शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

Video - समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दलाच्या जाहीर सभेत मंच कोसळला, नेते पडले खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 08:55 IST

Video Stage Collapses In SP RJP Rally : एकाच वेळी जास्त लोक मंचावर आल्याने मंच कोसळला आणि जे पायऱ्यांवर उभे होते ते देखील खाली पडल्याने काही जण जखमीही झाले आहेत.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील अलीगड येथे समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोक दलाच्या संयुक्त सभेदरम्यान मंच कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी येताच मंच तुटला आणि अनेक नेते खाली पडले. घाईगडबडीत आजूबाजूला उपस्थित लोकांनी नेते व कार्यकर्त्यांना बाहेर काढले. यादरम्यान काही जण जखमीही झाले आहेत. जयंत चौधरी अलीगडमधील इगलास येथे आयोजित सभेला संबोधित करणार होते. जयंत चौधरी मंचावर आल्याचे वृत्त समजताच जमावाने आरडाओरडा, धक्काबुक्की करत बॅरिकेड्स तोडले. 

एकाच वेळी जास्त लोक मंचावर आल्याने मंच कोसळला आणि जे पायऱ्यांवर उभे होते ते देखील खाली पडल्याने काही जण जखमीही झाले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी अलिगढच्या इगलास येथे होणाऱ्या समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदलाच्या संयुक्त सभेकडे शक्तीप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे. सपा-आरएलडीच्या या सभेद्वारे सपा प्रमुख अखिलेश यादव आणि आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी हे एकाच मंचावर सहभागी होणार होते. मात्र होम आयसोलेशन असल्यामुळे अखिलेश यादव या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत.

"तीन दिवस सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाही"

अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव आणि त्यांच्या मुलीचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सपा प्रमुखांची कोरोना चाचणी झाली. होम आयसोलेशनबाबत माहिती देताना त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. "कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याने, खबरदारी म्हणून आम्ही तीन दिवस सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाही" असं म्हटलं आहे. 

उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न 

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरएलडी आणि समाजवादी पक्षाने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्ष संयुक्त रॅलीद्वारे पश्चिम उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जाटबहुल भागात आरएलडी जास्त लक्ष देत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील या जिल्ह्यांमध्ये जयंत चौधरी हे शेतकरी आंदोलनात खूप सक्रिय राहिले आहेत. त्याचबरोबर या भागातील इतर समाजावर भाजपाचीही नजर आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण