शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 16:45 IST

Varun Gandhi speech in Maneka Gandhi: वरुण गांधींच्या भाषणात भाजपा, पंतप्रधान मोदी यांचा नावाचा साधा उल्लेखही नव्हता

Varun Gandhi speech in Maneka Gandhi Election Campaign: भाजपाचे पिलीभीतचे माजी खासदार वरुण गांधी यांचे या निवडणुकीला तिकीट कापण्यात आले. केंद्र सरकारच्या काही निर्णयांवर आणि योजनांवर टीका केल्याने पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकींचे पाच टप्पे पूर्ण झाले, तसेच मनेका गांधी यांचा सुलतानपूरमध्ये प्रचार सुरु झाला, पण वरुण गांधी कुठेही दिसत नव्हते. मनेका गांधी यांनी नुकतेच एका सभेत सांगितले होते की २३ मे पासून वरुण गांधी प्रचाराला सुरुवात करतील. त्यानुसार, अखेर आजपासून वरुण गांधी प्रचारप्रक्रियेत 'अ‍ॅक्टिव्ह' झाल्याचे दिसले. आपल्या मातोश्री मनेका गांधी यांच्या प्रचारसभेत बोलताना वरुण गांधींनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. पण महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाचा अजिबात उल्लेख केला नाही.

वरुण गांधी यांनी आज सुलतानपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक रॅलीला संबोधित केले आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांच्यासाठी मते मागितली. वरुण म्हणाले, "देशभर निवडणुका होत आहेत पण देशात केवळ हे एकच मतदारसंघ क्षेत्र असे आहे की जिथे त्यांच्या नेत्याला कोणीही खासदार किंवा मंत्रीजी म्हणत नाहीत, तर लोक त्यांना माता जी म्हणतात." आई कधीच आपल्याला मुलाची साथ सोडत नाही. म्हणूनच आज मी केवळ माझ्या आईसाठी नव्हे तर संबंध सुलतानपूरच्या माताजींसाठी तुमचा जनाधार मागण्यासाठी आलो आहे. मी पहिल्यांदा सुलतानपूरला आलो तेव्हा मला इथे पित्यासारखं प्रेम मिळालं. पण आता मला इथल्या मातीत आईसारखी माया मिळते हे मी हक्काने सांगू शकतो. कारण आज सुलतानपूर हे मनेका गांधी या नावाने ओळखले जाते."

"जेव्हा इथले लोक बाहेर जातात आणि सुलतानपूरचे नाव सांगतात तेव्हा लोक विचारतात की, मनेका गांधी वाले सुल्तानपूर का? सुलतानपूरला एका खासदाराची गरज आहे जो जनतेला आपले कुटुंब समजतो. पिलीभीतमध्ये ज्याप्रमाणे वरुण गांधींचा नंबर प्रत्येकाकडे आहे, त्याचप्रमाणे सुलतानपूरमध्ये माझी आई रात्रीबेरात्री फोन उचलते आणि सर्वांना मदत करते. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मनेका गांधी यांनाच मोठ्या संख्येने मतदान करा," असे तो म्हणाला.

वरुण गांधींच्या भाषणात भाजपा, मोदींचा उल्लेखही नाही!

वरुण गांधी सभेला आले तेव्हा त्यांनी भाजपाचा गमछा घालणे टाळले. त्यांनी गळ्याभोवती गुंडाळलेल्या गमछावर 'राधे राधे' असे शब्द लिहिले होते. तसेच वरुण गांधी यांनी भाषणादरम्यान एकदाही पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाचे नाव घेतले नाही. त्यांनी फक्त त्यांचे वडील, त्यांची आई मनेका गांधी आणि विकासकामे यांचाच उल्लेख केला. या लोकसभा निवडणुकीत वरुण गांधी यांचे तिकीट भारतीय जनता पक्षाने रद्द केले. त्यांच्या जागी भाजपने काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या जितिन प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. त्याबाबतचा रोष वरुण यांच्या भाषणातून स्पष्ट दिसून आला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Varun Gandhiवरूण गांधीManeka Gandhiमनेका गांधीsultanpur-pcसुल्तानपुरBJPभाजपा