शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

जेआरडी टाटा ते! गुण हेरले, उच्चशिक्षणासाठी मदत केली; पुढे K. R. Narayanan भारताचे राष्ट्रपती बनले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 09:51 IST

JRD Tata : 'जेआरडी टाटा यांना शिष्यवृत्तीसाठी एका युवकाची शिफारस करण्याचे पत्र मिळाले, तेव्हा त्या काळात कोणालाही ठाऊक नव्हते की, तो युवक पुढे जाऊन एके दिवशी भारताचा राष्ट्रपती होईल. '

ठळक मुद्दे 1992 मध्ये केआर नारायणन भारताचे उपराष्ट्रपती होते, तर 1997 मध्ये ते भारताचे राष्ट्रपती होते.

मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष जेआरडी टाटा यांचे किस्से खूप प्रसिद्ध आहेत. सर्वांना मदत करणारा अवलिया म्हणून त्यांना ओळखले जात होते. लोकांना मदत करणे त्यांना आवडत असे. त्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती केआर नारायणन यांचीही मदत केली होती. या मदतीमुळे केआर नारायणन यांचे स्वप्न पूर्ण झाले होते. यासंदर्भातील एक पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, 1992 मध्ये केआर नारायणन भारताचे उपराष्ट्रपती होते, तर 1997 मध्ये ते भारताचे राष्ट्रपती होते. (Viral Post Shows How JRD Tata's Facilitated Former President K. R. Narayanan's Dream)

शिष्यवृत्तीसाठी मदत केलीहरीश भट जे टाटा सन्सचे ब्रँड कस्टोडियन आहेत, त्यांनी जेआरडी टाटा यांनी केलेल्या मदतीची पोस्ट सोशल मीडियातील लिंकडनवर केली आहे. या पोस्टनुसार, जेआरडी टाटा यांना शिष्यवृत्तीसाठी एका युवकाची शिफारस करण्याचे पत्र मिळाले, तेव्हा त्या काळात कोणालाही ठाऊक नव्हते की, तो युवक पुढे जाऊन एके दिवशी भारताचा राष्ट्रपती होईल. तो युवक म्हणजे केआर नारायणन होते.

केआर नारायणन अत्यंत गरीब कुटुंबातून आले होते. त्यांच्या वडिलांची महिन्याला फक्त 20 रुपयांची कमाई होती. त्यांच्या कुटुंबात 9 सदस्य होते. लंडनमध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी केआर नारायणन यांनी जेआरडी टाटा यांच्याकडे शिष्यवृत्तीसाठी शिफारस केली होती. शिफारसीचे पत्र मिळाल्यानंतर जेआरडी टाटा यांनी केआर नारायणन यांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी जेएन टाटा एंडोमेंटला केआर नारायणन यांची मदत करण्यासाठी शिफारस केली.

जेएन टाटा एंडोमेंटची स्थापना 1892 मध्ये जमशेदजी नुसरवान जी टाटा यांनी केली होती. याअंतर्गत युवकांना शिष्यवृत्ती दिली जात होती, जेणेकरून युवक परदेशात शिक्षण घेतील. जेआरडी टाटा यांच्या शिफारशीनंतर केआर नारायणन यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यामध्ये ते उत्तीर्ण झाले आणि याअंतर्गत त्यांना 16 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच, एक हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले.

1997 मध्ये केआर नारायणन भारताचे राष्ट्रपती बनले होतेशिष्यवृत्ती मिळाल्यानंतर केआर नारायणन यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला. जेआरडी टाटा यांनी केलेल्या मदतीमुळे केआर नारायणन यांचे लंडनमध्ये जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. यानंतर 1949 मध्ये ते भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले. 1992 मध्ये केआर नारायणन भारताचे उपराष्ट्रपती झाले आणि 1997 मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले.

टॅग्स :TataटाटाSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल