शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

उत्तर प्रदेशात जातीय राजकारणाला सुरुंग

By admin | Updated: May 17, 2014 04:37 IST

भाजपाच्या मोदी लाटेने उत्तर प्रदेशातील जातीच्या राजकारणाचे समीकरण संपविले आणि त्याचबरोबर या राजकारणाच्या पायावर मुलायमसिंह आणि मायावती यांनी उभे केलेले किल्लेही ढासळले.

भाजपाच्या मोदी लाटेने उत्तर प्रदेशातील जातीच्या राजकारणाचे समीकरण संपविले आणि त्याचबरोबर या राजकारणाच्या पायावर मुलायमसिंह आणि मायावती यांनी उभे केलेले किल्लेही ढासळले. राममंदिराच्या आंदोलनानंतर भाजपाने या वेळी प्रथमच उत्तर प्रदेशात जोरदार मुसंडी मारून इतर पक्षांची अक्षरश: दाणादाण उडविली आहे. राममंदिर आंदोलनानंतर मुलायमसिंहांनी आपल्या यादवांच्या व्होट बँकेला मुस्लीम व्होट बँकेची जोडणी केली. त्याचा आधार फक्त राममंदिर आणि भाजपाविरोध हाच होता आणि या एकाच मुद्द्यावर मुस्लीम मतपेढी सपाकडे वळली. याचवेळी मायावतींनी आपल्या राजकारणाची पुनर्मांडणी करीत दलित आणि ब्राह्मण असे समीकरण जुळवून सत्ता मिळविली होती आणि गेल्या १० वर्षांत उत्तर प्रदेशाच्या राजकारणाचा जात हाच पाया तयार झाला होता. दलित आणि मुस्लीम ही काँग्रेसची व्होट बँक दुरावली आणि तेथूनच काँग्रेसच्या प्रभावाला ओहोटी लागली. एकेकाळी सर्वांत जास्त जागा जिंकणार्‍या काँग्रेसला या वेळी केवळ दोन जागा मिळाल्या, त्याही सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याच. अमेठीचा गड कसा राखावा लागला हे आता दिसलेच. भाजपाच्या या नव्या लाटेत मायावतींकडचा ब्राह्मण मतदारसुद्धा सरळपणे भाजपाकडे झुकला. दलित मतांची विभागणी झाली आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी सत्तेवर असणार्‍या या पक्षाला लोकसभेत खातेही उघडता आले नाही. समाजवादी पार्टीचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. उत्तर प्रदेशात सत्तेवर असतानाही त्यांना केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले. याचा अर्थ यादवांची मते फुटली आणि मुस्लिमांनीही या वेळी वेगळा विचार केल्याचे जाणवते. उत्तर प्रदेशातील या तीनही पक्षांचे दिग्गज पराभूत झाले आहेत. एका अर्थाने उत्तर प्रदेशच्या राजकारणाची नव्याने मांडणी सुरू झाली आहे.