शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Video: पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला ओपन चॅंलेज, हिंमत असेल तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 11:06 IST

राजीव गांधी यांच्यावर केलेल्या विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसला नरेंद्र मोदींनी खुलं आव्हान दिलं आहे.

चाईबासा - राजीव गांधी यांच्यावर केलेल्या विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसलानरेंद्र मोदींनी खुलं आव्हान दिलं आहे. जर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये, राहुल गांधींमध्ये हिंमत असेल तर निवडणुकीतील पुढचे दोन्ही टप्पे राजीव गांधींच्या मान-सन्मानाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. झारखंड येथील प्रचारसभेत बोलताना मोदींनी हे आव्हान दिलं आहे. 

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, बोफोर्स भ्रष्टाचाराचं नाव घेतलं तर काँग्रेसमध्ये वादळ आलं. राजीव गांधींचे नाव घेतलं तर त्यांच्यात पोटात इतकं दुखू लागलं की जोरजोरात रडू लागलेत. मात्र ते जेवढं रडतील तेवढे सत्यही लोकांसमोर येईल. हीच माणसं मर्यादेच्या पलीकडे जाऊन पंतप्रधानांना शिव्या देत होते असा टोला मोदींनी लगावला. 

अद्याप दिल्ली, भोपाळ आणि पंजाब येथील निवडणुकीतलं मतदान बाकी आहे. मी संपूर्ण काँग्रेस पक्षाला, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाला जाहीर आव्हान देतो की, जर त्यांच्यात हिंमत असेल तर येणाऱ्या दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवून दाखवावी. जर त्यांच्यात दम असेल तर निवडणुकीच्या मैदानात त्यांनी उतरावं मग कोणामध्ये किती ताकद आहे ते कळेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं होतं. माझ्या वडिलांवर टीका करुनही तुम्ही वाचू शकणार नाहीत असं राहुल यांनी सांगितलं होतं. तर अनेक जणांनी राजीव गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानांवरुन नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं.  

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी ?प्रचारसभेत बोलताना बोफोर्स घोटाळ्यावरुन राजीव गांधींवर निशाणा साधताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की, 'तुमच्या (राहुल गांधींच्या) वडिलांना त्यांच्या राज दरबारातील लोकांनी मोठा गाजावाजा करत मिस्टर क्लीन म्हटलं होतं. मात्र हळूहळू भ्रष्टाचारी नंबर वनच्या रुपात त्यांचं आयुष्य संपलं. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुकीला क्षमा करतो. मात्र फसवणूक करणाऱ्याला कधीही माफ करत नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली होती.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीRajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019