शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

माल्या म्हणतोय, मला येऊ द्या ना घरी; 13900 कोटींची मालमत्ता विकण्याचीही तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 12:40 IST

बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पळ काढणाऱ्या कर्जबुडव्या मद्य सम्राट विजय माल्यानं कर्ज फेडण्यासाठी आपली कोट्यवधींची संपत्ती विकण्याची तयारी दर्शवली आहे.

नवी दिल्ली - बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पळ काढणाऱ्या कर्जबुडव्या मद्य सम्राट विजय माल्यानं कर्ज फेडण्यासाठी आपली कोट्यवधींची संपत्ती विकण्याची तयारी दर्शवली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्ज फेडण्यासाठी उपलब्ध असलेली 13,900 कोटी रुपयांची मालमत्ता विकण्याची परवानगी देण्यात यावी, अशी याचिका माल्यानं 22 जूनला कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केली आहे.  माल्याने कर्नाटक उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेमध्ये ईडीने जप्त केलेली 1,600.45 कोटी रुपयांची स्थिर मालमत्ता, 7,609 कोटींचे शेअर्स, 215 कोटींचे फिक्स डिपॉझिट, युनायटेड स्पिरिट लिमिटेडमधील 2,888.14 कोटीचे शेअर्स आणि अन्य मालमत्ता विकण्याची तयारी दर्शवली आहे.

(विजय माल्याचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाला, 'मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय बनवलंय!')

दरम्यान, माल्यासा नव्या कायद्यान्वये फरार घोषित करून, त्यांची 12,500कोटींची संपत्ती जप्त करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नव्या कायद्यानुसार, मुंबईतील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या ‘फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याच्या’च्या आधारे ईडीने हा अर्ज करण्यात आला आहे. यानुसार, फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार कायदेपालन संस्थांना मिळाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने हा अध्यादेश आणला आहे.

ईडीच्या अर्जात माल्याच्या सर्व मालमत्ता जप्त करण्याचा उल्लेख केला आहे. माल्याला अप्रत्यक्षरीत्या ताब्यात ठेवलेल्या मालमत्तांचाही त्यात समावेश आहे. ईडीच्या अर्जात म्हटले आहे की, जप्ती प्रस्तावित करण्यात आलेल्या मल्ल्याच्या मालमत्तांचे एकूण मूल्य सुमारे 12,500 कोटी रुपये आहे. त्यात स्थावर मालमत्ता आणि समभागांचा समावेश आहे.ईडीकडून हा अर्ज दाखल झाल्यानंतर तीन दिवसांनी माल्यानं भारतीय बँकांचे कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली.

 

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याbankबँक