शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

अंघोळ कशी केली, शौचास कुठे गेलात? कामगारांनी सांगितली 'त्या' 17 दिवसांची दिनचर्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:22 IST

Uttarkashi Tunnel Rescue: मानसिक स्थिती नीट ठेवण्यासाठी मोबाईलवर लुडो खेळायचे, एकमेकांशी गप्पा मारायचे...

Uttarkashi Tunnel Story:उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुखरूप सुटका झाल्यानंतर संपूर्ण देशाने सुटकेचा नि:श्वास सोडला. सिल्क्यरा बोगदा बचाव मोहिमेत विविध प्रकारचे अडथळे समोर आले, पण बचाव पथकाने ही आव्हाने दूर केली आणि कामगारांना सुखरुप बाहेर काढले. खबरदारीचा उपाय म्हणून कामगारांना चिन्यालीसौर येथील तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व कामगारांची प्रकृती ठीक आहे. हे सर्व कामगार 17 दिवस बोगद्यात काय करत होते, त्यांची दैनंदिन दिनचर्या काय होती, ते काय खायचे, शौच्छास कुठे जायचे, अशी अनेक प्रश्ने तुमच्या मनात असतील. याबद्दल आपण जाणून घेऊ...

दुसरे आयुष्य मिळाले

एखादा व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ आहे, कधीही त्याचा श्वास थांबू शकतो, अशावेळी त्याची मानसिक स्थिती कशी असेल, याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. अतिशय कठीण परिस्थितीत हे कामगार मृत्यूशी झूंज देत होते. जगण्याची तीव्र इच्छा आणि कोणीतरी आपल्याला वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहे, या विश्वासानेच कामगार जगू शकले. झारखंडचे रहिवासी चमरा ओराव सांगतात की, मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी ते फोनवर लुडो खेळायचे, बोगद्यात नैसर्गिकरित्या येणाऱ्या पाण्यात आंघोळ करायचे. 28 नोव्हेंबर रोजी बाहेर आल्यानंतर नवजीवन मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

अशी होती तीनचर्याओराव सांगतात की, 12 नोव्हेंबर रोजी ते बोगद्यात काम करत असताना मोठा आवाज आला आणि अचानक माती कोसळू लागली. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ढिगाऱ्यांमुळे तिथेच अडकले. बऱ्याच वेळापासून अडकलो आहोत, हे लक्षात आल्यानंतर सर्व कामगारांची अस्वस्थता वाढली. कुणाकडेच खाण्यापिण्याला काही नव्हते. ते फक्त देवाकडे जीव वाचण्यासाठी प्रार्थना करू शकत होते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, एकाही कामगाराने जगण्याची आशा सोडली नाही. 

सुमारे 24 तासांनंतर, म्हणजेच 13 नोव्हेंबरला, कामगारांना पाईपद्वारे भात पाठवला गेला. जेवण मिळाल्यावर कोणीतरी आम्हाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची खात्री पटली आणि आमच्या अंगात आनंदाची लाट उसळली. त्यावेळी खात्री पटली की, आता आपला जीव वाचू शकतो. दिवसभर टाईमपास करणं खूप अवघड जात होतं. ज्यांच्याकडे मोबाईल फोन होता, त्यावर लुडो खेळू लागलो. नेटवर्क नसल्याने कुणाशीही बोलता येत नव्हते. आम्ही एकमेकांशी बोलून आमच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करायचो. आंघोळीसाठी पाण्याचा नैसर्गिक स्रोत होता आणि शौचासाठी जागा बनवली होती. झारखंडचे रहिवासी विजय होरो सांगतात की, आता ते त्यांच्या राज्याबाहेर कुठेही कामासाठी जाणार नाहीत. झारखंडमध्येच मिळेल ती नोकरी करणार. बाहेर राज्यात जाण्याची गरज भासली, तर धोकादायक कामे करणार नाही. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAccidentअपघात