शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

वाराणसी! राहुल गांधींनी भाषण दिलेली जागा भाजपाने ५१ लीटर गंगाजलाने धुतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 18:19 IST

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला राम भक्तांनी सर्वप्रथम विरोध केला.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज वारणसीला पोहोचली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी गोदौलिया चौकात उपस्थितांना संबोधित केले. ही जागा भाजप नेत्यांनी गंगाजलाने धुतली आहे. यामुळे वाद सुरु होण्याची शक्यता आहे. 

राहुल यांची सभा झाल्यानंतर यात्रा लक्साकडे निघाली. यानंतर भाजपाचे नेता मुन्ना लाल यादव यांनी ५१ लीटर गंगाजलाने चौक धुतला. यावेळी यादव यांनी राहुल गांधी अशुद्ध असल्याचा आरोप केला. तर तेथे उपस्थित लोकांनी राहुल गांधी यापूर्वी कधीही काशी विश्वनाथ मंदिरात आले नव्हते, असा आरोप केला. 

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला राम भक्तांनी सर्वप्रथम विरोध केला. सकाळी ही यात्रा निघाल्यानंतर काही वेळातच राम भक्तांनी त्यांना भगवा ध्वज दाखवला. यावर जय श्री राम लिहिलेले होते. गोहत्या करणाऱ्यांचे समर्थन करणाऱ्या राहुल गांधींसारख्या भ्रष्ट व्यक्तीचे काशीत आगमन झाल्यामुळे काशी अपवित्र झाली आहे, असे निषेध करणाऱ्या नेत्यांचे म्हणणे होते. 

भगवे झेंडे दाखविणाऱ्यांना काँग्रेस किंवा राहुल गांधी यांच्याकडून कोणताही विरोध करण्यात आला नाही. परंतु राहुल गांधींच्या निषेधादरम्यान त्यांच्या एका समर्थकाने रामभक्तांसमोर उभे राहून रामभक्तांना काळे झेंडे दाखवण्यास सुरुवात केली. तणाव वाढण्यापूर्वी हा व्यक्ती यात्रेत पुढे निघून गेला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस