शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

वसुंधरा राजेंच्या ताफ्यावर दगडफेक, भाजपानं काँग्रेसवर केला हल्ल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 15:29 IST

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ताफ्यावर काही आंदोलकांनी दगडफेक केली आहे. या हल्ल्यात वसुंधरा राजे थोडक्यात बचावल्या आहेत.

जोधपूर- राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ताफ्यावर काही आंदोलकांनी दगडफेक केली आहे. या हल्ल्यात वसुंधरा राजे थोडक्यात बचावल्या आहेत. वसुंधरा राजे जोधपूर जिल्ह्यातून जात असताना हा हल्ला करण्यात आला असून, हल्ल्याला काँग्रेसचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप भाजपानं केला आहे. वसुंधरा राजेंनी राज्यभरात गौरव यात्रा काढली आहे. या हल्ल्यानंतर वसुंधरा राजेंनी नियोजित कार्यक्रम रद्द केले असून, त्या विशेष विमानानं जोधपूरहून जयपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. तसेच अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नसल्याचंही वसुंधरा राजेंनी काँग्रेसला ठणकावून सांगितलं आहे.राजे म्हणाल्या, दगडफेक करण्याचा हा प्रकार काँग्रेस नेत्याच्या आदेशावरून झाला आहे. त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, मी अशा हल्ल्यांना घाबरत नाही. मी राजस्थानसाठी स्वतःचा जीवही देण्यास तयार आहे. दगडफेक करून त्या लोकांनी स्वतःची हतबलता दाखवून दिली आहे. काँग्रेसनं विकासाचं कोणतंही कार्य केलेलं नाही. आम्ही पुन्हा राजस्थानमध्ये सत्ता हस्तगत करू, असा विश्वासही वसुंधरा राजेंनी व्यक्त केला आहे. ज्या आंदोलकांनी दगडफेक केली ते माजी मुख्यमंत्र्यांचं नाव घेत होते. त्यामुळे तो नेता अशोक गेहलोत असल्याचीही चर्चाही आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.काल रात्री 9.15 वाजता एका सभेला संबोधित करत वसुंधरा राजेंच्या बसवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांचा पाठलाग केला, परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांना दगडफेक करणा-या आंदोलकांचे फुटेज मिळाले असून, लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.  राजस्थान काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार हिरालाल बिश्नोई यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. लोक भाजपावर नाराज आहेत, परंतु ही नाराजी दाखवण्यासाठी हिंसेचा मार्ग अवलंबू नये, असंही हिरालाल बिश्नोई म्हणाले आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपा