शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

वसुंधरा राजेंच्या ताफ्यावर दगडफेक, भाजपानं काँग्रेसवर केला हल्ल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 15:29 IST

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ताफ्यावर काही आंदोलकांनी दगडफेक केली आहे. या हल्ल्यात वसुंधरा राजे थोडक्यात बचावल्या आहेत.

जोधपूर- राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ताफ्यावर काही आंदोलकांनी दगडफेक केली आहे. या हल्ल्यात वसुंधरा राजे थोडक्यात बचावल्या आहेत. वसुंधरा राजे जोधपूर जिल्ह्यातून जात असताना हा हल्ला करण्यात आला असून, हल्ल्याला काँग्रेसचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप भाजपानं केला आहे. वसुंधरा राजेंनी राज्यभरात गौरव यात्रा काढली आहे. या हल्ल्यानंतर वसुंधरा राजेंनी नियोजित कार्यक्रम रद्द केले असून, त्या विशेष विमानानं जोधपूरहून जयपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. तसेच अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नसल्याचंही वसुंधरा राजेंनी काँग्रेसला ठणकावून सांगितलं आहे.राजे म्हणाल्या, दगडफेक करण्याचा हा प्रकार काँग्रेस नेत्याच्या आदेशावरून झाला आहे. त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, मी अशा हल्ल्यांना घाबरत नाही. मी राजस्थानसाठी स्वतःचा जीवही देण्यास तयार आहे. दगडफेक करून त्या लोकांनी स्वतःची हतबलता दाखवून दिली आहे. काँग्रेसनं विकासाचं कोणतंही कार्य केलेलं नाही. आम्ही पुन्हा राजस्थानमध्ये सत्ता हस्तगत करू, असा विश्वासही वसुंधरा राजेंनी व्यक्त केला आहे. ज्या आंदोलकांनी दगडफेक केली ते माजी मुख्यमंत्र्यांचं नाव घेत होते. त्यामुळे तो नेता अशोक गेहलोत असल्याचीही चर्चाही आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.काल रात्री 9.15 वाजता एका सभेला संबोधित करत वसुंधरा राजेंच्या बसवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांचा पाठलाग केला, परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांना दगडफेक करणा-या आंदोलकांचे फुटेज मिळाले असून, लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.  राजस्थान काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार हिरालाल बिश्नोई यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. लोक भाजपावर नाराज आहेत, परंतु ही नाराजी दाखवण्यासाठी हिंसेचा मार्ग अवलंबू नये, असंही हिरालाल बिश्नोई म्हणाले आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपा