शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 18:18 IST

India Pakistan Tension Update: पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना मोदींनी तिन्ही लष्करप्रमुखांना पाकिस्तानच्या लष्करी कारवाईला जशास तसे उत्तर देण्याचा मेसेज दिला. 

India Pakistan Latest Update: पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधी धुडकावून लावल्यानंतर भारताने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत मोदींनी 'पाकिस्तानकडून गोळी आली, तर आपल्याकडून गोळ्याने उत्तर द्यायचं' असा स्पष्ट संदेश दिला. लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमधून भारताने तीन गोष्टी साध्य केल्याचे त्यांनी उदाहरण देऊन सांगितले. एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एएनआयच्या रिपोर्टनुसार, पंतप्रधान मोदी बैठकीत म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. जर त्यांनी गोळीबार केला, तर आपणही गोळीनेच उत्तर द्यायचं. त्यांनी हल्ला केला, तर आपणही हल्ल्यानेच उत्तर द्यायचं. वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा. त्यांच्या हवाई तळांवरील हल्ले, हा या ऑपरेशनमधील निर्णायक क्षण होता, असे ते म्हणाले. 

हा भारताने दिलेला महत्त्वाचा मेसेज होता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "मोदी बैठकीत म्हणाले की, 'बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावरील सर्वात घातक हल्ला होता. सगळ्यात शक्तिशाली अस्त्र त्यासाठी वापरलं गेलं. जैश ए मोहम्मदची निर्मिती आयएसआयने केलेली आहे आणि भारताने त्यांना हा महत्त्वाचा मेसेज दिला."

ऑपरेशन सिंदूरमधून तीन गोष्टी साध्य केल्या

सूत्रांनी सांगितले की, भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिमेतून तीन गोष्टी साध्य केल्या. लष्करी उद्दिष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींनी मिट्टी मैं मिला देंगे म्हटलं होतं. बहावलपूर, मुरिदके आणि मुजफ्फराबादमधील अड्डे मातीत गाडले. 

वाचा >>'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा

दुसरं राजनैतिक उद्दिष्ट होतं, ते म्हणजे सिंधू जल कराराचा संबंध सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांशी आहे. जोपर्यंत सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबत नाही, तोपर्यंत हा स्थगित राहील. 

तिसरी गोष्ट म्हणजे घुस के मारेंगे. भारताने पाकिस्तान आतमध्ये शिरून त्यांच्या ह्रदयवरच हल्ला केला. ही मोहीम खूप यशस्वी ठरली आहे, असेही मोदी बैठकीत म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक