शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

“चीनने डाव्या नेत्यांना हाताशी धरून भारतविरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 12:32 IST

भारत अमेरिका यांच्यात करण्यात आलेला अणु करार रोखण्यासाठी चीनने भारतातील डाव्यांना हाताशी धरले होते, असा दावा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचीनने भारतातल्या डाव्यांना हाताशी धरून अणु करार रोखण्याचा प्रयत्न केलाचीनने डाव्या नेत्यांच्या माध्यमातून भारतविरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केलाभारतातील राजकारणात चीन सक्रिय झाल्याचे बहुतेक पहिले उदाहरण असावे

नवी दिल्ली:भारत आणि चीनमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिकच ताणले गेले. यानंतर आता चीनने डाव्या नेत्यांच्या माध्यमातून भारतविरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असा मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. (vijay gokhale claims in his book that china tried to use left to scuttle n deal indo us nuclear deal)

रेल्वेचे कन्फर्म रिझर्व्हेशन मिळाले नाही, तर प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास करणे शक्य?

भारताचे सेवानिवृत्त परराष्ट्र सचिव विजय गोखले यांचे ‘द लाँग गेम : हाऊ द चायनिज निगोशिएट विथ इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून, यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात २००७-०९ या काळात गोखले अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. भारत अमेरिका यांच्यात २००७-०८ मध्ये करण्यात आलेला अणु करार रोखण्यासाठी चीनने भारतातील डाव्यांना हाताशी धरले होते. तसेच भारतातील डाव्या नेत्यांच्या माध्यमातून चीनने देशात विरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक दावा विजय गोखले यांनी केला आहे. 

संघर्ष वाढणार? दिल्लीतील आमदारांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला; ‘आप’ला धक्का!

भारत-अमेरिका अणु करारात चीनकडून हस्तक्षेप

भारतातील राजकारणात चीन सक्रिय झाल्याचे बहुतेक हे पहिले उदाहरण असावे. चीनने भारतातील डाव्या पक्षांशी असलेल्या जवळच्या संबंधाचा वापर केला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माक्सर्वादी) या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेते बैठक वा उपचारासाठी चीनला जातील. सीमावाद आणि द्विपक्षीय संबंधासह अन्य मुद्द्यांवर दोन्ही पक्षांची भूमिका राष्ट्रवादी होती. पण, चीनला भारत-अमेरिका यांच्यात होणाऱ्या अणु कराराची चिंता सतावत होती. त्यामुळे भारत-अमेरिका अणु करारात चीनकडून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट गोखले यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. 

Vi मोजतंय अखेरच्या घटका! बिर्ला यांची मोठी ऑफर; सरकारच्या ताब्यात जाणार कंपनी?

भारतीय अमेरिकेकडे झुकण्याची चीनला भीती

डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये डाव्यांच्या किती प्रभाव आहे, याविषयी चीनला कल्पना होती आणि भारतीय अमेरिकेकडे झुकतील या भीतीवर चीनने खेळी केली. हे करताना स्वतः पडद्यामागे राहू अशी खबरदारी चीनने घेतली, असा मोठा दावाही विजय गोखले यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीXi Jinpingशी जिनपिंगPoliticsराजकारणVijay Gokhaleविजय गोखले