शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Video : 'चांद्रयान-2' झेपावणाऱ्या देशात, गावी पोहोचण्यासाठी दोरीवरची कसरत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 21:16 IST

भारताच्या सर्वात महत्वाकांक्षी चांद्रयान 2 मोहिमेचं काऊंटडाऊन सुरू झाल आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील सोनकच तहसीलमधील नागरिकांना नदीच्या पुरातून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील नागरिकांना चक्क सर्कशीतील कसरती किंवा डोंबाऱ्याच्या खेळाप्रमाणे जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. सर्कशीत किंवा डोंबाऱ्याच्या खेळात आपण नेहमीच पोटासाठी होणाऱ्या जीवघेण्या कसरती पाहतो. मात्र, इथं गावात पोहोचण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना डोंबारी बनाव लागत असल्याचं दिसतंय. 

भारताच्या सर्वात महत्वाकांक्षी चांद्रयान 2 मोहिमेचं काऊंटडाऊन सुरू झाल आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरी कोटा येथील धवन स्पेस सेंटरमधून सोमवारी पहाटे 2.51 वाजता चांद्रयान 2 चे उड्डाण होणार आहे. चंद्राकडे झेपावणाऱ्या या अवकाश यानाचे देशभरातून कौतुक होत आहे. भारत एकीकडे चंद्रावर पाय ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, दुसरीकडे आजही गावांना जोडणारा रस्ता नसल्याचे दिसून येते. तर, पावसाळ्यात नद्यांना आलेल्या पुरांमध्ये एका गावचा दुसऱ्या गावाशी संपर्कही तुटतो. या परिस्थितीत गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. 

मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील सोनकच तालुक्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील गावकऱ्यांना आपल्या गावात जाण्यासाठी चक्क दोरखंडावरुन जीव धोक्यात घालून चालावं लागत आहे. या व्हिडीओत दोन महिलाच चक्क दोन गावांना जोडण्यासाठी, दोन रस्त्यांना जोडण्यासाठी लावलेल्या दोरीवरुन चालताना दिसत आहेत. दोन हात वरील बाजून आणि दोन पाय खालील बाजूस दोरीशी जोडले आहेत. या दोरीच्या खाली पुराचे पाणी दिसत असून जीवघेणी कसरत करुन मार्ग काढावा लागत आहे. एका हातात डब्बा आणि एक हाता दोरीला घट्ट बांधलेला दिसतोय. तर, एक वयस्व महिला आपल्या खांद्यावर लहानग्या मुलाला घेऊन या दोरखंडावरुन चालताना दिसत आहे. पावसाच्या पाण्यामुळे दोन मार्गांमध्ये खंड पडला असून तेथे जाण्यास पुलही नाही. त्यामुळे गावकऱ्यांचा जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसत आहे. एकीकडे शेवटच्या गावापर्यंत वीज पोहोचविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, दुसरीकडे शेवटच्या गावापर्यंत आजही रस्ता पोहोचला नसल्याचे या व्हिडीओतून दिसून येते. 

मध्य प्रदेशातील मंडला येथेही पावसाच्या पुरात 5 मुले वाहून गेले असून त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात ओढावरणारी पुरावह परिस्थिती कित्येक जीवांना घेऊन जाते. मात्र, या निसर्ग आपत्तीपुढे सरकार हतबल झाल्याचे दिसून येतं.  

टॅग्स :riverनदीChandrayaan 2चांद्रयान-2floodपूरWomenमहिला