शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला; ISF च्या कार्यकर्त्यांकडून पोलीस लक्ष्य; वाहने फोडून पेटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 20:42 IST

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला असून पोलिसांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

West Bengal Violence: पश्चिम बंगालमध्ये नवीन वक्फ कायद्याविरुद्ध पुन्हा हिंसक आंदोलन झाले. मुर्शिदाबादनंतर पश्चिम बंगालमधील आणखी एका जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. सोमवारी दक्षिण २४ परगणा येथे इंडियन सेक्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट केली आणि  वाहनांची तोडफोड करत त्यांना आग लावली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. त्यामुळे आता परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कायद्यासोबत कुणी खेळू नका म्हणत शांततेचे आवाहन केले आहे.

वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात इंडियन सेक्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मोटारसायकली जाळल्या आणि पोलिस बस उलटवली. गेल्या आठवड्यात मुर्शिदाबादसह इतर जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर तीन लोकांचा मृत्यू झाला होता आणि २०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. मुस्लिमबहुल मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. तसेच घरे आणि दुकाने पेटवून देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी कडक पावले उचलत बळाचा वापर केला. त्यानंतर आता दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे.

भांगर परिसरात इंडियन सेक्युलर फ्रंटच्या समर्थकांची पोलिसांशी झटापट झाली. त्यात अनेक लोक जखमी झाले आणि पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. आयएसएफ समर्थक मध्य कोलकात्यातील रामलीला मैदानाकडे जात होते. तिथे सर्वजण वक्फ कायद्याविरुद्धच्या रॅलीत सहभागी होणार होते. मात्र पोलिसांकून या रॅलीसाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती. तरीही मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला होता. जमावाकडून बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये काही पोलिस जखमी झाले आहेत. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, ज्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला. 

कायद्याशी खेळू नका - ममता बॅनर्जी

दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोयला बैसाखीच्या निमित्ताने मुर्शिदाबाद हिंसाचाराबद्दल भाष्य केलं. "कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही. कोणत्याही लोकशाही समाजाचा पाया लोकांच्या आवाजावर आणि त्यांची मते ऐकून घेण्याच्या अधिकारावर अवलंबून असतो. लोकशाही पद्धतीने शांततेत निषेध करण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे, परंतु कायद्याचे उल्लंघन करण्याचा नाही," असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिस