शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

हिंसा कुठल्याच समस्येचं समाधान नाही, 'मन की बात'मधून शांतीचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 21:07 IST

मोदींचा मन की बात हा कार्यक्रम रविवारी सकाळी 11 वाजता घेण्यात येतो

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या वर्षातील पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात नोटबंदी, जीएसटीपासून ते स्वच्छता अभियानाचा उल्लेख केला. देशाच्या विकासासाठी सरकार करत असलेल्या अनेक निर्णयांचा उहापोहही केला. तसेच, नागरिकांनी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे. हिंसा कुठल्याच प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही, असेही मोदींनी म्हटले.

मोदींचा मन की बात हा कार्यक्रम रविवारी सकाळी 11 वाजता घेण्यात येतो. मात्र, प्रजासत्ताक दिनामुळे पंतप्रधानांनी आजची मन की बात सायंकाळी केली. मन की बात कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मोदींनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, शांती आणि चर्चेतूनच प्रत्येक गोष्टीचा मार्ग निघत असतो. हिंसा हे कुठल्याच समस्येचं उत्तर नाही. त्यामुळे, देशाच्या मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहनही मोदींनी नागरिकांना केलं. 

देशात सीएए आणि एनआरसीवरुन मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात येत आहेत. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिसांत्मक वळण लागले आहे. त्यास, अनुसरुनच मोदींनी हे वक्तव्य केलं. तसेच, खेलो इंडिया कार्यक्रमाशी एकरुप होण्याचं आवाहनही मोदींनी भारतीयांना केलं. तर, आसाम सरकारने अतिशय उत्कृष्टपणे ही स्पर्धा नियोजनबद्ध रितीने खेळवली, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले. पद्म पुरस्कारासाठी यंदा तब्बल 46 हजार अर्ज आले होते. ही संख्या 2014 च्या तुलनेत 20 टक्के अधिक आहे. या आकडेवारीवरुनच हे पुरस्कार जनतेचे पुरस्कार बनल्याचं दिसून येतंय, असे मोदींनी म्हटले 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलनMan ki Baatमन की बात