शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

'विकास पागल हो गया है' , मोदींच्या 'घरात' राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 18:30 IST

गुजरात दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपा सरकारवर जोरदार हल्ला चढवला. गुजरातचं सरकार केवळ 5-6 उद्योगपतींसाठी चालवलं जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी रिमोट कंट्रोलने गुजरात सरकार चालवत आहेत अशी टीका त्यांनी केली.

अहमदाबाद - गुजरात दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपा सरकारवर जोरदार हल्ला चढवला. गुजरातचं सरकार केवळ 5-6 उद्योगपतींसाठी चालवलं जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी रिमोट कंट्रोलने गुजरात सरकार चालवत आहेत अशी टीका त्यांनी केली. या वेळी एका सभेत बोलताना त्यांनी विकास को क्या हुआ है? असा प्रश्न विचारून मोदी सरकारला चिमटा काढला. राहुलच्या या प्रश्नावर लोकांनी 'गांडो थयो छे' (वेडा झाला आहे) असं उत्तर देत सरकारविरोधातील नाराजी व्यक्त केली. 

यावेळी बोलताना, खिजदियातील सभेत राहुल गांधींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावरुन भाजपवर टीका केली.   'मेड इन इंडिया'चं आश्वासन दिलं होतं. पण सरदार पटेल यांचा पुतळा चीनमध्ये तयार होतो आहे, त्यामागे ‘मेड इन चायना’ असा शिक्कादेखील आहे. देशासाठी ही बाब लाजिरवाणी असल्याची टीका राहुल गांधींनी केली. गुजरातमध्ये नर्मदा नदीजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून पुतळा तयार होत असून नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2013  मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले होते.

जामनगरमध्ये बोलताना, राहुल गांधी म्हणाले, गुजरातमधील विद्यमान सरकार हे रिमोट कंट्रोलने चालते, दिल्लीतून हा रिमोट ऑपरेट केला जातो. राज्यातील सरकार हे दिल्ली नव्हे तर गुजरातमधूनच चालवणे गरजेचे आहे. कॉंग्रेसचं सरकार गुजरातमधूनच चालेल, अशी ग्वाही देत त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसचं सरकार आल्यास विकासकामं पुन्हा सुरू केली जातील, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल आणि सगळ्यांना हक्काचं घरही देऊ, अशी आश्वासनं राहुल यांनी दिली. पटेल समाजावर मोदी सरकारने गोळीबार केला, पण काँग्रेसला सर्वांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे असे सांगत त्यांनी पाटीदार समाजाला साद घालण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी