शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अशा पद्धतीनं Phone Charge करणं धोक्याचं, होऊ शकतो मोठा अपघात; उद्धवस्त झालं संपूर्ण कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 10:23 IST

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक अतुल शर्मा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कुंडा गावात राहणारा शहजाद हा गंगोह येथील मोहल्ला इलाहीबख्श येथे आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतो.

नवी दिल्ली - स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी लोक फोन चार्ज होत असतानाच वापरतात आणि झोपताना चार्जिंगवर ठेवतात, जाणे करून तो सकाळी पूर्णपणे चार्ज असावा. पण यामुळे मोठा अपघातही होऊ शकतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये घडली आहे. सहारनपूर जिल्ह्यात मोबाईल चार्ज करताना विजेचा धक्का लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिची दोन मुले होरपळली आहेत.

मोबाईल चार्ज करताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू -एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक अतुल शर्मा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कुंडा गावात राहणारा शहजाद हा गंगोह येथील मोहल्ला इलाहीबख्श येथे आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतो. त्यांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री त्यांची पत्नी शहजादी आणि त्यांची दोन मुले कॉटवर पडून मोबाईल बघत होते, यावेळी मोबाईल चार्ज होत होता. शर्मा यांनी सांगितले की, झोप आल्याने शहजादी झोपी गेली. यानंतर, रात्री उशिरा मोबाईल अथवा चार्जरमध्ये करंट आल्याने हा अपघात घडला असावा.

आरडा-ओरड ऐकूण पतीला आली जाग अन्...शर्मा यांनी सांगितले की, या तिघांचा आरडा-ओरड ऐकूण शहजादला जाग आली. तोवर त्याची पत्नी आणि दोन्ही मुले बेशुद्ध झाले होते. यानंतर, तिघांनाही रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी शहजादीला मृत घोषित केले. तर तिची दोन मुले, आरिस (5-वर्ष) आणि सना (8-वर्ष) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रात्रभर मोबाईल चार्ज करणं धोक्याचं -आपणही रात्रभर मोबाईल चार्ज करत असाल, तर हे तत्काळ थांबवा. कारण यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी खराब होऊ शकते. अनेकदा लोक रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावून सोडून देतात. मात्र, यामुळे अनेक वेळा मोबाईलचा स्फोट झाल्याचे दिसून आले आहे. रात्रभर चार्जिंगमुळे मोबाईलचा स्फोट होण्याचीही भीती असते. ओव्हर चार्जिंग मोबाईलसाठी नेहमीच धोकादायक असते. यामुळे बॅटरीची लाइफदेखील कमी होते. 

टॅग्स :MobileमोबाइलelectricityवीजDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश