शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अंघोळ कशी केली, शौचास कुठे गेलात? कामगारांनी सांगितली 'त्या' 17 दिवसांची दिनचर्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:22 IST

Uttarkashi Tunnel Rescue: मानसिक स्थिती नीट ठेवण्यासाठी मोबाईलवर लुडो खेळायचे, एकमेकांशी गप्पा मारायचे...

Uttarkashi Tunnel Story:उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुखरूप सुटका झाल्यानंतर संपूर्ण देशाने सुटकेचा नि:श्वास सोडला. सिल्क्यरा बोगदा बचाव मोहिमेत विविध प्रकारचे अडथळे समोर आले, पण बचाव पथकाने ही आव्हाने दूर केली आणि कामगारांना सुखरुप बाहेर काढले. खबरदारीचा उपाय म्हणून कामगारांना चिन्यालीसौर येथील तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व कामगारांची प्रकृती ठीक आहे. हे सर्व कामगार 17 दिवस बोगद्यात काय करत होते, त्यांची दैनंदिन दिनचर्या काय होती, ते काय खायचे, शौच्छास कुठे जायचे, अशी अनेक प्रश्ने तुमच्या मनात असतील. याबद्दल आपण जाणून घेऊ...

दुसरे आयुष्य मिळाले

एखादा व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ आहे, कधीही त्याचा श्वास थांबू शकतो, अशावेळी त्याची मानसिक स्थिती कशी असेल, याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. अतिशय कठीण परिस्थितीत हे कामगार मृत्यूशी झूंज देत होते. जगण्याची तीव्र इच्छा आणि कोणीतरी आपल्याला वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहे, या विश्वासानेच कामगार जगू शकले. झारखंडचे रहिवासी चमरा ओराव सांगतात की, मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी ते फोनवर लुडो खेळायचे, बोगद्यात नैसर्गिकरित्या येणाऱ्या पाण्यात आंघोळ करायचे. 28 नोव्हेंबर रोजी बाहेर आल्यानंतर नवजीवन मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

अशी होती तीनचर्याओराव सांगतात की, 12 नोव्हेंबर रोजी ते बोगद्यात काम करत असताना मोठा आवाज आला आणि अचानक माती कोसळू लागली. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ढिगाऱ्यांमुळे तिथेच अडकले. बऱ्याच वेळापासून अडकलो आहोत, हे लक्षात आल्यानंतर सर्व कामगारांची अस्वस्थता वाढली. कुणाकडेच खाण्यापिण्याला काही नव्हते. ते फक्त देवाकडे जीव वाचण्यासाठी प्रार्थना करू शकत होते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, एकाही कामगाराने जगण्याची आशा सोडली नाही. 

सुमारे 24 तासांनंतर, म्हणजेच 13 नोव्हेंबरला, कामगारांना पाईपद्वारे भात पाठवला गेला. जेवण मिळाल्यावर कोणीतरी आम्हाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची खात्री पटली आणि आमच्या अंगात आनंदाची लाट उसळली. त्यावेळी खात्री पटली की, आता आपला जीव वाचू शकतो. दिवसभर टाईमपास करणं खूप अवघड जात होतं. ज्यांच्याकडे मोबाईल फोन होता, त्यावर लुडो खेळू लागलो. नेटवर्क नसल्याने कुणाशीही बोलता येत नव्हते. आम्ही एकमेकांशी बोलून आमच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करायचो. आंघोळीसाठी पाण्याचा नैसर्गिक स्रोत होता आणि शौचासाठी जागा बनवली होती. झारखंडचे रहिवासी विजय होरो सांगतात की, आता ते त्यांच्या राज्याबाहेर कुठेही कामासाठी जाणार नाहीत. झारखंडमध्येच मिळेल ती नोकरी करणार. बाहेर राज्यात जाण्याची गरज भासली, तर धोकादायक कामे करणार नाही. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAccidentअपघात