शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

गावच्या सुपुत्राने देशासाठी बलिदान दिले, पार्थिव येणार होते, गावकऱ्यांनी रस्त्यासाठी जमीन दान दिली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 09:56 IST

जवान विजय कुमार हे हिमाचल येथून गरीब कुटुंबातून येतात.

लेह-लडाखमध्ये शनिवारी झालेल्या अपघातात हिमाचल येथील एक जवान शहीद झाले. लान्स नाईक विजय कुमार असं या जवानाचे नाव आहे, त्यांचं गाव हिमाचल येथील दिमानी ब्लॉक बसंतपूर, जिल्हा शिमला ग्रामीण येथे आहे जवान विजय कुमार यांचे पार्थिव विमानाने चंदीगडला नेण्यात आले. यानंतर त्यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने शिमला येथे पोहोचले. मृतदेह शिमल्याहून बसंतपूरला रस्त्याने आणण्यात आला. शहीद विजय कुमार यांच्या गावकऱ्यांना विजय कुमार शहीद झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी कधी पोहोचेल आणि त्यांचे अंतिम दर्शन कधी होईल, याकडे सर्वजण वाट पाहत होते. 

जगावर वचक ठेवायला निघालेले! रशियाचे लुना २५ चंद्रावर काय आदळले, तिकडे चीनला जबर दणका बसला

विजय कुमार यांच्याबद्दल गाववाल्यांना खूप आपुलकी होती. त्यांचं गाव ग्रामीण भागातील असल्यामुळे रस्ते पक्के नव्हते. त्यात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. पण, गावकऱ्यांनी काही तासातच स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता बनवला. हा रस्ता ४०० मीटरचा आहे. रविवारी रात्री ८ वाजता रस्ता बनवण्याचे काम सुरू झाले आणि दुसऱ्या दिवशी रस्ता तयार झाला. 

रस्त्यासाठी जमीन केली दान

शहीद विजय कुमार यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक तेथे जमतील हे गावकऱ्यांना माहीत होते. विजय कुमार यांचे पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेण्यास कोणतीही अडचण येऊ नये, म्हणूनच हा रस्ता एका रात्रीत तयार करण्यात आला. रस्त्याच्या कामासाठी गावकऱ्यांनी आपली जमीनही दान केली होती. एवढेच नाही तर ग्रामस्थांनी या रस्त्याला शहीद विजयकुमार मार्ग असे नाव दिले आहे. ज्यांना येणारी पिढी आणि गावातील प्रत्येक व्यक्ती विजय कुमार यांच्या हौतात्म्याची आठवण ठेवेल. विजय कुमार यांच्या कुटुंबात फक्त आई-वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. एक मुलगा दीड वर्षाचा तर दुसरा सुमारे ७ वर्षांचा आहे. विजय कुमार यांनी सैन्यात भरती होण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. विजय कुमार यांनी सैन्यात १७ वर्षे सेवा दिली. स्वभावाने अतिशय चांगले होते. सगळ्यांच्यात मिळून मिसळून होते, विजय जेव्हा कधी गावात यायचे तेव्हा ते गावातील मुलांना खेळ आणि सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित करत असे, असं गावकरी सांगतात. 

शनिवारी लडाखमध्ये झालेल्या अपघातात हवालदार विजय कुमार शहीद झाल्याची बातमी घरी पोहोचताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. शहीद विजय यांच्या अंतिम यात्रेत शेकडो लोक सहभागी झाले होते. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशIndian Armyभारतीय जवान