शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

लग्नात गोंधळ! नागिन डान्सवरून वऱ्हाडी भिडले; एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी हाणले, 5 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 15:30 IST

लग्नामध्ये झालेल्या या गोंधळात पाच जण जखमी झाले. हाणामारीनंतर वरातीत चेंगराचेंगरी झाली.

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये वरातीत नागिन डान्सवरून दोन पक्षांमध्ये झालेल्या वादात पाच जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण लखीमपूर खेरीच्या मितौली पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे, जिथे कल्लू नावाच्या व्यावसायिकाचा धाकटा भाऊ फहनूरचं लग्न मितौली शहरात राहणाऱ्या अलाउद्दीनच्या मुलीशी ठरलं होतं. 

16 मार्चच्या रात्री जेव्हा वरात वाजत-गाजत मुलीच्या घराकडे निघाली, त्याचवेळी काही पाहुण्यांनी नागिन डान्सची धून वाजवायला सांगितली. त्यामुळे वरातीत सहभागी झालेले काही लोक संतापले तर काही नाराज झाले. त्यावरून दोन्ही बाजुच्या लोकांमध्ये वाद झाला. काही गोष्टींवरून पुढे वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार हाणामारी झाली. 

लग्नामध्ये झालेल्या या गोंधळात पाच जण जखमी झाले. हाणामारीनंतर वरातीत चेंगराचेंगरी झाली. सर्व जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मितौली येथे दाखल करण्यात आले. गोंधळ झाल्यानंतर वरातीत सहभागी ज्येष्ठांनी समज देऊन प्रकरण शांत केले. मुलाचा भाऊ कल्लू याने याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. गाण्यावरून वरातीत झालेल्या भांडणाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्न