शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

वाजपेयी सरकारने सोडलेला 'तो' दहशतवादी ठरला अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 8:56 AM

काश्मीरमध्ये दबदबा कायम ठेवण्यासाठी दहशतवादी संघटना आक्रमक होत नवीन संघटनेच्या माध्यमातून राज्यात दहशत पसरविण्याचं काम करत आहेत

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील क्रूर दहशतवादी मुश्ताक अहमद जरगर याने पुन्हा जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. मुळचा काश्मीरमधील रहिवासी असलेला मुश्ताक अहमद जरगर हा जैश-ए-मोहम्मद आणि अल-उमर-मुजाहिदीन यांच्यात समन्वय साधण्याचं काम करतो. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरविण्याच काम जरगर करत असतो. 

काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षायंत्रणांनी केलेल्या गोळीबारात जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये दबदबा कायम ठेवण्यासाठी दहशतवादी संघटना आक्रमक होत नवीन संघटनेच्या माध्यमातून राज्यात दहशत पसरविण्याचं काम करत आहेत. भारतीय विमानाला हायजॅक केल्यामुळे तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने मुश्ताक अहमद जरगरला मुक्त केलं होतं. बुधवारी अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुश्ताकचा सहभाग असल्याचं आता समोर येत आहे. अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 5 जवान शहीद झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुश्ताक अहमदची महत्वाची भूमिका होती. 

अनंतनाग येथे CRPF च्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, पाच जवान शहीद

अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात 24 डिसेंबर 1999 दहशतवाद्यांनी भारतीय विमानाचं अपहरण केलं होतं. त्यात 176 प्रवासी आणि 15 हवाई कर्मचारी होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी सरकारकडे कैदेत असलेल्या 35 दहशतवाद्यांची सुटका तसेच 200 मिलियन अमेरिकी डॉलर्सची मागणी केली होती. सरकारने दहशतवाद्यांची मागणी मान्य केली त्यानंतर 3 दहशतवाद्यांना सोडण्याच्या अट सरकारकडून दहशतवाद्यांना घालण्यात आली. वाजपेयी सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री जसवंत सिन्हा स्वत: मसूद अजहर, अहमद जरगर, शेख अहमद उमर सईद यांना घेऊन प्रवाशांची सुटका करण्यासाठी गेले होते. 

अनंतनाग येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात 5 जवान शहीद झाले तर अन्य 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अनंतनाग दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड अहमद जरगर याला मानलं जातंय. या हल्ल्यामागे अल-उमर-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणांना आहे.

सूत्रांची माहिती अशी आहे की, अल-उमर-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत एकट्याने असा हल्ला करण्याची क्षमता नाही. त्यामुळे जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी हातमिळवणी करुन अल-उमर-मुजाहिदीनने हा दहशतवादी हल्ला घडवून आणला असावा. जम्मू-काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरविण्यासाठी या दोन्ही दहशतवादी संघटना एकत्र आल्या आहेत. काश्मीर खोऱ्यात पुन्हा दहशतवाद अहमद जरगर हातपाय पसरण्याचं काम करत आहे.   

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी