शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Uttarakhand: उत्तराखंडमधील चार धाम यात्रेत आतापर्यंत 39 भाविकांचा मृत्यू, समोर आले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 11:30 IST

यंदा उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रा सुरू होऊन केवळ 13 दिवस झाले आहेत.

डेहराडून:उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 39 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या महासंचालक डॉ. शैलजा भट्ट यांनी सांगितले की, या सर्व मृत्यूंची कारणे उच्च रक्तदाब, हृदयविकाराच्या समस्या आणि माउंटन सिकनेस (उंचीशी संबंधित समस्या) आहेत. यंदा उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रा सुरू होऊन केवळ 13 दिवस झाले आहेत, अशा स्थितीत एवढ्या मोठ्या संख्येने भाविकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य सेवेच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

3 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या सणापासून सुरू झालेल्या चार धाम यात्रेत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भाविकांच्या या मृत्यूची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि मंदिरांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन प्रत्येक धाममध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या एक हजाराने वाढवली. 

आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांमधील - 2700 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या यात्रेकरूंना अत्यंत थंडी, कमी आर्द्रता, अतिनील किरणे, कमी हवेचा दाब यांचा सामना करावा लागतो. यासोबत ऑक्सिजनची कमतरताही भासते. या सर्व गोष्टीमुळे वैद्यकीय तपासणीनंतरच प्रवास सुरू करावा, असा सल्ला सरकारकडून देण्यात येत आहे.

याशिवाय आधीच आजारी असलेल्यांना डॉक्टरांचा अहवाल, त्यांची औषधे आणि डॉक्टरांचा फोन नंबर सोबत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच हृदयविकार, श्‍वसनाचे आजार, मधुमेह, उच्चरक्तदाब अशा रुग्णांनी उंच भागात जाताना विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार डोकेदुखी, चक्कर येणे, घबराट होणे, हृदयाचे ठोके जलद होणे, उलट्या होणे, हातपाय आणि ओठ निळे पडणे, थकवा येणे, धाप लागणे, खोकला किंवा इतर लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार करण्यास सांगितले आहे. यासाठी सरकारने 104 हा हेल्पलाइन क्रमांक काढला आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडDeathमृत्यू