शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

उत्तर प्रदेशात जातीय राजकारणाला सुरुंग

By admin | Updated: May 17, 2014 04:37 IST

भाजपाच्या मोदी लाटेने उत्तर प्रदेशातील जातीच्या राजकारणाचे समीकरण संपविले आणि त्याचबरोबर या राजकारणाच्या पायावर मुलायमसिंह आणि मायावती यांनी उभे केलेले किल्लेही ढासळले.

भाजपाच्या मोदी लाटेने उत्तर प्रदेशातील जातीच्या राजकारणाचे समीकरण संपविले आणि त्याचबरोबर या राजकारणाच्या पायावर मुलायमसिंह आणि मायावती यांनी उभे केलेले किल्लेही ढासळले. राममंदिराच्या आंदोलनानंतर भाजपाने या वेळी प्रथमच उत्तर प्रदेशात जोरदार मुसंडी मारून इतर पक्षांची अक्षरश: दाणादाण उडविली आहे. राममंदिर आंदोलनानंतर मुलायमसिंहांनी आपल्या यादवांच्या व्होट बँकेला मुस्लीम व्होट बँकेची जोडणी केली. त्याचा आधार फक्त राममंदिर आणि भाजपाविरोध हाच होता आणि या एकाच मुद्द्यावर मुस्लीम मतपेढी सपाकडे वळली. याचवेळी मायावतींनी आपल्या राजकारणाची पुनर्मांडणी करीत दलित आणि ब्राह्मण असे समीकरण जुळवून सत्ता मिळविली होती आणि गेल्या १० वर्षांत उत्तर प्रदेशाच्या राजकारणाचा जात हाच पाया तयार झाला होता. दलित आणि मुस्लीम ही काँग्रेसची व्होट बँक दुरावली आणि तेथूनच काँग्रेसच्या प्रभावाला ओहोटी लागली. एकेकाळी सर्वांत जास्त जागा जिंकणार्‍या काँग्रेसला या वेळी केवळ दोन जागा मिळाल्या, त्याही सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याच. अमेठीचा गड कसा राखावा लागला हे आता दिसलेच. भाजपाच्या या नव्या लाटेत मायावतींकडचा ब्राह्मण मतदारसुद्धा सरळपणे भाजपाकडे झुकला. दलित मतांची विभागणी झाली आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी सत्तेवर असणार्‍या या पक्षाला लोकसभेत खातेही उघडता आले नाही. समाजवादी पार्टीचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. उत्तर प्रदेशात सत्तेवर असतानाही त्यांना केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले. याचा अर्थ यादवांची मते फुटली आणि मुस्लिमांनीही या वेळी वेगळा विचार केल्याचे जाणवते. उत्तर प्रदेशातील या तीनही पक्षांचे दिग्गज पराभूत झाले आहेत. एका अर्थाने उत्तर प्रदेशच्या राजकारणाची नव्याने मांडणी सुरू झाली आहे.