शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

रियल हिरो! केरळमधील वीज कर्मचाऱ्यांचा फोटो व्हायरल, नेटीझन्सचा 'सॅल्यूट' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 13:58 IST

Kerala Floods : केरळमध्ये पावसाच्या पाण्यात ताज्या माहितीनुसार 167 जणांचा जीव गेला असून मदत आणि बचावकार्य वेगात सुरू आहे. देशभरातून केरळमधील जनतेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. वरुणराजाला थांबण्यासाठी साकडे घालण्यात येत आहे. हे सर्व होत असतानाच

तिरुवअनंतपुरम - केरळमध्ये पावसामुळे हाहाकार माजला आहे. नेहमीच्या पावसापेक्षा साधारणत: 250 टक्के जास्तीचा पाऊस झाल्याचे सांगण्यात येत असून येथील नद्यांना महापूर आला आहे. ताज्या माहितीनुसार 167 जणांचा जीव गेला असून मदत आणि बचावकार्य वेगात सुरू आहे. देशभरातून केरळमधील जनतेसाठी प्रार्थना करण्यात येत आहेत. वरुणराजाला थांबण्यासाठी साकडे घालण्यात येत आहे. हे सर्व होत असताना, केरळच्या वीज वितरण विभागातील कर्चचाऱ्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार कोसळणाऱ्या पावसात कर्तव्य बजावणाऱ्या या जिगरबाज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट ठोकण्यात येत आहे. 

केरळमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार पावसानं आलेल्या पुरात आतापर्यंत 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. हवामान खात्यानं राज्यातील 14 पैकी 13 जिल्ह्यांत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच सेंट्रल वॉटर कमिशनही पुराचं पाणी तुंबणाऱ्या भागावर नजर ठेवून आहे. मुसळधार पावसानं आतापर्यंत 167 जणांचा बळी घेतला आहे. एनडीआरएफच्या पाच टीम तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसेच एनडीआरएफची आणखी जवान केरळमध्ये दाखल होणार आहेत.

अबब! केरळमधल्या पुरात आतापर्यंत 167 जणांचा मृत्यू, 8 हजार कोटींहून अधिकचं नुकसान

पावसानंतर महापूर आल्याने अनेक ठिकाणी विजेच्या समस्या निर्माण झाल्या असून वीज वितरण विभागाकडून काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवाची बाजी लावण्यात येत आहे. केरळमधील वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुसळधार पावसात कर्तव्य बजावताना दिसत आहेत. इलेक्टीक विभागातील चार कर्मचारी डोक्यावर सुरक्षा टोपी आणि अंगावर रेनकोट घालून धो-धो कोसळणाऱ्या पावसात ड्युटी बजावत आहेत. स्वत:ला दोरखंडाशी बांधून घेत वीजेचा प्रवाह सुरू करण्याचा अन् राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी जीवाची बाजी लावताना दिसत आहेत. सध्या, सोशल मीडियावर या कर्मचाऱ्यांचा फोटो व्हायरल होत आहे. नेटीझन्सकडून या कर्मचाऱ्यांना जवांनाची उपमा देण्यात येत आहे. सीमेवर जवान लढत आहेत, तर केरळातही वीज कर्मचारी जवानांप्रमाणेच काम करत आहेत, असा संदेशही लिहिण्यात येत आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूटही करण्यात येत आहे. दरम्यान, केरळमधील पूरस्थिती गंभीर बनली असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देशाला मदतीचे आवाहन केले आहे.    

दरम्यान, कुन्नूर, वायनाड, कोझिकोड, मलप्पुरम आणि इडुक्की जिल्ह्यांत भूस्खलनाच्या घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने मल्लपेरियार धरणाची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांना सूचना केली होती की, धरणाचे दरवाजे उघडण्याआधी सभोवतालच्या परिस्थितीचा आढावा घ्या आणि मगच पाणी सोडा. तसेच मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांनी परिस्थितीवर सामंजस्याने तोडगा काढण्याचे सरकारला सांगितले आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळelectricityवीजRainपाऊस