शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

'...तर कर्नाटकात लोकसभेला काँग्रेसने १५-१६ जागा जिंकल्या असत्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 12:02 IST

लोकसभा निवडणुकीतील पराभवावर काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे. त्यात आता वरिष्ठ नेते पराभवाची कारणे सांगण्यासाठी पुढे येत आहेत.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांकडून पराभवाची कारणं देण्यात येत आहे. निवडणुकीत अनेक निर्णय चुकल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेसचे वरिष्ठनेते विरप्पा मोइली यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या झालेल्या पराभवाचे कारण सांगितले.

मोईली म्हणाले की, कर्नाटकमध्ये जेडीएस अर्थात जनता दल सेक्युलर पक्षासोबत युती केली नसती तर येथे काँग्रेसने सहज १५- १६ जागा जिंकल्या असत्या. लोकसभा निवडणुकीत युतीवर विश्वास ठेवणे सर्वात मोठी चूक होती, असंही त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत युती ही मोठी चूक होती. माझ्या स्वबळावर लढण्याच्या तयारीला सर्वांनीच विरोध केला. त्यावर त्यांना विचारण्यात आले की, काँग्रेसच्या लोकांनीच तुम्हाला विरोध केला का, त्यावर ते म्हणाले की, सत्ता आणि पैशाच्या जोरावर हे झालं. माजी केंद्रीयमंत्री विराप्पा मोइली चिकाबल्लापूरमधून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-जेडीएसचे उमेदवार होते. मात्र भाजपच्या उमेदवाराने येथे त्यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस युतीला केवळ एक जागा जिंकण्यात यश आले. तर भाजपने २५ जागांवर विजय मिळवला.

लोकसभा निवडणुकीतील पराभवावर काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे. त्यात आता वरिष्ठ नेते पराभवाची कारणे सांगण्यासाठी पुढे येत आहेत. याआधी काँग्रेसनेते सलमान खुर्शीद यांनी देखील मोदींच्या लोकप्रियतेसमोर कुणाही टीकू शकलं नसल्याचे नमूद केले. तसेच मोदींच्या त्सुनामीत सर्वाकाही वाहून गेले, परंतु, आम्ही वाचलो, असंही खुर्शीद म्हणाले.