शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

Video: मुस्लिमांनो एकगठ्ठा काँग्रेसला मतदान करा, नवजोत सिंग सिद्धूंचे वादग्रस्त विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 15:40 IST

मुस्लिमांनी एकत्र येत एकजूट दाखवली तर नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित होईल असं विधान नवजोत सिंग सिद्धू यांनी बिहारच्या कटिहार येथे जनसभेला संबोधित करताना केलं आहे. 

कटिहार - आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. नेत्यांच्या भाषणबाजीकडे निवडणूक आयोगाचाही करडी नजर आहे. मायावती यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे स्टार प्रचारक नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी केलेलं विधान कदाचित वादाचा मुद्दा होऊ शकतो. मुस्लिम समुदायामध्ये फूट पाडण्यासाठी मतांचे विभाजन करण्यासाठी एमआयएमसारखी पार्टी अस्तित्त्वात आली आहे. मुस्लिमांनी एकत्र येत एकजूट दाखवली तर नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित होईल असं विधान नवजोत सिंग सिद्धू यांनी बिहारच्या कटिहार येथे जनसभेला संबोधित करताना केलं आहे. 

कटिहार लोकसभा मतदारसंघातील बलरामपुर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची जाहीर सभा झाली. या सभेला नवजोत सिंग सिद्धू यांनी भाजपाला टीकेचं लक्ष्य केलं. या लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्याकांची लोकसंख्या जास्त असल्याने मुस्लिम मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले तारीक अन्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जर मुस्लिमांनी एकत्र येत एकगठ्ठा काँग्रेसला मतदान केलं तर तारीक अन्वर यांना कोणी हरवू शकत नाही असा दावा नवजोत सिंग सिद्धू यांनी केला आहे. 

या प्रचारसभेत बोलताना नवजोत सिंग सिद्धू म्हणाले की, याठिकाणी लोकांना जातीपातीत  भांडून राजकारण केलं जात आहे. या मतदारसंघात मुस्लिमांनी अल्पसंख्याक बनून राहू नका, बहुसंख्यांक बना. या मतदारसंघात अल्पसंख्याकांचे मतदान ६२ टक्के आहे. जर भाजपावाले तुमच्या मतांमध्ये फूट पाडत असतील तर तुम्ही सगळे एकजूट दाखवा, जर असं झालं तर काँग्रेसला कोणी हरवू शकत नाही असं नवजोत सिंग यांनी सांगितले. 

त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर निशाना साधत नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधानांचा उल्लेख फेकू असा केला. याआधीही बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनीही मुस्लिमांबाबत असं विधान केलं होतं. ज्यामुळे मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी ४८ तास प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली आहे. 

मायावती यांनी देवबंद येथे मुस्लिम समुदायाला एकत्र राहण्याचं आवाहन करत सपा-बसपाला मतदान करा असं वक्तव्य केलं होतं. आचारसंहितेच्या नियमांनुसार देशातील राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अथवा पक्षाने धर्म आणि जातीच्या नावावर मतदान करण्याचं आवाहन करु शकत नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूMuslimमुस्लीमVotingमतदानBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019katihar-pcकटिहार