शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

उत्तर प्रदेशात सपा व बसपाची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 08:37 IST

सपा ३५, बसपाला ३६ जागा : राहुल व सोनिया गांधींविरुद्ध उमेदवार नसेल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात समझोता झाला असून, त्यांनी राहुल गांधी यांचा अमेठी व सोनिया गांधी यांचा रायबरेली या मतदारसंघात उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला राज्यात अन्य एकही जागा न देण्याचा निर्णय घेतला आहे.

समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शुक्रवारी रात्री बसपाच्या प्रमुख मायावती यांची दिल्लीत भेट घेतली. त्या दोघांत झालेल्या चर्चेमध्ये सपाने ३५ व बसपाने ३६ जागा लढवण्यावर एकमत झाले. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा असून, त्यापैकी दोघे मिळून ७१ जागा लढवतील आणि राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्या मतदारसंघांत त्यांचे उमेदवार नसतील. त्यामुळे उरलेल्या ७ मतदारसंघांपैकी ३ जागा अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोक दलाला सोडण्याचे तूर्त ठरले आहे. याखेरीज चार जागा शिल्लक राहत असून, त्या एखाद्या प्रादेशिक वा लहान पक्षाला सोडण्याचा या दोन्ही नेत्यांचा विचार आहे. मात्र, तो पक्ष कोणता असू शकतो, हे स्पष्ट झालेले नाही. सध्या केंद्रात मंत्री असलेल्या अपना दलाच्या अनुप्रिया पटेल भाजपा व रालोआवर नाराज आहेत. त्या रालोआतून बाहेर पडल्यास त्यांना त्या जागा सोडण्याबाबत हे दोन्ही नेते विचार करू शकतील. मात्र, तेही अद्याप ठरलेले नाही. या दोन नेत्यांची पुन्हा १५ जानेवारी रोजी बैठक होणार असून, त्यात या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षाशी आघाडी करण्यात काँग्रेसने सुरुवातीपासून रस दाखवला होता; पण काँग्रेसने वेळेत भूमिका स्पष्ट केली नाही आणि आम्ही त्या पक्षासाठी फार काळ थांबू शकत नाही, असे अखिलेश यादव यांनी बोलून दाखवले आहे. काँग्रेसची उत्तर प्रदेशात फारशी ताकद नसताना त्यांना आघाडीत घेण्याचे आणि त्यांच्यासाठी जागा सोडण्याचे कारण नाही, असे मायावती यांचे म्हणणे असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस अधिक जागा मागेल, असे या दोन्ही नेत्यांना वाटल्यामुळेच त्यांनी आपापसात जागा वाटून घेण्याचा निर्णय घेतला असावा, असे समजते. समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी सांगितले की, आम्हा दोन्ही पक्षांतील आघाडीचा निर्णय झाला आहे. या आघाडीत आणखी कोणत्या पक्षाला सहभागी करून घ्यायचे आहे, याचा निर्णय अखिलेश यादव आणि मायावती लवकरच घेतील.समझोता कशामुळे?च्गेल्या वेळी उत्तर प्रदेशातील ८० पैकी ७१ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. सपाचे पाच उमेदवार विजयी झाले होते, तर काँग्रेसतर्फे सोनिया गांधी व राहुल गांधी विजयी झाले होते. उरलेल्या दोन जागांवर अपना दलाचे उमेदवार जिंकले होते. त्यांना भाजपाचा पाठिंबा होता.च्बसपाला एकही जागा मिळाली नव्हती. मात्र, उत्तर प्रदेशात नंतर झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकांत सपा, बसपा, लोक दल व काँग्रेस एकत्र आल्याने भाजपाला तीन जागा गमवाव्या लागल्या होत्या. त्यामुळेच यंदा सपा व बसपाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेस