शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

Video : 'चांद्रयान-2' झेपावणाऱ्या देशात, गावी पोहोचण्यासाठी दोरीवरची कसरत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 21:16 IST

भारताच्या सर्वात महत्वाकांक्षी चांद्रयान 2 मोहिमेचं काऊंटडाऊन सुरू झाल आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील सोनकच तहसीलमधील नागरिकांना नदीच्या पुरातून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील नागरिकांना चक्क सर्कशीतील कसरती किंवा डोंबाऱ्याच्या खेळाप्रमाणे जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. सर्कशीत किंवा डोंबाऱ्याच्या खेळात आपण नेहमीच पोटासाठी होणाऱ्या जीवघेण्या कसरती पाहतो. मात्र, इथं गावात पोहोचण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना डोंबारी बनाव लागत असल्याचं दिसतंय. 

भारताच्या सर्वात महत्वाकांक्षी चांद्रयान 2 मोहिमेचं काऊंटडाऊन सुरू झाल आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरी कोटा येथील धवन स्पेस सेंटरमधून सोमवारी पहाटे 2.51 वाजता चांद्रयान 2 चे उड्डाण होणार आहे. चंद्राकडे झेपावणाऱ्या या अवकाश यानाचे देशभरातून कौतुक होत आहे. भारत एकीकडे चंद्रावर पाय ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, दुसरीकडे आजही गावांना जोडणारा रस्ता नसल्याचे दिसून येते. तर, पावसाळ्यात नद्यांना आलेल्या पुरांमध्ये एका गावचा दुसऱ्या गावाशी संपर्कही तुटतो. या परिस्थितीत गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. 

मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील सोनकच तालुक्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील गावकऱ्यांना आपल्या गावात जाण्यासाठी चक्क दोरखंडावरुन जीव धोक्यात घालून चालावं लागत आहे. या व्हिडीओत दोन महिलाच चक्क दोन गावांना जोडण्यासाठी, दोन रस्त्यांना जोडण्यासाठी लावलेल्या दोरीवरुन चालताना दिसत आहेत. दोन हात वरील बाजून आणि दोन पाय खालील बाजूस दोरीशी जोडले आहेत. या दोरीच्या खाली पुराचे पाणी दिसत असून जीवघेणी कसरत करुन मार्ग काढावा लागत आहे. एका हातात डब्बा आणि एक हाता दोरीला घट्ट बांधलेला दिसतोय. तर, एक वयस्व महिला आपल्या खांद्यावर लहानग्या मुलाला घेऊन या दोरखंडावरुन चालताना दिसत आहे. पावसाच्या पाण्यामुळे दोन मार्गांमध्ये खंड पडला असून तेथे जाण्यास पुलही नाही. त्यामुळे गावकऱ्यांचा जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसत आहे. एकीकडे शेवटच्या गावापर्यंत वीज पोहोचविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, दुसरीकडे शेवटच्या गावापर्यंत आजही रस्ता पोहोचला नसल्याचे या व्हिडीओतून दिसून येते. 

मध्य प्रदेशातील मंडला येथेही पावसाच्या पुरात 5 मुले वाहून गेले असून त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात ओढावरणारी पुरावह परिस्थिती कित्येक जीवांना घेऊन जाते. मात्र, या निसर्ग आपत्तीपुढे सरकार हतबल झाल्याचे दिसून येतं.  

टॅग्स :riverनदीChandrayaan 2चांद्रयान-2floodपूरWomenमहिला