शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

विच्छा माझी पुरी करा! अंतःकरणातून आवाज, मला भारतरत्न द्या; गोखपूरमधील युवकाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 12:56 IST

विशेष म्हणजे या युवकाने प्रशासनाला दिलेले हे पत्र अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती भवनला पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

गोरखपूर: भारत देशात अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. अजब-गजब घटनांमुळे काही प्रकरणांची चर्चाही होत असते. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमधून समोर आले आहे. गोरखपूरमधील एका युवकाने थेट भारतरत्न पुरस्कार मिळण्याबाबत पत्र लिहिले आहे. भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी माझी इच्छा आहे. माझ्या अंतःकरणाचा आवाज मला तसे सांगतो आहे, अशा आशयाचे पत्र या युवकाने पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, याची जोरदार चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

पत्र लिहिणाऱ्या युवकाने स्वतःचे नाव विनोद कुमार गोंड असे सांगितले आहे. विनोदच्या म्हणण्यानुसार, तो गोरखपूरच्या सदर तहसीलमधील पिपराइच पोलीस स्टेशन परिसरात राहणारा आहे. ३० सप्टेंबर रोजी संध्यावंदनावेळी ध्यानस्थ बसलो असताना अचानक माझ्या अंतरात्म्यातून आपल्याला भारतरत्न मिळावा म्हणून जोरदार आवाज आला. माझी इच्छा पूर्ण व्हावी. मला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी विनंती आहे, असे पत्र विनोदने लिहिले आहे. यानंतर आता खासदार, आमदारांना इच्छा पूर्ण करण्यासाठी विनोद आवाहन करत आहे. 

विनोदचे पत्र राष्ट्रपती भवनला पाठवले

संबंधित अधिकाऱ्यांनी विनोदचे पत्र राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवून दिले. अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, विनोद यांनी पाठवलेले पत्र पोस्ट ऑफिसकडून आले होते. त्यामुळे आम्ही पत्र पुढे पाठवले. याबाबत विनोदशी संपर्क केला असता, ही बाब नाकारली. पोलीस आयुक्तालयात जाऊन मी स्वतः जाऊन हे पत्र दिले. यावर, आम्ही पत्र पुढे पाठवतो, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले, अशी माहिती विनोद यांनी दिली. 

कोण आहे विनोद कुमार गौंड?

विनोद हा ई-रिक्षा चालक आहे. ई-रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला दोन मुले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांची रिक्षा चोरीला गेली होती. यानंतर विनोद एका कथावाचक व्यक्तीचा ड्रायव्हर झाला. तसेच पूजन, पठण, ध्यान वगैरे करू लागला. असाच सायंकाळी ध्यानाला बसला असताना, विनोदच्या अंतरात्म्यामधून आवाज आला की, ते जे करत आहेत त्याबद्दल त्यांना भारतरत्नने सन्मानित केले जावे. विनोदचे भारतरत्न असलेले मागणीपत्र गोरखपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले होते. यानंतर हे पत्र डीएम, जॉइंट मॅजिस्ट्रेट/एडीएम सदर, तहसीलदार सदर, सीडीओ यांच्या स्वाक्षरीसह पुढे पाठविण्यात आले. या पत्राबाबत अधिकारी काही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. हे पत्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSocial Viralसोशल व्हायरल