शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

"सरकार मृतांचे आकडे लपवतंय, कारण..."; चेंगराचेंगरीवरून अखिलेश यादवांचे योगी सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:47 IST

Mahakumbh Stampede Death Toll: महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाल्याचे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले आहे. पण, या आकेडवारीबद्दल अखिलेश यादव यांनी शंका व्यक्त केली आहे. याचेही कारणही त्यांनी सांगितले आहे.  

Mahakumbh Stampede Death Update: महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला आणि ६० भाविक जखमी झाले, असे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले. उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या मृतांच्या आकडेवारीबद्दल अखिलेश यादव प्रश्न उपस्थित केले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

२९ जानेवारी रोजी महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर अमृत स्नान करण्यासाठी निघाले होते. अचानक गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. 

अखिलेश यादव चेंगराचेंगरीबद्दल काय बोलले?

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, "दुर्घटनेची सत्यता, आकडे लपवणे, पुरावे लपवणे हा एक गुन्हा आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर गेले आहेत, राजनैतिक रुपातही गेले आहेत. सरकारला मृतांचा आकडा लपवत आहे, कारण नुकसान भरपाई द्यावी लागू नये", असा आरोप अखिलेश यादव यांनी केला. 

"उत्तर प्रदेश सरकार सर्व माहिती लपवत आहे. सरकारला वाटतंय की, लोकांचं लक्ष विचलित व्हावं. घटनेमागे कोणतेही कटकारस्थान नाहीये. फक्त सरकारचे अपयश आहे. साधू, संत सुद्धा हेच म्हणत आहेत", अशी टीका अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारवर केले. 

'अडकलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याची व्यवस्था करावी' अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, "स्वयंसेवकांना दुचाकीच्या माध्यमातून दूरवर अडकलेल्या लोकांपर्यंत राज्यभरातून वैद्यकीय आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पोहोचवण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे."

"महाकुंभ जवळच्या भागात आणि उर्वरित राज्यात शेकडो किमी वाहने अडकली आहेत. त्यांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होण्याबद्दल लक्ष दिले गेले पाहिजेत. मेडिकल्स दिवस रात्र सुरू ठेवली पाहिजेत. थंडीत रस्त्यात अडकलेल्या लोकांना चादरी आणि कपड्यांचं वाटप केले गेले पाहिजे", अशा सूचना अखिलेश यादव यांनी राज्य सरकारला केल्या आहेत. 

घटना दाबण्यासाठी कोट्यवधींचा खर्च -अखिलेश यादव

"हजारो कोटी रुपये ही घटना दाबण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी खर्च केले जात आहेत. मग पीडितांसाठी काही कोटी रुपये खर्च करण्यासाठी सरकार का कचरत आहे?", असा सवालही अखिलेश यादव यांनी केला आहे. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाAkhilesh Yadavअखिलेश यादवyogi adityanathयोगी आदित्यनाथReligious programmeधार्मिक कार्यक्रम