शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

हिंसा कुठल्याच समस्येचं समाधान नाही, 'मन की बात'मधून शांतीचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 21:07 IST

मोदींचा मन की बात हा कार्यक्रम रविवारी सकाळी 11 वाजता घेण्यात येतो

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या वर्षातील पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात नोटबंदी, जीएसटीपासून ते स्वच्छता अभियानाचा उल्लेख केला. देशाच्या विकासासाठी सरकार करत असलेल्या अनेक निर्णयांचा उहापोहही केला. तसेच, नागरिकांनी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे. हिंसा कुठल्याच प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही, असेही मोदींनी म्हटले.

मोदींचा मन की बात हा कार्यक्रम रविवारी सकाळी 11 वाजता घेण्यात येतो. मात्र, प्रजासत्ताक दिनामुळे पंतप्रधानांनी आजची मन की बात सायंकाळी केली. मन की बात कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मोदींनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, शांती आणि चर्चेतूनच प्रत्येक गोष्टीचा मार्ग निघत असतो. हिंसा हे कुठल्याच समस्येचं उत्तर नाही. त्यामुळे, देशाच्या मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहनही मोदींनी नागरिकांना केलं. 

देशात सीएए आणि एनआरसीवरुन मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात येत आहेत. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिसांत्मक वळण लागले आहे. त्यास, अनुसरुनच मोदींनी हे वक्तव्य केलं. तसेच, खेलो इंडिया कार्यक्रमाशी एकरुप होण्याचं आवाहनही मोदींनी भारतीयांना केलं. तर, आसाम सरकारने अतिशय उत्कृष्टपणे ही स्पर्धा नियोजनबद्ध रितीने खेळवली, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले. पद्म पुरस्कारासाठी यंदा तब्बल 46 हजार अर्ज आले होते. ही संख्या 2014 च्या तुलनेत 20 टक्के अधिक आहे. या आकडेवारीवरुनच हे पुरस्कार जनतेचे पुरस्कार बनल्याचं दिसून येतंय, असे मोदींनी म्हटले 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलनMan ki Baatमन की बात