शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

Video - पावसाचा प्रकोप! मध्य प्रदेशमध्ये ४०० वर्षे जुनी भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू, २ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 15:16 IST

दतियामध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. राजगड किल्ल्याच्या खालच्या भागातील ४०० वर्षे जुनी भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या

मध्य प्रदेशातील दतियामध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. राजगड किल्ल्याच्या खालच्या भागातील ४०० वर्षे जुनी भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील पाच जणांनी आपला जीव गमावला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती निवारण पथक घटनास्थळी पोहोचलं आणि बचावकार्य सुरू केलं. 

दतिया येथील खलकापुरा परिसरात ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भिंत कोसळताच घरात उपस्थित असलेले सर्व नऊ लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने ढिगारा हटवून दोन जणांना बाहेर काढलं. मात्र उर्वरित सात जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यास उशीर झाला. शेजाऱ्यांनीच पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र, बचावकार्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गोंधळ घातला. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये निरंजन वंशकर, त्यांची पत्नी ममता, मुलगी राधा, दोन मुलं सूरज आणि शिवम याशिवाय निरंजनची बहीण प्रभा आणि तिचा नवरा किशन यांचा समावेश आहे. 

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांच्याही पायाला व शरीराच्या इतर भागात गंभीर दुखापत झाली आहे. बचाव मोहिमेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेची माहिती राज्य सरकारला दिली. यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशRainपाऊस