शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

Coronavirus: उत्तर प्रदेशात महाराष्ट्राच्या दहापट कोरोना रुग्ण; कुंभमेळ्यामुळे 17 दिवसांत रुग्ण 551 टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 04:33 IST

Coronavirus महाराष्ट्र कदाचित रुग्णसंख्येत राज्यांत पुढे असेल. परंतु, रुग्णवाढीचा मुद्दा येतो तेव्हा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडने आघाडी घेतली आहे.

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त असल्याची चर्चा असली तरी, प्रत्यक्षात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड रुग्णसंख्येबाबत फार मोठ्या आघाडीवर आहेत. 

महाराष्ट्र कदाचित रुग्णसंख्येत राज्यांत पुढे असेल. परंतु, रुग्णवाढीचा मुद्दा येतो तेव्हा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडने आघाडी घेतली आहे. वस्तुस्थिती अशी की, टक्केवारीचा विचार केला तर महाराष्ट्राने या दोन राज्यांच्या तुलनेत चांगले काम केले आहे. संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार एक एप्रिल रोजी महाराष्ट्रात ४३,१८३ रुग्ण होते ते १७ एप्रिल रोजी ६७,१२३ झाले. १७ दिवसांत महाराष्ट्रात रुग्णांत १५५ टक्के वाढ झाली. परंतु, हीच वाढ उत्तर प्रदेशमध्ये १,०५५ टक्के (महाराष्ट्राच्या सात पट) होती. उत्तर प्रदेशमध्ये एक एप्रिल रोजी २५८९ रुग्ण होते ती संख्या १७ एप्रिल रोजी २७३३४ झाली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे, कुंभमेळ्याने फैलाव केला नाही असा दावा कदाचित करतीलही. परंतु, आकडेवारी या दाव्याला दुजोरा देत नाही. उत्तराखंडमध्ये एक एप्रिल रोजी ५०० रुग्ण होते. परंतु, १७ एप्रिल रोजी ती संख्या २७५७ झाली. म्हणजे १७ दिवसांत ५५१ टक्के वाढ. ही वाढ महाराष्ट्रात झालेल्या १५५ टक्के वाढीच्या किती तरी जास्त आहे.  कोरोना रुग्णवाढीची राष्ट्रीय सरासरी ही निराश करणारी आहे. कारण एक एप्रिल रोजी ८१,३९८ रुग्ण होते ते १७ एप्रिलला २,६०,८९५ झाले. ही वाढ ३२० टक्क्यांची आहे.

‘लसीकरण झाले तरीही भारतात प्रवास टाळा’वाॅशिंग्टन/नवी दिल्ली : भारतात काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत दरराेज अडीच लाखांहून नवे रुग्ण आढळत आहेत. काेराेनाच्या उद्रेकामुळे भारतात प्रवास करू नये तसेच ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशांनीही भारतात जाणे टाळण्याचा सावधगिरीचा इशारा अमेरिकेच्या राेग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राने अमेरिकन नागरिकांना दिला आहे. भारतात काेराेनाच्या विषाणूचे डबल म्युटेशन आढळून आले आहे. हा विषाणू अतिशय वेगाने पसरताे. त्यामुळे भारतात काेराेनाच्या रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी भारतात जाणे टाळावे, असा सल्ला दिला आहे. ‘सीडीसी’ने म्हटले आहे, की पूर्ण लसीकरण झाले तरीही संसर्ग तसेच विषाणूचा प्रसार होण्याचा धाेका आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKumbh Melaकुंभ मेळा