शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

वंदे भारत' एक्स्प्रेस भगव्या रंगात का? रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं वैज्ञानिक कारण, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 17:34 IST

वंदे भारत ट्रेनवरून भगवा हाच सरकारचा अजेंडा असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर आता रेल्वेमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. 

नवी दिल्ली : देशभरात वंदे भारत एक्स्प्रेस जाळे विणले जात असून अनेक महत्त्वाच्या स्थानकांना ही एक्स्प्रेस जोडली जात आहे. सध्या भारताच्या विविध भागात ३० हून अधिक वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेस निळ्या आणि भगव्या रंगात रेल्वे रुळांवर धावत आहे. यावरूनही सध्या राजकारण सुरू आहे. वंदे भारत ट्रेनवरून भगवा हाच सरकारचा अजेंडा असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर आता रेल्वेमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. 

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेनचा रंग भगवा असण्याला शुद्ध वैज्ञानिक तर्क असल्याचे म्हटले आहे. यात कोणतेही राजकारण नसल्याचेही ते म्हणाले. हा पूर्णपणे वैज्ञानिक तर्क आहे. देशातील पहिली सेमी-हाय स्पीड ट्रेन वंदे भारतचा रंग भगवा होण्यामागे कोणतेही राजकीय कारण नाही, असे सांगत अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे. यामागे पूर्णपणे शास्त्रीय कारण असल्याचे त्यांनी सांगितले.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, विज्ञानानुसार मानवी डोळ्याला पिवळा आणि भगवा असे दोन रंग सहज दिसतात. यामुळेच युरोपमधील 80 टक्क्यांहून अधिक गाड्या एकतर भगव्या किंवा पिवळ्या रंगाच्या असतात. या दोन रंगांव्यतिरिक्त, चांदीसारखे आणखी काही रंग आहेत, जे पिवळ्या आणि भगव्यासारखे चमकदार आहेत, परंतु जर आपण आपल्या डोळ्यांबद्दल बोललो तर हे दोन रंग डोळ्यांसाठी सर्वोत्तम मानले जातात. 

याच कारणामुळे विमाने आणि जहाजांचे ब्लॅक बॉक्स देखील भगव्या रंगाचे असतात. तसेच, एनडीआरएफने वापरलेल्या रेस्क्यू बोटी, लाईफ जॅकेट यासारख्या गोष्टीही भगव्या रंगाच्या असतात, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. दरम्यान, सध्या देशात अनेक वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. या रेल्वेत आरामदायक खुर्ची आणि इतर अनेक सुविधा आहेत. वाढता प्रतिसाद पाहून रेल्वेने स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवrailwayरेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस