शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला; ISF च्या कार्यकर्त्यांकडून पोलीस लक्ष्य; वाहने फोडून पेटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 20:42 IST

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला असून पोलिसांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

West Bengal Violence: पश्चिम बंगालमध्ये नवीन वक्फ कायद्याविरुद्ध पुन्हा हिंसक आंदोलन झाले. मुर्शिदाबादनंतर पश्चिम बंगालमधील आणखी एका जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. सोमवारी दक्षिण २४ परगणा येथे इंडियन सेक्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट केली आणि  वाहनांची तोडफोड करत त्यांना आग लावली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. त्यामुळे आता परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कायद्यासोबत कुणी खेळू नका म्हणत शांततेचे आवाहन केले आहे.

वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात इंडियन सेक्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मोटारसायकली जाळल्या आणि पोलिस बस उलटवली. गेल्या आठवड्यात मुर्शिदाबादसह इतर जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर तीन लोकांचा मृत्यू झाला होता आणि २०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. मुस्लिमबहुल मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. तसेच घरे आणि दुकाने पेटवून देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी कडक पावले उचलत बळाचा वापर केला. त्यानंतर आता दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे.

भांगर परिसरात इंडियन सेक्युलर फ्रंटच्या समर्थकांची पोलिसांशी झटापट झाली. त्यात अनेक लोक जखमी झाले आणि पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. आयएसएफ समर्थक मध्य कोलकात्यातील रामलीला मैदानाकडे जात होते. तिथे सर्वजण वक्फ कायद्याविरुद्धच्या रॅलीत सहभागी होणार होते. मात्र पोलिसांकून या रॅलीसाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती. तरीही मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला होता. जमावाकडून बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये काही पोलिस जखमी झाले आहेत. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, ज्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला. 

कायद्याशी खेळू नका - ममता बॅनर्जी

दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोयला बैसाखीच्या निमित्ताने मुर्शिदाबाद हिंसाचाराबद्दल भाष्य केलं. "कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही. कोणत्याही लोकशाही समाजाचा पाया लोकांच्या आवाजावर आणि त्यांची मते ऐकून घेण्याच्या अधिकारावर अवलंबून असतो. लोकशाही पद्धतीने शांततेत निषेध करण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे, परंतु कायद्याचे उल्लंघन करण्याचा नाही," असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिस