शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?
2
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
3
आजचे राशीभविष्य, ०९ डिसेंबर २०२५:आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल
4
भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले
5
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
6
सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज
7
रोजगार नव्हता… आमची लेकरं गोव्याला गेली, आता त्यांचा मृतदेहच परत येतोय; आसाममधील तीन तरुणांचा मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
8
क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले, पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क; न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी, संशयिताला अटक
9
सारे काही ‘बंगाल’साठी, प्रियांका गांधींचा पलटवार; सरकारला वर्तमान, भविष्यबाबत नाही तर भूतकाळात रस
10
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
12
हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार
13
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
14
धक्कादायक! एका बेडकाने घडविला २ रिक्षांचा अपघात; चालकांसह पाच जखमी; नेमकं काय घडलं?
15
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
16
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
17
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
18
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
19
विश्वस्त संस्थांतील विश्वस्त व्यवस्थांचे नियमन करणार, विधेयक सादर, चांगल्या कारभारासाठी तरतूद
20
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 16:45 IST

Varun Gandhi speech in Maneka Gandhi: वरुण गांधींच्या भाषणात भाजपा, पंतप्रधान मोदी यांचा नावाचा साधा उल्लेखही नव्हता

Varun Gandhi speech in Maneka Gandhi Election Campaign: भाजपाचे पिलीभीतचे माजी खासदार वरुण गांधी यांचे या निवडणुकीला तिकीट कापण्यात आले. केंद्र सरकारच्या काही निर्णयांवर आणि योजनांवर टीका केल्याने पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकींचे पाच टप्पे पूर्ण झाले, तसेच मनेका गांधी यांचा सुलतानपूरमध्ये प्रचार सुरु झाला, पण वरुण गांधी कुठेही दिसत नव्हते. मनेका गांधी यांनी नुकतेच एका सभेत सांगितले होते की २३ मे पासून वरुण गांधी प्रचाराला सुरुवात करतील. त्यानुसार, अखेर आजपासून वरुण गांधी प्रचारप्रक्रियेत 'अ‍ॅक्टिव्ह' झाल्याचे दिसले. आपल्या मातोश्री मनेका गांधी यांच्या प्रचारसभेत बोलताना वरुण गांधींनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. पण महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाचा अजिबात उल्लेख केला नाही.

वरुण गांधी यांनी आज सुलतानपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक रॅलीला संबोधित केले आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांच्यासाठी मते मागितली. वरुण म्हणाले, "देशभर निवडणुका होत आहेत पण देशात केवळ हे एकच मतदारसंघ क्षेत्र असे आहे की जिथे त्यांच्या नेत्याला कोणीही खासदार किंवा मंत्रीजी म्हणत नाहीत, तर लोक त्यांना माता जी म्हणतात." आई कधीच आपल्याला मुलाची साथ सोडत नाही. म्हणूनच आज मी केवळ माझ्या आईसाठी नव्हे तर संबंध सुलतानपूरच्या माताजींसाठी तुमचा जनाधार मागण्यासाठी आलो आहे. मी पहिल्यांदा सुलतानपूरला आलो तेव्हा मला इथे पित्यासारखं प्रेम मिळालं. पण आता मला इथल्या मातीत आईसारखी माया मिळते हे मी हक्काने सांगू शकतो. कारण आज सुलतानपूर हे मनेका गांधी या नावाने ओळखले जाते."

"जेव्हा इथले लोक बाहेर जातात आणि सुलतानपूरचे नाव सांगतात तेव्हा लोक विचारतात की, मनेका गांधी वाले सुल्तानपूर का? सुलतानपूरला एका खासदाराची गरज आहे जो जनतेला आपले कुटुंब समजतो. पिलीभीतमध्ये ज्याप्रमाणे वरुण गांधींचा नंबर प्रत्येकाकडे आहे, त्याचप्रमाणे सुलतानपूरमध्ये माझी आई रात्रीबेरात्री फोन उचलते आणि सर्वांना मदत करते. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मनेका गांधी यांनाच मोठ्या संख्येने मतदान करा," असे तो म्हणाला.

वरुण गांधींच्या भाषणात भाजपा, मोदींचा उल्लेखही नाही!

वरुण गांधी सभेला आले तेव्हा त्यांनी भाजपाचा गमछा घालणे टाळले. त्यांनी गळ्याभोवती गुंडाळलेल्या गमछावर 'राधे राधे' असे शब्द लिहिले होते. तसेच वरुण गांधी यांनी भाषणादरम्यान एकदाही पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाचे नाव घेतले नाही. त्यांनी फक्त त्यांचे वडील, त्यांची आई मनेका गांधी आणि विकासकामे यांचाच उल्लेख केला. या लोकसभा निवडणुकीत वरुण गांधी यांचे तिकीट भारतीय जनता पक्षाने रद्द केले. त्यांच्या जागी भाजपने काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या जितिन प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. त्याबाबतचा रोष वरुण यांच्या भाषणातून स्पष्ट दिसून आला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Varun Gandhiवरूण गांधीManeka Gandhiमनेका गांधीsultanpur-pcसुल्तानपुरBJPभाजपा