शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

आता उत्तर प्रदेशातील 'या' 12 शहरांची नावंही बदलणार! योगींचा मोठा निर्णय; या बड्या शहरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 17:16 IST

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा शहरांची नावे बदलण्याची तयारीही सुरू झाली आहे. या 12 शहरांपैकी 6 जिल्ह्यांची नावे सर्वप्रथम बदलली जाणार आहेत.

लखनै - उत्तर प्रदेशात पूर्ण बहुमताने सत्तेत परतलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) पूर्णपणे सक्रीय झाले आहेत. जनतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या बैठकांमध्ये दिला आहे. यातच, उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा शहरांची नावे बदलण्याची तयारीही सुरू झाली आहे. या 12 शहरांपैकी 6 जिल्ह्यांची नावे सर्वप्रथम बदलली जाणार आहेत.

सर्वात पहिले या शहरांचा नंबर -  'इंडिया डॉट कॉम'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या यादीत अलीगढ, फारुखाबाद, सुलतानपूर, बदायूं, फिरोजाबाद आणि शाहजहानपूरच्या नावांचा समावेश आहे. अलीगडचे नाव बदलण्यासाठी, गेल्या वर्षी 6 ऑगस्ट 2021 रोजी, पंचायत समितीने नवे अध्यक्ष विजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली, नाव बदलासह नव्या नावाचा ठरावही मंजूर केला होता. आता या जिल्ह्याचे नाव हरिगड किंवा आर्यगड ठेवण्याची तयारी सुरू आहे.

याच वेळी फर्रुखाबाद जिल्ह्यातून सलग दुसऱ्यांदा खासदार झालेले मुकेश राजपूत यांनी नुकतेच फारुखाबादचे नाव बदलून पांचाल नगर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून हा जिल्हा द्रौपदीचे वडील द्रुपद पांचाल यांच्या राज्याची राजधानी असल्याचे म्हटले आहे. म्हणूनच त्याचे नाव पांचाल नगर असावे.

तसेच, सुलतानपूरच्या लंभुआ मतदारसंघातील भाजपचे आमदार देवमणी द्विवेदी यांनी जिल्ह्याचे नाव बदलून 'कुशभवनपूर' करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. शहाजहांपूरचे आमदार असलेले मानवेंद्र सिंह यांनी जिल्ह्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव योगी सरकारकडे पाठवला आहे. त्यांनी शहाजहांपूरचे नाव बदलून 'शाजीपूर'करण्यात यावे, असे सुचवले आहे. 2 ऑगस्ट 2021 रोजी फिरोजाबाद येथे झालेल्या सभेत जिल्ह्याचे नाव बदलून चंद्रनगर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, बदायूंचे नाव बदलण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नसला तरी, या जिल्ह्याचे नावही मुख्यमंत्री योगींच्या यादीत आहे.

या जिल्यांमध्येही तयार होतायत प्रस्ताव - - आग्रा- आंबेडकर विद्यापीठात आग्राऐवजी अग्रवण जिल्ह्याच्या नव्या नावाच्या बाजूने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.- मैनपुरी- मैनपुरीमध्ये 16 ऑगस्ट रोजी जिल्हा पंचायत स्तरावरील बैठकीनंतर नाव बदलून मयान पुरी करण्याची मागणी करण्यात आली आहे.- गाझीपूर- येथील ज्येष्ठ नेते कृष्णानंद राय यांच्या पत्नी अलका राय यांनी वर्षभरापूर्वीच गाझीपूरचे नाव बदलून गाढीपुरी करण्याची मागणी केली होती.- कानपूर- कानपूर ग्रामीणमधील रसुलाबाद आणि सिकंदराबाद आणि अकबरपूर राणी येथील नावांसंदर्भात प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.- संभल- जिल्ह्याचे नाव कल्कि नगर अथवा पृथ्वीराज नगर करण्याची मागणी होत आहे.- देवबंद- ‌भाजप आमदार ब्रजेश सिंह रावत यांनीही देवबंदचे नाव देववृंदपूर करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा