शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

"सरकार मृतांचे आकडे लपवतंय, कारण..."; चेंगराचेंगरीवरून अखिलेश यादवांचे योगी सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:47 IST

Mahakumbh Stampede Death Toll: महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाल्याचे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले आहे. पण, या आकेडवारीबद्दल अखिलेश यादव यांनी शंका व्यक्त केली आहे. याचेही कारणही त्यांनी सांगितले आहे.  

Mahakumbh Stampede Death Update: महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला आणि ६० भाविक जखमी झाले, असे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले. उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या मृतांच्या आकडेवारीबद्दल अखिलेश यादव प्रश्न उपस्थित केले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

२९ जानेवारी रोजी महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर अमृत स्नान करण्यासाठी निघाले होते. अचानक गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. 

अखिलेश यादव चेंगराचेंगरीबद्दल काय बोलले?

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, "दुर्घटनेची सत्यता, आकडे लपवणे, पुरावे लपवणे हा एक गुन्हा आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर गेले आहेत, राजनैतिक रुपातही गेले आहेत. सरकारला मृतांचा आकडा लपवत आहे, कारण नुकसान भरपाई द्यावी लागू नये", असा आरोप अखिलेश यादव यांनी केला. 

"उत्तर प्रदेश सरकार सर्व माहिती लपवत आहे. सरकारला वाटतंय की, लोकांचं लक्ष विचलित व्हावं. घटनेमागे कोणतेही कटकारस्थान नाहीये. फक्त सरकारचे अपयश आहे. साधू, संत सुद्धा हेच म्हणत आहेत", अशी टीका अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारवर केले. 

'अडकलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याची व्यवस्था करावी' अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, "स्वयंसेवकांना दुचाकीच्या माध्यमातून दूरवर अडकलेल्या लोकांपर्यंत राज्यभरातून वैद्यकीय आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पोहोचवण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे."

"महाकुंभ जवळच्या भागात आणि उर्वरित राज्यात शेकडो किमी वाहने अडकली आहेत. त्यांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होण्याबद्दल लक्ष दिले गेले पाहिजेत. मेडिकल्स दिवस रात्र सुरू ठेवली पाहिजेत. थंडीत रस्त्यात अडकलेल्या लोकांना चादरी आणि कपड्यांचं वाटप केले गेले पाहिजे", अशा सूचना अखिलेश यादव यांनी राज्य सरकारला केल्या आहेत. 

घटना दाबण्यासाठी कोट्यवधींचा खर्च -अखिलेश यादव

"हजारो कोटी रुपये ही घटना दाबण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी खर्च केले जात आहेत. मग पीडितांसाठी काही कोटी रुपये खर्च करण्यासाठी सरकार का कचरत आहे?", असा सवालही अखिलेश यादव यांनी केला आहे. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाAkhilesh Yadavअखिलेश यादवyogi adityanathयोगी आदित्यनाथReligious programmeधार्मिक कार्यक्रम