शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणात हिंसाचार; गुरुग्रामपर्यंत तणाव,  अनेक ठिकाणी वाहने जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 09:14 IST

मंगळवारी नूहमध्ये दोन दिवसांचा कर्फ्यू लागू केला. तेथे झालेल्या हिंसाचारात गृहरक्षक दलाच्या दोन जवानांसह ४ जण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले.

बलवंत तक्षक -

गुरुग्राम/चंडीगड : हरयाणातील हिंसाचाराचे लोण गुरुग्रामपर्यंत पोहोचले आहे. येथील एका धार्मिकस्थळावर जमावाने मंगळवारी हल्ला केला, त्यात एका जणाचा मृत्यू झाला. नूह जिल्ह्यात एक मिरवणूक रोखण्याच्या प्रयत्नात उसळलेल्या हिंसाचारात मृतांची संख्या पाच झाली, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.मंगळवारी नूहमध्ये दोन दिवसांचा कर्फ्यू लागू केला. तेथे झालेल्या हिंसाचारात गृहरक्षक दलाच्या दोन जवानांसह ४ जण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. दरम्यान, हरयाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी दावा केला की, हिंसा पूर्वनियोजित होती. तर अफवांमुळे हा हिंसाचार वाढल्याचे पोलिसांनी सांगितले.

कठोर कारवाई करणार : खट्टरहरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले की, या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. आजची घटना दुर्दैवी आहे. मी सर्व जनतेला राज्यात शांतता राखण्याचे आवाहन करतो.

आयपीएस ममतांमुळे २५०० जणांची सुटकाहिंसाचारादरम्यान अतिरिक्त पोलिस महासंचालक ममता सिंह यांनी दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एका धार्मिकस्थळात अडकलेल्या २५०० हून अधिक लोकांना समाजकंटकांपासून सुखरूप वाचविले. काही अंतरावर हल्लेखोरांनी जाळपोळ केली. अशा परिस्थितीत लोक तिथून गेले असते तर हिंसाचारात अडकले असते.

जमावाचा गोळीबारगुरुग्राममध्ये धार्मिकस्थळाजवळ जमावाने गोळीबार केला आणि आग लावली. यात दोन जण जखमी झाले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नूहमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या आणखी दोघांचा मृत्यू झाला.  नूह येथील हिंसाचारात २३ जखमींमध्ये दहा पोलिसांचा समावेश आहे. 

२१व्या शतकातील भारतात धर्माच्या नावावर होणारा हिंसाचार खपवून घेतला जाऊ शकत नाही आणि अशा फूट पाडणाऱ्या घटकांविरुद्ध लोक एकत्र न आल्यास, त्याचे परिणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागतील.- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

समाजकंटकांचा धुडगूसगुरुग्राममध्ये समाजकंटकांनी रस्त्यावर जे वाहन दिसेल, ते जाळून टाकले. त्यांनी पोलिस ठाणे पेटवून दिले. काही ठिकाणी लूटमार करून दुकाने जाळण्यात आली. एका वाहनाच्या शोरूममधून २०० बाइक लुटून शोरूमची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस