणार आहेत. फिनिशिंगसाठी दक्षिण भारतातील कलाकारांना बोलावण्यात येणार आहे. महावीर मंदिर ट्रस्टकडे मंदिर बांधण्यासाठी इतका पैसा आहे की पायापासून शिखरापर्यंतची रचना तयार होईल. त्यानंतर गरज भासल्यास ट्रस्ट बिहारमधील जनतेची मदत घेईल. 

टॅग्स :TempleमंदिरBiharबिहार