शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Uttarakhand Election 2022: “उत्तराखंड भाजपात कोणतेही मतभेद नाहीत; ६० पेक्षा जास्त जागा मिळतील”: पुष्कर सिंह धामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 08:40 IST

Uttarakhand Election 2022: गेल्या ५ महिन्यांपासून जे काम केले आहे, ते सांगण्याचाही गरज नाही, असे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले.

नवी दिल्ली: पुढील वर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यामध्ये उत्तराखंड राज्याचाही समावेश आहे. उत्तराखंड भाजपमधील अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. इतकेच नव्हे, तर भाजपवर मुख्यमंत्री बदलण्याचीही वेळ आली होती. या एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये भाजप सत्ता राखू शकेल का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यातच उत्तराखंड भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भाजपला राज्यात ६० हून अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्यक्त केला आहे. 

उत्तराखंडमधील मुख्यमंत्री बदलण्याबाबत अनेकदा प्रश्न विचारण्यासत आल्यावर पुष्कर सिंह धामी म्हणाले की, काहीवेळेस अशा परिस्थिती निर्माण होतात. पक्ष तोच आहे, सरकारही तेच आहे. फक्त चेहरा बदलण्यात आला आहे. सरकारीच धोरणे, नीती त्याच आहेत. आमच्या पक्षात कोणत्याही प्रकारचा मतभेद नाही. लोकशाही मार्गाने चालणारा आमचा पक्ष आहे, असे धामी यांनी स्पष्ट केले. आजतकच्या पंचायत आजतक या कार्यक्रमात पुष्कर सिंह धामी बोलत होते. 

पक्षाने सोपवलेली जबाबदारी पार पाडतोय

पहाडी राजकारण कठीण आहे, यावर धामी यांनी सांगितले की, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती पूर्ण सक्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न मी करतोय. आमचे सरकार ५ वर्षांपासून कामकाज पाहात आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्रासाठी काम केले आहे. आम्ही केवळ योजना तयार केल्या नाहीत, तर त्या प्रत्यक्षातही आणल्या. हाच आमच्या आणि अन्य सरकारमध्ये मोठा फरक आहे, असेही धामी यांनी नमूद केले. सांगण्यासाठी अनेक प्रकारचे आकडे सादर करता येऊ शकतील. मात्र, गेल्या ५ महिन्यांपासून जे काम केले आहे, ते सांगण्याचाही गरज नाही. जी आश्वासने दिली, ती पूर्ण केली आहेत, असे धामी म्हणाले. 

दरम्यान, विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेले मुद्दे आधारहीन आहेत. केदारनाथ पुनर्निमाणाचे काम पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात झाले. काशी कॉरिडॉरचेही काम पूर्ण झाले आहे. याशिवाय बद्रीनाथ धामचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे, असेही पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडBJPभाजपा