शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

भयंकर! मणिपूरमध्ये जमावाचा पोलीस स्टेशन लुटण्याचा प्रयत्न; सुरक्षा दलांवर झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 12:05 IST

Manipur Violence : इम्फाळमध्ये जमावाने भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न केला.

मणिपूरच्या इम्फाळ शहरात सुरक्षा दल आणि जमावामध्ये रात्रभर झालेल्या चकमकीत दोन नागरिक जखमी झाले. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. पोलीस आणि लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, काल रात्री मणिपूरमधील क्वाथा आणि कांगवई भागात स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला आणि आज सकाळपर्यंत मधूनमधून गोळीबार होत असल्याची माहिती आहे. जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. इम्फाळमध्ये जमावाने भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न केला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाकटा आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील कंगवाई येथून रात्रभर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलांवर गोळीबार केल्याचेही वृत्त आहे. इम्फाळ पश्चिम येथील इरिंगबाम पोलीस स्टेशन लुटण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या काळात एकही शस्त्र चोरीला गेलं नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दंगलखोरांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर रॅपिड एक्शन फोर्स (RAF) यांनी मध्यरात्रीपर्यंत इम्फाळमध्ये संयुक्त मोर्चा काढला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 1,000 लोकांच्या जमावाने पॅलेस कॉम्प्लेक्सजवळ असलेल्या इमारतींना आग लावण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएएफने जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी सांगितले की, इम्फाळमध्ये जमावाने आमदार बिश्वजित यांच्या घरालाही आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरएएफच्या ताफ्याने जमावाला पांगवले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मध्यरात्रीनंतर जमावाने सिंजमाई येथील भाजपा कार्यालयाचा घेराव केला, परंतु सैन्याने जमावाला पांगवल्यामुळे ते नुकसान करू शकले नाहीत.

ते म्हणाले की, अशाच प्रकारे मध्यरात्रीच्या सुमारास एका जमावाने भाजपाच्या शारदा देवी यांच्या इम्फाळमधील पोरामपेटजवळील घराची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षा दलांनी त्यांचा पाठलाग केला. मणिपूरमध्ये 3 मे रोजी हिंसक चकमकी सुरू झाल्या आणि अनुसूचित जमातीच्या (एसटी) दर्जाच्या मेईती समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी पहाडी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मोर्चा' काढण्यात आला. हिंसाचाराचा उद्रेक झाल्यापासून राज्यात आतापर्यंत सुमारे 120 लोकांचा मृत्यू झाला असून तीन हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार