शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'ढासळत्या' जोशीमठाबाबत मोठा निर्णय; तात्काळ जागा सोडण्याचे आदेश, सरकार देणार 6 महिन्यांचे घरभाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 20:42 IST

उत्तराखंडमधील जोशीमठ शहरात अचानक घरांना आणि रस्त्यांना तडे गेले आहेत. यामुळे घाबरलेल्या अनेकांनी गाव सोडले आहे.

Joshimath Falling: उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या जोशीमठ शहरातील भिंतींना आणि रस्त्यांना मोठमोठे तडे गेले आहेत. घरांच्या भिंतींना तडे जाऊन पाणी वाहत आहे. अनेक भागात भूस्खलन आणि कोसळलेल्या भिंतींमुळे लोकांना भीतीत जगावे लागत आहे. ज्यांच्या घरांना भेगा पडल्या आहेत किंवा जमिनीला तडे गेले आहेत, त्यांनी घरे सोडून पळ काढला आहे.

याबाबत मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली. ज्यात अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षित ठिकाणी तात्काळ मोठे तात्पुरते पुनर्वसन केंद्र उभारण्यात यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जोशीमठमध्ये क्षेत्रनिहाय नियोजन करण्याचे आणि धोक्याचे क्षेत्र त्वरित रिकामे करून आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे.

सरकार 6 महिन्यांचे भाडे देईलया बैठकीनंतर जोशीमठ परिसरातील बाधितांसाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून प्रशासनाने बाधित कुटुंबांना 6 महिन्यांचे घर भाडे देण्याची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांची घरे धोक्यात आहेत किंवा राहण्यायोग्य नाहीत, त्यांना पुढील 6 महिने भाड्याच्या घरात राहण्यासाठी मदत म्हणून प्रति कुटुंब ₹ 4000 दिले जातील. मुख्यमंत्री सहायता निधीतून ही मदत दिली जाणार आहे.

500 हून अधिक घरांना तडेआत्तापर्यंत 500 हून अधिक घरांना भेगा पडल्या आहेत. अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. त्याचबरोबर अनेकांनी स्वतःहून घर सोडले आहे. संपूर्ण शहर भयभीत झाले आहे. विशेष पथक संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेत आहे. SDRF, NDRF, पोलिस सुरक्षा दलाला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. बाधित भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या भूवैज्ञानिक पथक आणि आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले की, प्रशासनाचे पथक घटनास्थळी सतत पाहणी करत आहे. आतापर्यंत 50 हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

एनटीपीसीच्या वीज प्रकल्पाचे काम थांबलेएनटीपीसी पॉवर प्रोजेक्टच्या बोगद्यातील कामही पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने बीआरओ अंतर्गत हेलांग बायपास बांधकाम, एनटीपीसीच्या तपोवन विष्णुगड जलविद्युत प्रकल्पांतर्गत बांधकाम आणि महापालिका क्षेत्रातील बांधकामांवर आगाऊ आदेश येईपर्यंत तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. यासोबतच जोशीमठ-औली रोपवेचे कामही पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आले आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडlandslidesभूस्खलन