शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

'दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत सक्षम, कोणाच्या मदतीची गरज नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 15:40 IST

दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत सक्षम आहे. कोणाच्या मदतीची गरज नाही. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करून हे दाखवून दिलं आहे असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देदहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत सक्षम आहे. कोणाच्या मदतीची गरज नाही. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करून हे दाखवून दिलं आहे असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. पॅराग्वे दौऱ्यादरम्यान बुधवारी (6 मार्च) भारतीय समुदायासमोर बोलत असताना व्यंकय्या नायडू यांनी असं सांगितलं आहे. दहशतवाद जगाच्या पाठीवरुन नष्ट झाला पाहिजे. मात्र, त्यासाठी दहशतवादाविरोधात जगातील सर्व नागरिकांनी एकजूट व्हायला हवं

नवी दिल्ली - 'दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत सक्षम आहे. कोणाच्या मदतीची गरज नाही. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करून हे दाखवून दिलं आहे' असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. पॅराग्वे दौऱ्यादरम्यान बुधवारी (6 मार्च) भारतीय समुदायासमोर बोलत असताना व्यंकय्या नायडू यांनी असं सांगितलं आहे.

व्यंकय्या नायडू यांनी 'आमचे संरक्षण करण्यास आम्ही तयार आहोत, कारण पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने पाकिस्तानला ज्या प्रकारे चोख प्रत्युत्तर दिलं त्यावरुन याची प्रचिती येते. या हल्ल्यामध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सैन्यावर किंवा नागरिकांवर हल्ला केला नाही. त्यामुळे कोणालाच त्रास झाला नाही, केवळ दहशतवाद्यांना त्रास सहन करावा लागला' असं म्हटलं आहे. तसेच 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे, याला कुठलाही धर्म नसतो. दहशत माजवणे हे वाईटपणाचे लक्षण आहे. दहशतवाद जगाच्या पाठीवरुन नष्ट झाला पाहिजे. मात्र, त्यासाठी दहशतवादाविरोधात जगातील सर्व नागरिकांनी एकजूट व्हायला हवं' असंही त्यांनी सांगितलं. 

'आम्हाला युद्ध नको आहे मात्र जर कोणी मुद्दाम आमची छेड काढली तर आम्ही त्याला सोडणार नाही' असंही व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. आपल्या शेजारील राष्ट्राने दहशतवाद हे त्यांच्या देशाचे धोरणच ठरवले आहे. हा देश या दहशतवाद्यांना अन्न, पैसा आणि शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देत आहे. मात्र, आता ते घाबरले आहेत. ते जरी सार्वजनिकरित्या दहशतवाद रोखण्याचे दावे करत असले तरी दहशतवादाला पैसा पुरवण थांबवत नाहीत, असा दावा व्यंकय्या नायडू यांनी केला आहे. 

पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकTerrorismदहशतवाद