शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

'...तर कर्नाटकात लोकसभेला काँग्रेसने १५-१६ जागा जिंकल्या असत्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 12:02 IST

लोकसभा निवडणुकीतील पराभवावर काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे. त्यात आता वरिष्ठ नेते पराभवाची कारणे सांगण्यासाठी पुढे येत आहेत.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांकडून पराभवाची कारणं देण्यात येत आहे. निवडणुकीत अनेक निर्णय चुकल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेसचे वरिष्ठनेते विरप्पा मोइली यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या झालेल्या पराभवाचे कारण सांगितले.

मोईली म्हणाले की, कर्नाटकमध्ये जेडीएस अर्थात जनता दल सेक्युलर पक्षासोबत युती केली नसती तर येथे काँग्रेसने सहज १५- १६ जागा जिंकल्या असत्या. लोकसभा निवडणुकीत युतीवर विश्वास ठेवणे सर्वात मोठी चूक होती, असंही त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत युती ही मोठी चूक होती. माझ्या स्वबळावर लढण्याच्या तयारीला सर्वांनीच विरोध केला. त्यावर त्यांना विचारण्यात आले की, काँग्रेसच्या लोकांनीच तुम्हाला विरोध केला का, त्यावर ते म्हणाले की, सत्ता आणि पैशाच्या जोरावर हे झालं. माजी केंद्रीयमंत्री विराप्पा मोइली चिकाबल्लापूरमधून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-जेडीएसचे उमेदवार होते. मात्र भाजपच्या उमेदवाराने येथे त्यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस युतीला केवळ एक जागा जिंकण्यात यश आले. तर भाजपने २५ जागांवर विजय मिळवला.

लोकसभा निवडणुकीतील पराभवावर काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे. त्यात आता वरिष्ठ नेते पराभवाची कारणे सांगण्यासाठी पुढे येत आहेत. याआधी काँग्रेसनेते सलमान खुर्शीद यांनी देखील मोदींच्या लोकप्रियतेसमोर कुणाही टीकू शकलं नसल्याचे नमूद केले. तसेच मोदींच्या त्सुनामीत सर्वाकाही वाहून गेले, परंतु, आम्ही वाचलो, असंही खुर्शीद म्हणाले.