शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

"सरकार मृतांचे आकडे लपवतंय, कारण..."; चेंगराचेंगरीवरून अखिलेश यादवांचे योगी सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:47 IST

Mahakumbh Stampede Death Toll: महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाल्याचे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले आहे. पण, या आकेडवारीबद्दल अखिलेश यादव यांनी शंका व्यक्त केली आहे. याचेही कारणही त्यांनी सांगितले आहे.  

Mahakumbh Stampede Death Update: महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला आणि ६० भाविक जखमी झाले, असे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले. उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या मृतांच्या आकडेवारीबद्दल अखिलेश यादव प्रश्न उपस्थित केले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

२९ जानेवारी रोजी महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर अमृत स्नान करण्यासाठी निघाले होते. अचानक गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. 

अखिलेश यादव चेंगराचेंगरीबद्दल काय बोलले?

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, "दुर्घटनेची सत्यता, आकडे लपवणे, पुरावे लपवणे हा एक गुन्हा आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर गेले आहेत, राजनैतिक रुपातही गेले आहेत. सरकारला मृतांचा आकडा लपवत आहे, कारण नुकसान भरपाई द्यावी लागू नये", असा आरोप अखिलेश यादव यांनी केला. 

"उत्तर प्रदेश सरकार सर्व माहिती लपवत आहे. सरकारला वाटतंय की, लोकांचं लक्ष विचलित व्हावं. घटनेमागे कोणतेही कटकारस्थान नाहीये. फक्त सरकारचे अपयश आहे. साधू, संत सुद्धा हेच म्हणत आहेत", अशी टीका अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारवर केले. 

'अडकलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याची व्यवस्था करावी' अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, "स्वयंसेवकांना दुचाकीच्या माध्यमातून दूरवर अडकलेल्या लोकांपर्यंत राज्यभरातून वैद्यकीय आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पोहोचवण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे."

"महाकुंभ जवळच्या भागात आणि उर्वरित राज्यात शेकडो किमी वाहने अडकली आहेत. त्यांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होण्याबद्दल लक्ष दिले गेले पाहिजेत. मेडिकल्स दिवस रात्र सुरू ठेवली पाहिजेत. थंडीत रस्त्यात अडकलेल्या लोकांना चादरी आणि कपड्यांचं वाटप केले गेले पाहिजे", अशा सूचना अखिलेश यादव यांनी राज्य सरकारला केल्या आहेत. 

घटना दाबण्यासाठी कोट्यवधींचा खर्च -अखिलेश यादव

"हजारो कोटी रुपये ही घटना दाबण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी खर्च केले जात आहेत. मग पीडितांसाठी काही कोटी रुपये खर्च करण्यासाठी सरकार का कचरत आहे?", असा सवालही अखिलेश यादव यांनी केला आहे. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाAkhilesh Yadavअखिलेश यादवyogi adityanathयोगी आदित्यनाथReligious programmeधार्मिक कार्यक्रम