शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
2
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
3
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
4
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
5
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
6
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
7
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
8
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
9
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
11
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
12
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
13
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
14
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
15
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
16
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
17
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
18
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
19
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
20
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 06:03 IST

हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी संघ शताब्दी निमित्त आयोजित विजयादशमी उत्सवात व्यक्त केले.

नागपूर : काही लोक जाणूनबुजून एकतेवर प्रहार करण्याचे प्रयत्न करतात. श्रद्धास्थाने, महापुरुष व प्रार्थनास्थळांसंबंधात अनादराच्या घटना घडतात. लहानसहान बाबींवरून हिंसाचार होतो. एखाद्या विशिष्ट समुदायाला चिथावणी देण्यासाठी हे घडवले जाते. हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी संघ शताब्दी निमित्त आयोजित विजयादशमी उत्सवात व्यक्त केले.

नागपुरातील रेशीमबाग मैदानात आयोजित संघाच्या शताब्दी वर्षातील शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

‘संघात जातीभेद किंवा अस्पृश्यता नाही’संघाचे स्वयंसेवक भारतीय परंपरेतील एकता आणि सातत्य यांना महत्त्व देतात. संघामध्ये अस्पृश्यता किंवा जातीभेद नाही. तथापि, समाजात याबद्दल अनेक गैरसमज आहेत, जे दूर करणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघाच्या सामाजिक सौहार्दाच्या भावनेने मला नेहमीच प्रेरणा दिली आहे, असे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी सांगितले.  

महात्मा गांधींबाबत संघमंचावर गौरवोद्गारसरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. महात्मा गांधी आपल्या स्वातंत्र्याच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक आहेत. स्वातंत्र्योत्तर ‘स्व’ आधारित भारताची संकल्पना दृढ करणाऱ्या तत्वज्ञानींमध्ये महात्मा गांधी यांचे आदराचे स्थान आहे, असे मत  सरसंघचालकांनी व्यक्त केले. 

शांतता, स्थैर्य आणि प्रगती भारताच्या समृद्धीसाठी आवश्यकआपल्या शेजारील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. श्रीलंका, बांगलादेश पाठोपाठ नेपाळमध्ये सत्तांतरास कारणीभूत ठरलेल्या जनतेचा हिंसक उद्रेक चिंताजनक आहे. अशा अशांतता निर्माण करू पाहणाऱ्या शक्ती भारतात, तसेच जागतिक स्तरावर सक्रिय आहेत. परंतु, हिंसक उद्रेकांमध्ये इच्छित बदल घडवून आणण्याची शक्ती नसते. शेजारी देशांमध्ये आपल्या स्वतःच्या हितांचे रक्षण करण्यापेक्षा शांतता, स्थिरता, प्रगती भारताच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Violence is not the answer; democracy brings change: Mohan Bhagwat

Web Summary : RSS chief Mohan Bhagwat stressed unity, social harmony, and democracy at the Vijayadashami event. He highlighted Mahatma Gandhi's importance and the need for regional peace, while former President Kovind praised the RSS's inclusivity.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर