शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

'ढासळत्या' जोशीमठाबाबत मोठा निर्णय; तात्काळ जागा सोडण्याचे आदेश, सरकार देणार 6 महिन्यांचे घरभाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 20:42 IST

उत्तराखंडमधील जोशीमठ शहरात अचानक घरांना आणि रस्त्यांना तडे गेले आहेत. यामुळे घाबरलेल्या अनेकांनी गाव सोडले आहे.

Joshimath Falling: उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या जोशीमठ शहरातील भिंतींना आणि रस्त्यांना मोठमोठे तडे गेले आहेत. घरांच्या भिंतींना तडे जाऊन पाणी वाहत आहे. अनेक भागात भूस्खलन आणि कोसळलेल्या भिंतींमुळे लोकांना भीतीत जगावे लागत आहे. ज्यांच्या घरांना भेगा पडल्या आहेत किंवा जमिनीला तडे गेले आहेत, त्यांनी घरे सोडून पळ काढला आहे.

याबाबत मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली. ज्यात अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षित ठिकाणी तात्काळ मोठे तात्पुरते पुनर्वसन केंद्र उभारण्यात यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जोशीमठमध्ये क्षेत्रनिहाय नियोजन करण्याचे आणि धोक्याचे क्षेत्र त्वरित रिकामे करून आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे.

सरकार 6 महिन्यांचे भाडे देईलया बैठकीनंतर जोशीमठ परिसरातील बाधितांसाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून प्रशासनाने बाधित कुटुंबांना 6 महिन्यांचे घर भाडे देण्याची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांची घरे धोक्यात आहेत किंवा राहण्यायोग्य नाहीत, त्यांना पुढील 6 महिने भाड्याच्या घरात राहण्यासाठी मदत म्हणून प्रति कुटुंब ₹ 4000 दिले जातील. मुख्यमंत्री सहायता निधीतून ही मदत दिली जाणार आहे.

500 हून अधिक घरांना तडेआत्तापर्यंत 500 हून अधिक घरांना भेगा पडल्या आहेत. अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. त्याचबरोबर अनेकांनी स्वतःहून घर सोडले आहे. संपूर्ण शहर भयभीत झाले आहे. विशेष पथक संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेत आहे. SDRF, NDRF, पोलिस सुरक्षा दलाला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. बाधित भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या भूवैज्ञानिक पथक आणि आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले की, प्रशासनाचे पथक घटनास्थळी सतत पाहणी करत आहे. आतापर्यंत 50 हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

एनटीपीसीच्या वीज प्रकल्पाचे काम थांबलेएनटीपीसी पॉवर प्रोजेक्टच्या बोगद्यातील कामही पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने बीआरओ अंतर्गत हेलांग बायपास बांधकाम, एनटीपीसीच्या तपोवन विष्णुगड जलविद्युत प्रकल्पांतर्गत बांधकाम आणि महापालिका क्षेत्रातील बांधकामांवर आगाऊ आदेश येईपर्यंत तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. यासोबतच जोशीमठ-औली रोपवेचे कामही पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आले आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडlandslidesभूस्खलन