शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
3
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
4
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
5
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
6
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
7
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
8
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
9
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
10
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
11
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
12
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
13
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
14
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
15
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
16
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
17
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
19
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
20
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

"मी 15 मतं टाकली, काँग्रेसच्या एकाही एजंटला पोलिंग..."; भाजपा कार्यकर्त्याच्या विधानाने नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 13:36 IST

भाजपा नेत्यांच्या विधानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला, ज्यामध्ये ते खासदारांसमोर म्हणत आहेत की, त्यांनी खोटं मतदान केलं आणि काँग्रेसच्या एजंट पोलिंग बुथवर येऊ दिलं नाही. 

मध्य प्रदेशमध्येभाजपा नेत्यांच्या विजयानंतर आता काही अशी विधानं समोर येत आहेत ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. विदिशामध्ये अशीच एक घटना घडली आहे. भाजपा नेत्यांच्या विधानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला, ज्यामध्ये ते खासदारांसमोर म्हणत आहेत की, त्यांनी खोटं मतदान केलं आणि काँग्रेसच्या एजंट पोलिंग बुथवर येऊ दिलं नाही. 

काँग्रेसने याप्रकरणी निवडणूक आयोग आणि न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सागर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विदिशाच्या सिरोंज विधानसभेच्या लाटेरी तहसीलच्या भाजपा खासदार लता वानखेडे गुरुवारी परिसरात आयोजित एका कार्यक्रमासाठी पोहोचल्या होत्या. याच दरम्यान, भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं.

सिरोंज विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार उमाकांत शर्मा यांचे प्रतिनिधी आणि लाटेरी नगरपरिषदेच्या अध्यक्षांचे पती संजय अत्तू भंडारी लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या गोष्टी सांगत होते. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये संजय भंडारी दावा करताना दिसत आहेत की त्यांनी १३ मतदान केंद्रांवर काँग्रेसच्या एकाही एजंटला पोलिंग बुथवर बसू दिलं नाही. तसेच भाजपाच्या नगरसेवकाचे पती महेश साहू यांनीही १५ मतं खोट्या पद्धतीने दिल्याचं खासदारांना सांगितलं.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने हे निष्पक्ष निवडणुकीचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले की, भाजपाचे नेतेच खोटी मतं टाकल्याचं मान्य करत आहेत. काँग्रेस हे प्रकरण निवडणूक आयोग आणि न्यायालयात नेणार असून, पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करणार आहे.

मध्य प्रदेशातील विदिशामध्ये भाजपाच्या गटांमध्ये मोठा वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की हे प्रकरण हाणामारीत पोहोचलं. कुश जयंतीला उपस्थित राहण्यासाठी खासदार लता वानखेडे लतारी येथे पोहोचल्या होत्या. याच दरम्यान, भाजपा आमदार उमाकांत शर्मा यांच्या समर्थकांनी खासदारांना वाटेत अडवून काही मुद्द्यावरून वादावादी सुरू केली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस