शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

'ढासळत्या' जोशीमठाबाबत मोठा निर्णय; तात्काळ जागा सोडण्याचे आदेश, सरकार देणार 6 महिन्यांचे घरभाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 20:42 IST

उत्तराखंडमधील जोशीमठ शहरात अचानक घरांना आणि रस्त्यांना तडे गेले आहेत. यामुळे घाबरलेल्या अनेकांनी गाव सोडले आहे.

Joshimath Falling: उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या जोशीमठ शहरातील भिंतींना आणि रस्त्यांना मोठमोठे तडे गेले आहेत. घरांच्या भिंतींना तडे जाऊन पाणी वाहत आहे. अनेक भागात भूस्खलन आणि कोसळलेल्या भिंतींमुळे लोकांना भीतीत जगावे लागत आहे. ज्यांच्या घरांना भेगा पडल्या आहेत किंवा जमिनीला तडे गेले आहेत, त्यांनी घरे सोडून पळ काढला आहे.

याबाबत मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली. ज्यात अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षित ठिकाणी तात्काळ मोठे तात्पुरते पुनर्वसन केंद्र उभारण्यात यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जोशीमठमध्ये क्षेत्रनिहाय नियोजन करण्याचे आणि धोक्याचे क्षेत्र त्वरित रिकामे करून आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे.

सरकार 6 महिन्यांचे भाडे देईलया बैठकीनंतर जोशीमठ परिसरातील बाधितांसाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून प्रशासनाने बाधित कुटुंबांना 6 महिन्यांचे घर भाडे देण्याची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांची घरे धोक्यात आहेत किंवा राहण्यायोग्य नाहीत, त्यांना पुढील 6 महिने भाड्याच्या घरात राहण्यासाठी मदत म्हणून प्रति कुटुंब ₹ 4000 दिले जातील. मुख्यमंत्री सहायता निधीतून ही मदत दिली जाणार आहे.

500 हून अधिक घरांना तडेआत्तापर्यंत 500 हून अधिक घरांना भेगा पडल्या आहेत. अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. त्याचबरोबर अनेकांनी स्वतःहून घर सोडले आहे. संपूर्ण शहर भयभीत झाले आहे. विशेष पथक संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेत आहे. SDRF, NDRF, पोलिस सुरक्षा दलाला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. बाधित भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या भूवैज्ञानिक पथक आणि आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले की, प्रशासनाचे पथक घटनास्थळी सतत पाहणी करत आहे. आतापर्यंत 50 हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

एनटीपीसीच्या वीज प्रकल्पाचे काम थांबलेएनटीपीसी पॉवर प्रोजेक्टच्या बोगद्यातील कामही पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने बीआरओ अंतर्गत हेलांग बायपास बांधकाम, एनटीपीसीच्या तपोवन विष्णुगड जलविद्युत प्रकल्पांतर्गत बांधकाम आणि महापालिका क्षेत्रातील बांधकामांवर आगाऊ आदेश येईपर्यंत तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. यासोबतच जोशीमठ-औली रोपवेचे कामही पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आले आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडlandslidesभूस्खलन