शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत' एक्स्प्रेस भगव्या रंगात का? रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं वैज्ञानिक कारण, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 17:34 IST

वंदे भारत ट्रेनवरून भगवा हाच सरकारचा अजेंडा असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर आता रेल्वेमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. 

नवी दिल्ली : देशभरात वंदे भारत एक्स्प्रेस जाळे विणले जात असून अनेक महत्त्वाच्या स्थानकांना ही एक्स्प्रेस जोडली जात आहे. सध्या भारताच्या विविध भागात ३० हून अधिक वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेस निळ्या आणि भगव्या रंगात रेल्वे रुळांवर धावत आहे. यावरूनही सध्या राजकारण सुरू आहे. वंदे भारत ट्रेनवरून भगवा हाच सरकारचा अजेंडा असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर आता रेल्वेमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. 

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेनचा रंग भगवा असण्याला शुद्ध वैज्ञानिक तर्क असल्याचे म्हटले आहे. यात कोणतेही राजकारण नसल्याचेही ते म्हणाले. हा पूर्णपणे वैज्ञानिक तर्क आहे. देशातील पहिली सेमी-हाय स्पीड ट्रेन वंदे भारतचा रंग भगवा होण्यामागे कोणतेही राजकीय कारण नाही, असे सांगत अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे. यामागे पूर्णपणे शास्त्रीय कारण असल्याचे त्यांनी सांगितले.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, विज्ञानानुसार मानवी डोळ्याला पिवळा आणि भगवा असे दोन रंग सहज दिसतात. यामुळेच युरोपमधील 80 टक्क्यांहून अधिक गाड्या एकतर भगव्या किंवा पिवळ्या रंगाच्या असतात. या दोन रंगांव्यतिरिक्त, चांदीसारखे आणखी काही रंग आहेत, जे पिवळ्या आणि भगव्यासारखे चमकदार आहेत, परंतु जर आपण आपल्या डोळ्यांबद्दल बोललो तर हे दोन रंग डोळ्यांसाठी सर्वोत्तम मानले जातात. 

याच कारणामुळे विमाने आणि जहाजांचे ब्लॅक बॉक्स देखील भगव्या रंगाचे असतात. तसेच, एनडीआरएफने वापरलेल्या रेस्क्यू बोटी, लाईफ जॅकेट यासारख्या गोष्टीही भगव्या रंगाच्या असतात, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. दरम्यान, सध्या देशात अनेक वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. या रेल्वेत आरामदायक खुर्ची आणि इतर अनेक सुविधा आहेत. वाढता प्रतिसाद पाहून रेल्वेने स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवrailwayरेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस