शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो कोटी पाण्यात; अखेर 'तो' बोगदा ५२ कोटी रुपये खर्चून बंद केला जाणार, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 14:22 IST

स्वामी सानंद यांनी केलेला तीव्र विरोध; अखेर तो १४ किलोमीटर लांब बोगदा कायमचा बंद होणार.

उत्तरकाशी (उत्तराखंड) : विकास आणि पर्यावरण संवर्धन, यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात पर्यावरणाला प्राधान्य देणारा एक ऐतिहासिक निर्णय उत्तराखंडमध्ये घेण्यात आला आहे. भागीरथी (गंगा) नदीचा प्रवाह वळवण्यासाठी खोदलेल्या १४ किलोमीटर लांबीच्या बोगद्याला आता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. 

विशेष बाब म्हणजे, २ हजार कोटी रुपयांचा लोहारीनाग पाला जलविद्युत प्रकल्प रद्द झाल्यानंतर, तयार करण्यात आलेला हा बोगदा नष्ट करण्यासाठी तब्बल ५२ कोटी रुपये खर्च केला जात आहेत. भारताच्या इतिहासात नदीची अविरलता (सतत वाहणारा नैसर्गिक प्रवाह) जपण्यासाठी घेतलेला हा अत्यंत दुर्मीळ आणि महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.

बोगदा भरण्याचे काम सुरू

उत्तरकाशी जिल्ह्यातील लोहारीनाग पाला जलविद्युत प्रकल्पाच्या या बोगद्यात भराव टाकण्याचे काम सोमवारी सुरू झाले. हे काम भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) च्या वैज्ञानिकांच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे. प्रथम टप्प्यात बोगद्यातील साचलेले पाणी आणि गाळ यंत्रांच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. त्यानंतर विशेष प्रकारची माती आणि दगडमाती भरून या १४ किमी लांबीच्या बोगद्याला पूर्णपणे बंद करण्यात येईल.

६५० कोटी रुपये आधीच खर्च

सन २००६ मध्ये NTPC (एनटीपीसी) ने ६०० मेगावॅट क्षमतेच्या या जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू केले होते. मात्र, २०१० मध्ये प्रकल्प रद्द करण्याचा आदेश आला. तोपर्यंत प्रकल्पाचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले होते आणि सरकारी तिजोरीतून ६५० कोटी रुपयेही खर्च झाले होते.

स्वामी सानंदांचे बलिदान निर्णायक ठरले

प्रकल्प बंद करण्याचे आणि बोगदा भरण्याचे श्रेय प्राध्यापक जी.डी. अग्रवाल (स्वामी ज्ञानस्वरूप सानंद) यांना जाते. स्वामी सानंद यांनी गंगा जिवंत ठेवण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घातली. जुलै २००७ मध्ये, स्वामी सानंद त्यांचे मित्र आणि प्रसिद्ध पर्यावरणतज्ञ महेश चंद्र मेहता यांच्यासोबत गंगोत्रीला प्रवास करत होते. वाटेत, त्यांना दिसले की, लोहारीनाग पाला प्रकल्पाच्या बोगद्यामुळे गंगेचे पात्र कोरडा पडत आहे. गंगा गायब झाल्याचे पाहून त्यांना खूप दुःख झाले आणि त्याच क्षणी त्यांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. 

गंगेच्या संरक्षणासाठी त्यांनी १११ दिवसांचे उपोषण केले होते. त्यांची ठाम भूमिका होती की, गंगेच्या प्रवाहाला बोगद्यात कैद करू नये. या आंदोलनात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २००८-०९ पासून स्थानिक नागरिक, पर्यावरणतज्ज्ञ आणि साधुसंतांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. धराली आपत्तीनंतर हे स्पष्ट झाले की, हिमालयाचा हा भाग इतक्या मोठ्या बांधकामाचा ताण सहन करू शकत नाही. अखेर केंद्र सरकारने आर्थिक नुकसान स्वीकारून पर्यावरण सुरक्षेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आणि हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्यात आला. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी देण्याऐवजी, निसर्गाशी समतोल साधण्याचा हा निर्णय भविष्यातील धोरणांसाठी दिशादर्शक ठरण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Crores wasted: Tunnel closed after 52 crore spend; reason revealed.

Web Summary : Uttarakhand abandons tunnel project diverting Ganga, prioritizing environment. ₹52 crore will be spent to close the ₹2000 crore project. Environmentalist Swami Sanand's sacrifice was crucial.
टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडenvironmentपर्यावरणCentral Governmentकेंद्र सरकार