शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

Video - पावसाचा प्रकोप! मध्य प्रदेशमध्ये ४०० वर्षे जुनी भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू, २ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 15:16 IST

दतियामध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. राजगड किल्ल्याच्या खालच्या भागातील ४०० वर्षे जुनी भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या

मध्य प्रदेशातील दतियामध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. राजगड किल्ल्याच्या खालच्या भागातील ४०० वर्षे जुनी भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील पाच जणांनी आपला जीव गमावला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती निवारण पथक घटनास्थळी पोहोचलं आणि बचावकार्य सुरू केलं. 

दतिया येथील खलकापुरा परिसरात ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भिंत कोसळताच घरात उपस्थित असलेले सर्व नऊ लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने ढिगारा हटवून दोन जणांना बाहेर काढलं. मात्र उर्वरित सात जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यास उशीर झाला. शेजाऱ्यांनीच पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र, बचावकार्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गोंधळ घातला. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये निरंजन वंशकर, त्यांची पत्नी ममता, मुलगी राधा, दोन मुलं सूरज आणि शिवम याशिवाय निरंजनची बहीण प्रभा आणि तिचा नवरा किशन यांचा समावेश आहे. 

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांच्याही पायाला व शरीराच्या इतर भागात गंभीर दुखापत झाली आहे. बचाव मोहिमेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेची माहिती राज्य सरकारला दिली. यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशRainपाऊस