शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राजस्थानमध्ये भाजपला मुख्यमंत्री सापडेना, वसुंधरा राजेंना दिल्लीत बोलावले; पुन्हा कमान मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 13:43 IST

राजस्थानमध्ये भाजपने प्रचंड बहुमताने विजय मिळवला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या नावाला मंजुरी दिली जात नाही.

राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठं यश मिळवले. सत्ता स्थापनेसाठी जेवढ्या जागेंची गरज आहे तेवढ्या जागा भाजपने जिंकल्या, पण अजुनही मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार यावर बाजपने शिक्कामोर्तब केलेले नाही. बाबा बालकनाथ ते राज्यवर्धनसिंग राठोड यांच्यापर्यंतच्या नावांची चर्चा जोरदार सुरू आहे.तर दुसरीकडे वसुंधरा राजे  यांना पुन्हा दिल्लीत बोलावले आहे. राजस्थानमध्ये पक्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद देऊ शकतो असं बोलले जात आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधरा राजेंचे शक्तीप्रदर्शन; हायकमांडला स्पष्ट केली आपली भूमिका

या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. यामुळे राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार हे शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. 

वसुंधरा राजे यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटीची वेळ मागितली असून त्या गुरुवारी चर्चा करू शकतात. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे या मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार आहेत. राजे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर सोमवारी त्यांच्या निवासस्थानी त्यांची आणि भाजपच्या ६० हून अधिक नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. मंगळवारी, आमदारांनी याचे वर्णन शिष्टाचार भेट म्हणून केले आणि पक्ष नेतृत्वाने राजे यांना राज्यातील सर्वोच्च पदासाठी निवडल्यास ते त्यांना पाठिंबा देतील असे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, वसुंधरा राजे यांनी आमदारांच्या भेटीनंतर पक्षाच्या हायकमांडशी चर्चा केली होती आणि त्या पक्षाच्या शिस्तप्रिय कार्यकर्त्या असल्याचे सांगितले होते. 

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण?

वसुंधरा राजे झालरापाटन मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि अर्जुन मेघवाल आणि पक्षाचे खासदार बाबा बालकनाथ आणि दिया कुमारी हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये आहेत. वसुंधरा राजे भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. २००३ ते २००८ आणि २०१३ ते २०१८ अशा दोन वेळा त्या राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्या मुख्यमंत्री चेहरा होत्या, या निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवाराचे नाव जाहीर केले नव्हते.

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपा