शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

उत्तर प्रदेशात गोरखपूर बालमृत्यूकांडाची पुनरावृत्ती, ऑक्सिजनअभावी 49 चिमुरड्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 11:16 IST

फारुखाबाद येथील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा असल्याने 49 चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची धक्कायदायक घटना घडली आहे

लखनऊ, दि. 4 - गोरखपूर बालमृत्यूकांडानंतर देशाला हादरवून सोडणा-या घटनेची उत्तर प्रदेशात पुनरावृत्ती झाली आहे. फारुखाबाद येथील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा असल्याने 49 चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची धक्कायदायक घटना घडली आहे. एका महिन्यात 49 चिमुरड्यांचा जीव गेल्याने पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारवर टीका होत आहे. याप्रकरणी जिल्हा दंडाधिका-यांनी चौकशीचा आदेश दिला आहे. रुग्णालयातील वरिष्ठांविरोधात निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

गोरखपूर घटनेला एक महिना उलटत नाही, तोच ही घटना समोर आली असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतही ऑक्सिजनची कमतरता असल्यानेच मृत्यू झाले आहेत.

दरम्या नगोररखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालय (बीआरडी) व रुग्णालयात ऑगस्टमध्ये झालेल्या बालमृत्यमुळे डॉ. काफिला खान यांना पोलिसांनी अटक केली आहे. बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात सहा दिवसांमध्ये ६३ बालकांचा मृत्यू झाला होता. ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने १0 व ११ ऑगस्ट रोजी ३३ मुलांना जीव गमवावा लागला होता. डॉ. खान यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स आपल्या खासगी रुग्णालयासाठी वापरल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालकांनी २३ ऑगस्ट रोजी ७ जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. मुख्य सचिवांकडे तपासाची सूत्रे होती. त्या तपासाच्या आधारे वैद्यकीय शिक्षण अतिरिक्त मुख्य सचिवांना हटवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाच्या प्राचार्यांसह इतर ५ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी प्राचार्य मिश्रा व त्यांच्या पत्नीला अटक केली. डॉ काफिल खान यांच्या सिलिंडर चोरीच्या कृत्याला साथ दिल्याचा आरोप प्राचार्य मिश्रा यांच्यावर आहे. 

मुलांना वेळेत आणत नाहीत रुग्णालयातगंभीर आजारी मुले व नवजात शिशू यांना अतिदक्षता कक्षात उपचारासाठी ठेवले जाते. यात मुदतीआधी जन्मलेली, कमी वजनाची तसेच कावीळ व अन्य संसर्गजन्य आजार असलेल्या बालकांचा समावेश असतो. मेंदुज्वर झालेल्या बालकांना अत्यंत गंभीर स्थितीत ऐनवेळी आणले जाते. अशा मुलांना उपचारासाठी वेळीच इस्पितळात आणल्यास नवजात बालकांना वाचविणे शक्य असते, असे प्राचार्य सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :GorakhpurगोरखपूरUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ