शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात गोरखपूर बालमृत्यूकांडाची पुनरावृत्ती, ऑक्सिजनअभावी 49 चिमुरड्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 11:16 IST

फारुखाबाद येथील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा असल्याने 49 चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची धक्कायदायक घटना घडली आहे

लखनऊ, दि. 4 - गोरखपूर बालमृत्यूकांडानंतर देशाला हादरवून सोडणा-या घटनेची उत्तर प्रदेशात पुनरावृत्ती झाली आहे. फारुखाबाद येथील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा असल्याने 49 चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची धक्कायदायक घटना घडली आहे. एका महिन्यात 49 चिमुरड्यांचा जीव गेल्याने पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारवर टीका होत आहे. याप्रकरणी जिल्हा दंडाधिका-यांनी चौकशीचा आदेश दिला आहे. रुग्णालयातील वरिष्ठांविरोधात निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

गोरखपूर घटनेला एक महिना उलटत नाही, तोच ही घटना समोर आली असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतही ऑक्सिजनची कमतरता असल्यानेच मृत्यू झाले आहेत.

दरम्या नगोररखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालय (बीआरडी) व रुग्णालयात ऑगस्टमध्ये झालेल्या बालमृत्यमुळे डॉ. काफिला खान यांना पोलिसांनी अटक केली आहे. बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात सहा दिवसांमध्ये ६३ बालकांचा मृत्यू झाला होता. ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने १0 व ११ ऑगस्ट रोजी ३३ मुलांना जीव गमवावा लागला होता. डॉ. खान यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स आपल्या खासगी रुग्णालयासाठी वापरल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालकांनी २३ ऑगस्ट रोजी ७ जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. मुख्य सचिवांकडे तपासाची सूत्रे होती. त्या तपासाच्या आधारे वैद्यकीय शिक्षण अतिरिक्त मुख्य सचिवांना हटवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाच्या प्राचार्यांसह इतर ५ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी प्राचार्य मिश्रा व त्यांच्या पत्नीला अटक केली. डॉ काफिल खान यांच्या सिलिंडर चोरीच्या कृत्याला साथ दिल्याचा आरोप प्राचार्य मिश्रा यांच्यावर आहे. 

मुलांना वेळेत आणत नाहीत रुग्णालयातगंभीर आजारी मुले व नवजात शिशू यांना अतिदक्षता कक्षात उपचारासाठी ठेवले जाते. यात मुदतीआधी जन्मलेली, कमी वजनाची तसेच कावीळ व अन्य संसर्गजन्य आजार असलेल्या बालकांचा समावेश असतो. मेंदुज्वर झालेल्या बालकांना अत्यंत गंभीर स्थितीत ऐनवेळी आणले जाते. अशा मुलांना उपचारासाठी वेळीच इस्पितळात आणल्यास नवजात बालकांना वाचविणे शक्य असते, असे प्राचार्य सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :GorakhpurगोरखपूरUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ