शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! मणिपूरमध्ये जमावाचा पोलीस स्टेशन लुटण्याचा प्रयत्न; सुरक्षा दलांवर झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 12:05 IST

Manipur Violence : इम्फाळमध्ये जमावाने भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न केला.

मणिपूरच्या इम्फाळ शहरात सुरक्षा दल आणि जमावामध्ये रात्रभर झालेल्या चकमकीत दोन नागरिक जखमी झाले. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. पोलीस आणि लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, काल रात्री मणिपूरमधील क्वाथा आणि कांगवई भागात स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला आणि आज सकाळपर्यंत मधूनमधून गोळीबार होत असल्याची माहिती आहे. जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. इम्फाळमध्ये जमावाने भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न केला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाकटा आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील कंगवाई येथून रात्रभर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलांवर गोळीबार केल्याचेही वृत्त आहे. इम्फाळ पश्चिम येथील इरिंगबाम पोलीस स्टेशन लुटण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या काळात एकही शस्त्र चोरीला गेलं नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दंगलखोरांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर रॅपिड एक्शन फोर्स (RAF) यांनी मध्यरात्रीपर्यंत इम्फाळमध्ये संयुक्त मोर्चा काढला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 1,000 लोकांच्या जमावाने पॅलेस कॉम्प्लेक्सजवळ असलेल्या इमारतींना आग लावण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएएफने जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी सांगितले की, इम्फाळमध्ये जमावाने आमदार बिश्वजित यांच्या घरालाही आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरएएफच्या ताफ्याने जमावाला पांगवले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मध्यरात्रीनंतर जमावाने सिंजमाई येथील भाजपा कार्यालयाचा घेराव केला, परंतु सैन्याने जमावाला पांगवल्यामुळे ते नुकसान करू शकले नाहीत.

ते म्हणाले की, अशाच प्रकारे मध्यरात्रीच्या सुमारास एका जमावाने भाजपाच्या शारदा देवी यांच्या इम्फाळमधील पोरामपेटजवळील घराची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षा दलांनी त्यांचा पाठलाग केला. मणिपूरमध्ये 3 मे रोजी हिंसक चकमकी सुरू झाल्या आणि अनुसूचित जमातीच्या (एसटी) दर्जाच्या मेईती समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी पहाडी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मोर्चा' काढण्यात आला. हिंसाचाराचा उद्रेक झाल्यापासून राज्यात आतापर्यंत सुमारे 120 लोकांचा मृत्यू झाला असून तीन हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार