शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

“चीनने डाव्या नेत्यांना हाताशी धरून भारतविरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 12:32 IST

भारत अमेरिका यांच्यात करण्यात आलेला अणु करार रोखण्यासाठी चीनने भारतातील डाव्यांना हाताशी धरले होते, असा दावा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचीनने भारतातल्या डाव्यांना हाताशी धरून अणु करार रोखण्याचा प्रयत्न केलाचीनने डाव्या नेत्यांच्या माध्यमातून भारतविरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केलाभारतातील राजकारणात चीन सक्रिय झाल्याचे बहुतेक पहिले उदाहरण असावे

नवी दिल्ली:भारत आणि चीनमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिकच ताणले गेले. यानंतर आता चीनने डाव्या नेत्यांच्या माध्यमातून भारतविरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असा मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. (vijay gokhale claims in his book that china tried to use left to scuttle n deal indo us nuclear deal)

रेल्वेचे कन्फर्म रिझर्व्हेशन मिळाले नाही, तर प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास करणे शक्य?

भारताचे सेवानिवृत्त परराष्ट्र सचिव विजय गोखले यांचे ‘द लाँग गेम : हाऊ द चायनिज निगोशिएट विथ इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून, यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात २००७-०९ या काळात गोखले अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. भारत अमेरिका यांच्यात २००७-०८ मध्ये करण्यात आलेला अणु करार रोखण्यासाठी चीनने भारतातील डाव्यांना हाताशी धरले होते. तसेच भारतातील डाव्या नेत्यांच्या माध्यमातून चीनने देशात विरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक दावा विजय गोखले यांनी केला आहे. 

संघर्ष वाढणार? दिल्लीतील आमदारांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला; ‘आप’ला धक्का!

भारत-अमेरिका अणु करारात चीनकडून हस्तक्षेप

भारतातील राजकारणात चीन सक्रिय झाल्याचे बहुतेक हे पहिले उदाहरण असावे. चीनने भारतातील डाव्या पक्षांशी असलेल्या जवळच्या संबंधाचा वापर केला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माक्सर्वादी) या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेते बैठक वा उपचारासाठी चीनला जातील. सीमावाद आणि द्विपक्षीय संबंधासह अन्य मुद्द्यांवर दोन्ही पक्षांची भूमिका राष्ट्रवादी होती. पण, चीनला भारत-अमेरिका यांच्यात होणाऱ्या अणु कराराची चिंता सतावत होती. त्यामुळे भारत-अमेरिका अणु करारात चीनकडून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट गोखले यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. 

Vi मोजतंय अखेरच्या घटका! बिर्ला यांची मोठी ऑफर; सरकारच्या ताब्यात जाणार कंपनी?

भारतीय अमेरिकेकडे झुकण्याची चीनला भीती

डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये डाव्यांच्या किती प्रभाव आहे, याविषयी चीनला कल्पना होती आणि भारतीय अमेरिकेकडे झुकतील या भीतीवर चीनने खेळी केली. हे करताना स्वतः पडद्यामागे राहू अशी खबरदारी चीनने घेतली, असा मोठा दावाही विजय गोखले यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीXi Jinpingशी जिनपिंगPoliticsराजकारणVijay Gokhaleविजय गोखले