शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

Video - पावसाचा प्रकोप! मध्य प्रदेशमध्ये ४०० वर्षे जुनी भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू, २ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 15:16 IST

दतियामध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. राजगड किल्ल्याच्या खालच्या भागातील ४०० वर्षे जुनी भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या

मध्य प्रदेशातील दतियामध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. राजगड किल्ल्याच्या खालच्या भागातील ४०० वर्षे जुनी भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील पाच जणांनी आपला जीव गमावला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती निवारण पथक घटनास्थळी पोहोचलं आणि बचावकार्य सुरू केलं. 

दतिया येथील खलकापुरा परिसरात ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भिंत कोसळताच घरात उपस्थित असलेले सर्व नऊ लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने ढिगारा हटवून दोन जणांना बाहेर काढलं. मात्र उर्वरित सात जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यास उशीर झाला. शेजाऱ्यांनीच पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र, बचावकार्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गोंधळ घातला. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये निरंजन वंशकर, त्यांची पत्नी ममता, मुलगी राधा, दोन मुलं सूरज आणि शिवम याशिवाय निरंजनची बहीण प्रभा आणि तिचा नवरा किशन यांचा समावेश आहे. 

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांच्याही पायाला व शरीराच्या इतर भागात गंभीर दुखापत झाली आहे. बचाव मोहिमेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेची माहिती राज्य सरकारला दिली. यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशRainपाऊस