शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'सावरकरांचे नाव घेऊ नका', महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांचा दबाव; राज्यातील वाद पोहचला थेट दिल्लीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 06:45 IST

२०१९च्या मानहानीच्या खटल्यात सुरत कोर्टाने दोषी ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल यांना शुक्रवारी अपात्र घोषित केले हाेते. 

नवी दिल्ली : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना गेल्या आठवड्यात लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर साेमवारी गृहनिर्माण समितीने त्यांना १२ तुघलक लेन येथील त्यांचा अधिकृत बंगला रिकामा करण्याची नोटीस पाठविली आहे. २००५ पासून ज्या बंगल्यात राहुल गांधी राहत हाेते ताे २२ एप्रिलपर्यंत रिकामा करण्यास सांगण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. २०१९च्या मानहानीच्या खटल्यात सुरत कोर्टाने दोषी ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल यांना शुक्रवारी अपात्र घोषित केले हाेते. 

काँग्रेस आणि इतर अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी सोमवारी लोकसभेतून राहुल गांधी यांना अपात्र ठरवल्याच्या विरोधात संसद परिसरात निदर्शने करत अदानी समूहाशी संबंधित प्रकरणी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी केली. यावेळी काँग्रेस आणि इतर काही मित्रपक्षांच्या खासदारांनी काळे कपडे परिधान करून राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा निषेध केला.

लोकसभेत गेल्या दोन आठवड्यांप्रमाणे सोमवारी प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य तासाचे कामकाज होऊ शकले नाही. गदारोळामुळे कामकाज एकवेळ तहकूब केल्यानंतर दुपारी ४.१० वाजताच्या सुमारास दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या गदारोळात वित्त विधेयक २०२३ मध्ये राज्यसभेने शिफारस केलेल्या दुरुस्तीला सभागृहाने मंजुरी दिली. राज्यसभेचे कामकाज अवघ्या दहा मिनिटांत दिवसभरासाठी तहकूब झाले.

राज्य विधानसभांमध्ये गदारोळ 

देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या अपात्रतेप्रकरणी निषेध करण्यात आला. अनेक राज्यांत विधानसभांतही या प्रश्नावरून गदारोळ झाला. काँग्रेस आमदारांनी सोमवारी ओडिशा विधानसभेत ‘काळा दिवस’ पाळला. विरोधी पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि काँग्रेसने पुद्दुचेरी विधानसभेत सभात्याग केला. काँग्रेस आमदारांनी सोमवारी बिहार विधानसभेत हंगामा केला.  काँग्रेसचे सर्व आमदार दंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि काळे कपडे घालून सभागृहात पोहोचले होते.

सावरकरांचे नाव घेऊ नका काँग्रेस खासदारांचा दबाव

सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील राजकीय वाद आता मुंबईपासून दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. संसद भवनात काँग्रेसच्या खासदारांनी ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना दबक्या आवाजात सांगितले की, राहुल गांधी यांनी सावरकर यांचे नाव न घेणेच महाराष्ट्र काँग्रेसच्या हिताचे ठरेल. याबाबत पक्षांतर्गत चर्चा करू असे आश्वासन सोनिया गांधी यांनी या खासदारांना दिले आहे.

गुजरात विधानसभेतून १६ आमदार निलंबित

निदर्शने करणाऱ्या काँग्रेसच्या १७ पैकी १६ आमदारांना सोमवारी विधानसभेतून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी २९ मार्चपर्यंत निलंबित करण्यात आले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा