शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अंघोळ कशी केली, शौचास कुठे गेलात? कामगारांनी सांगितली 'त्या' 17 दिवसांची दिनचर्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:22 IST

Uttarkashi Tunnel Rescue: मानसिक स्थिती नीट ठेवण्यासाठी मोबाईलवर लुडो खेळायचे, एकमेकांशी गप्पा मारायचे...

Uttarkashi Tunnel Story:उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुखरूप सुटका झाल्यानंतर संपूर्ण देशाने सुटकेचा नि:श्वास सोडला. सिल्क्यरा बोगदा बचाव मोहिमेत विविध प्रकारचे अडथळे समोर आले, पण बचाव पथकाने ही आव्हाने दूर केली आणि कामगारांना सुखरुप बाहेर काढले. खबरदारीचा उपाय म्हणून कामगारांना चिन्यालीसौर येथील तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व कामगारांची प्रकृती ठीक आहे. हे सर्व कामगार 17 दिवस बोगद्यात काय करत होते, त्यांची दैनंदिन दिनचर्या काय होती, ते काय खायचे, शौच्छास कुठे जायचे, अशी अनेक प्रश्ने तुमच्या मनात असतील. याबद्दल आपण जाणून घेऊ...

दुसरे आयुष्य मिळाले

एखादा व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ आहे, कधीही त्याचा श्वास थांबू शकतो, अशावेळी त्याची मानसिक स्थिती कशी असेल, याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. अतिशय कठीण परिस्थितीत हे कामगार मृत्यूशी झूंज देत होते. जगण्याची तीव्र इच्छा आणि कोणीतरी आपल्याला वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहे, या विश्वासानेच कामगार जगू शकले. झारखंडचे रहिवासी चमरा ओराव सांगतात की, मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी ते फोनवर लुडो खेळायचे, बोगद्यात नैसर्गिकरित्या येणाऱ्या पाण्यात आंघोळ करायचे. 28 नोव्हेंबर रोजी बाहेर आल्यानंतर नवजीवन मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

अशी होती तीनचर्याओराव सांगतात की, 12 नोव्हेंबर रोजी ते बोगद्यात काम करत असताना मोठा आवाज आला आणि अचानक माती कोसळू लागली. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ढिगाऱ्यांमुळे तिथेच अडकले. बऱ्याच वेळापासून अडकलो आहोत, हे लक्षात आल्यानंतर सर्व कामगारांची अस्वस्थता वाढली. कुणाकडेच खाण्यापिण्याला काही नव्हते. ते फक्त देवाकडे जीव वाचण्यासाठी प्रार्थना करू शकत होते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, एकाही कामगाराने जगण्याची आशा सोडली नाही. 

सुमारे 24 तासांनंतर, म्हणजेच 13 नोव्हेंबरला, कामगारांना पाईपद्वारे भात पाठवला गेला. जेवण मिळाल्यावर कोणीतरी आम्हाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची खात्री पटली आणि आमच्या अंगात आनंदाची लाट उसळली. त्यावेळी खात्री पटली की, आता आपला जीव वाचू शकतो. दिवसभर टाईमपास करणं खूप अवघड जात होतं. ज्यांच्याकडे मोबाईल फोन होता, त्यावर लुडो खेळू लागलो. नेटवर्क नसल्याने कुणाशीही बोलता येत नव्हते. आम्ही एकमेकांशी बोलून आमच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करायचो. आंघोळीसाठी पाण्याचा नैसर्गिक स्रोत होता आणि शौचासाठी जागा बनवली होती. झारखंडचे रहिवासी विजय होरो सांगतात की, आता ते त्यांच्या राज्याबाहेर कुठेही कामासाठी जाणार नाहीत. झारखंडमध्येच मिळेल ती नोकरी करणार. बाहेर राज्यात जाण्याची गरज भासली, तर धोकादायक कामे करणार नाही. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAccidentअपघात