शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

मल्ल्या, मोदी, चोक्सीने बुडवलेली 40 टक्के रक्कम बॅंकांना परत; जप्त संपत्तीतून दिली भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 06:54 IST

बँकांचा एनपीए होणार कमी; जप्त संपत्तीतून दिली भरपाई

नवी दिल्ली : बँकांकडून कर्जे घेऊन परदेशात पसार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या, प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या संपत्तीपैकी ९०४१.५ कोटी रुपये कर्ज देणाऱ्या बँकांना परत करण्यात आले आहेत. यामुळे बँकांच्या बुडालेल्या २२ हजार कोटी रुपयांपैकी सुमारे ४० टक्के रक्कम परत मिळाली आहे. 

अंमलबजावणी संचालनालयाने या तीनही उद्योगपतींची १८,१७०.०२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यापैकी ९०४१.५ कोटींची मालमत्ता बँकांकडे हस्तांतरित केली. मल्ल्याच्या युनायटेड ब्रेवरिज लि. कंपनीचे ५८२४.५० कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकण्याला कर्ज वसुली संचालनालयाने बुधवारी स्टेट बँकेला परवानगी दिली. याआधीच या कंपनीचे वर्ग केलेले शेअर्स व आताचे शेअर्स मिळून ६६२४ कोटींचे शेअर्स ईडीने स्टेट बँकेकडे वर्ग केले. बँकांनी यापूर्वीच मल्ल्याच्या कंपनीचे शेअर्स विकून १३७५ कोटी वसूल केले आहेत.

बँकांकडून कर्ज घेऊन परदेशात पसार झालेल्या या त्रिकुटाने केलेल्या गैरव्यवहारांची चौकशी अंमलबजावणी संचालनालय, तसेच सीबीआयकडून केली जात आहे. पंजाब नॅशनल बँकेला हिरे व्यापारी नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी फसविले असून, ती रक्कम १३ हजार कोटी रुपये असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. 

मद्यसम्राट अशी ओळख सांगणाऱ्या विजय मल्ल्या आणि त्याच्या किंगफिशर एअर लाइन्सने केलेला घोटाळा ९ हजार कोटी रुपयांचा आहे. अशा प्रकारे या त्रिकुटाने केलेल्या घोटाळ्यांची रक्कम २२,५८५.८३ कोटी रुपये आहे. चौकशीमध्ये या तिघांनीही बनावट व्यक्ती व संस्था दाखवून पैशांचा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात मनी लँड्रिंगचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

नीरव मोदीची याचिका फेटाळली

भारतामध्ये प्रत्यार्पण करण्याला विरोध करणारी नीरव मोदीची याचिका इंग्लंडच्या उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून, त्याविरोधात अपील दाखल करणाऱ्याला पाच दिवसांची मुदत दिली आहे.  पंजाब नॅसनल बँकेमधील घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी याला भारतामध्ये परत पाठविण्याला ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री प्रीती पटेल यांनी १६ एप्रिल रोजी परवानगी दिली होती. या विरोधात नीरव मोदीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्याने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये काहीच अर्थ नसल्याचे सांगत न्यायमूर्तींनी त्याची याचिका फेटाळली आहे. १९ मार्च २०१९ रोजी त्याला अटक करण्यात आली असून, तेव्हापासून तो लंडनच्या तुरुंगातच आहे.

याचिका फेटाळली

याआधीच अन्य बँकांनी नीरव मोदीकडून १०६० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे या त्रिकुटाकडून बँकांना मिळालेली रक्कम ही ९०४१.५ कोटी रुपयांची असल्याचे ईडीने जाहीर केले आहे. या तीनही उद्योगपतींमुळे बँकांना झालेल्या एकूण तोट्यापैकी ४० टक्के रक्कम ही आतापर्यंत वसूल झाली असल्याचा दावाही ईडीतर्फे करण्यात आला आहे.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याbankबँकNirav Modiनीरव मोदीfraudधोकेबाजी