शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

'...तर कर्नाटकात लोकसभेला काँग्रेसने १५-१६ जागा जिंकल्या असत्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 12:02 IST

लोकसभा निवडणुकीतील पराभवावर काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे. त्यात आता वरिष्ठ नेते पराभवाची कारणे सांगण्यासाठी पुढे येत आहेत.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांकडून पराभवाची कारणं देण्यात येत आहे. निवडणुकीत अनेक निर्णय चुकल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेसचे वरिष्ठनेते विरप्पा मोइली यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या झालेल्या पराभवाचे कारण सांगितले.

मोईली म्हणाले की, कर्नाटकमध्ये जेडीएस अर्थात जनता दल सेक्युलर पक्षासोबत युती केली नसती तर येथे काँग्रेसने सहज १५- १६ जागा जिंकल्या असत्या. लोकसभा निवडणुकीत युतीवर विश्वास ठेवणे सर्वात मोठी चूक होती, असंही त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत युती ही मोठी चूक होती. माझ्या स्वबळावर लढण्याच्या तयारीला सर्वांनीच विरोध केला. त्यावर त्यांना विचारण्यात आले की, काँग्रेसच्या लोकांनीच तुम्हाला विरोध केला का, त्यावर ते म्हणाले की, सत्ता आणि पैशाच्या जोरावर हे झालं. माजी केंद्रीयमंत्री विराप्पा मोइली चिकाबल्लापूरमधून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-जेडीएसचे उमेदवार होते. मात्र भाजपच्या उमेदवाराने येथे त्यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस युतीला केवळ एक जागा जिंकण्यात यश आले. तर भाजपने २५ जागांवर विजय मिळवला.

लोकसभा निवडणुकीतील पराभवावर काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे. त्यात आता वरिष्ठ नेते पराभवाची कारणे सांगण्यासाठी पुढे येत आहेत. याआधी काँग्रेसनेते सलमान खुर्शीद यांनी देखील मोदींच्या लोकप्रियतेसमोर कुणाही टीकू शकलं नसल्याचे नमूद केले. तसेच मोदींच्या त्सुनामीत सर्वाकाही वाहून गेले, परंतु, आम्ही वाचलो, असंही खुर्शीद म्हणाले.