शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Virat Ramayan Mandir: मुस्लिम कुटुंबाने 'रामायण मंदिरा'साठी दान केली कोट्यवधी रुपयांची जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 19:44 IST

Virat Ramayan Mandir: बिहारच्या पूर्ण चंपारण जिल्ह्यात भव्य 'रामायण मंदिर' उभारले जात आहे.

पाटणा: धार्मिक सलोख्याचे उदाहरण मांडत बिहारमधील एका मुस्लिम कुटुंबाने मंदिरासाठी आपली कोट्यवधी रुपयांची जमीन दान केल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवालिया परिसरात भव्य रामायण मंदिर बांधले जाणार आहे. यासाठी एका मुस्लिम कुटुंबाने आपली अडीच कोटी रुपयांची जमीन मंदिरासाठी दिली आहे.

मुस्लिम कुटुंबाने मंदिरासाठी जमीन दान केलीबिहारच्या पूर्व चंपारणमधील कैथविसाया परिसरात 'भव्य रामायण मंदिर' बांधले जात आहे. हे बिहारमधील सर्वात मोठे देशातील मोठ्या मंदिरांपैकी एक असेल. मंदिराच्या बांधकामासाठी कैथवालिया येथील इश्तियाक अहमद खान यांनी आपली 16560 चौरस फुटांची जमीन दान करुन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. मंदिर ट्रस्टचे प्रमुख आचार्य किशोर कुणाल यांनी सांगितले की, ही जमीन पूर्व चंपारण येथील व्यापारी इश्तियाक अहमद खान यांनी दान केली आहे. 

दोन समुदायांमधील सामाजिक सौहार्दाचे उदाहरणमहावीर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी आयपीएस आचार्य किशोर कुणाल म्हणाले की, इश्तियाक अहमद खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेली ही देणगी सामाजिक सलोखा आणि दोन समाजातील बंधुभावाचे उत्तम उदाहरण आहे. मुस्लिमांच्या मदतीशिवाय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारणे कठीण झाले असते, असे ते म्हणाले. या मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत महावीर मंदिर ट्रस्टला 125 एकर जमीन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ट्रस्टला लवकरच या परिसरात आणखी 25 एकर जागा मिळणार आहे.

असे असेल मंदिरहे भव्य रामायण मंदिर कंबोडियामधील जगप्रसिद्ध अंकोरवाटच्या धर्तीवर बांधले जात आहे. पूर्व चंपारणमधील चकिया-केसरियाजवळ जानकीपूर येथे हे 'विराट रामायण मंदिर' बांधले जाईल. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची उंची 270 फूट, लांबी 1080 फूट आणि रुंदी 540 फूट असेल.  

मंदिराचे वैशिष्ट्य

हे मंदिर 'टेम्पल ऑफ टॉवर्स' म्हणून ओळखले जाईल. त्याच्या आजूबाजूला 13 मंदिरे बांधली जात आहेत आणि ती सर्व उंच शिखरे असलेली मंदिरे आहेत. शेजारील चार मंदिरे 180 फूट उंच आहेत. यासोबतच मंदिरात 33 फूट उंचीच्या भव्य शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे. या मंदिरासाठी एकूण 500 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मंदिर ट्रस्ट लवकरच नवी दिल्लीतील संसद भवनाचे निर्माण करणाऱ्या जानकारांचा सल्ला घेईल.

मार्चपासून मंदिर उभारणीला सुरुवात 

मार्चअखेर मंदिर उभारणीचे काम सुरू होईल. येत्या अडीच वर्षांत ही रचना उभारण्यात येणार असून त्यानंतर पुढील अडीच वर्ष त्याच्या फिनिशिंगसाठी लागणार आहेत. फिनिशिंगसाठी दक्षिण भारतातील कलाकारांना बोलावण्यात येणार आहे. महावीर मंदिर ट्रस्टकडे मंदिर बांधण्यासाठी इतका पैसा आहे की पायापासून शिखरापर्यंतची रचना तयार होईल. त्यानंतर गरज भासल्यास ट्रस्ट बिहारमधील जनतेची मदत घेईल. 

टॅग्स :TempleमंदिरBiharबिहार